शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

करुणानिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 03:53 IST

करुणानिधींच्या निधनाने साऱ्या भारतावर आपल्या राजकीय नेतृत्वाची व समन्वयी वृत्तीची दीर्घकाळ छाप उमटविणारा कमालीचा लढाऊ, प्रतिभाशाली व कडव्या भूमिका धारण करणारा दाक्षिणात्य नेता काळाच्या पडद्याआड नेला आहे.

करुणानिधींच्या निधनाने साऱ्या भारतावर आपल्या राजकीय नेतृत्वाची व समन्वयी वृत्तीची दीर्घकाळ छाप उमटविणारा कमालीचा लढाऊ, प्रतिभाशाली व कडव्या भूमिका धारण करणारा दाक्षिणात्य नेता काळाच्या पडद्याआड नेला आहे. ऐन विद्यार्थी दशेत ब्राह्मणेतर चळवळ व द्रविड संस्कृतीचे उत्थान यात प्रथम पेरियर रामस्वामी नायकेर व पुढे सी.एन. अण्णादुराई यांच्या नेतृत्वात सहभागी झालेल्या करुणानिधींचे नेतृत्वगुण त्यांच्या नेत्यांनी आरंभापासूनच ध्यानात ठेवले. १९६९ मध्ये तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदावर असलेल्या अण्णादुराई यांचे निधन झाल्यानंतर त्या पदाची शपथ घेतलेल्या करुणानिधींनी ते पद पुढे ५ वेळा व तब्बल १९ वर्षे सांभाळले. त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देणाºया एम.जी. रामचंद्रन या लोकप्रिय नटाचा व जे. जयललिता या नटीचा विरोध पत्करूनही साºया तामिळनाडूवर त्यांनी आपली पकड कायम केली. ब्राह्मणेतर चळवळीएवढाच त्यांचा हिंदूविरोधी चळवळीतला सहभागही मोठा होता. हिंदी भाषा दक्षिणेवर लादल्याने द्रविड संस्कृतीचा संकोच होतो अशी भूमिका घेणाºया करुणानिधींनी त्या आंदोलनात रेल्वेच्या रुळावर झोपून गाड्या अडविल्या. एक कमालीचा लढवय्या, मुरलेला राजकारणी व जनतेच्या नाडीवर हात असलेला नेता ही त्यांची प्रतिमा होती. दक्षिणेतील ब्राह्मणेतर चळवळ व हिंदीविरोध या दोन्ही गोष्टी तेव्हा जोरात होत्या. त्यांना असलेला जनाधार करुणानिधींनी कधी दुर्लक्षिला नाही. मात्र त्याचवेळी दिल्लीतील कोणत्या सरकारशी सहकार्य करायचे आणि कुणापासून व कधी दूर राहायचे याविषयीचे त्यांचे तारतम्यही कधी हरविले नाही. ते इंदिरा गांधींसोबत होते. पुढे त्यांच्या विरोधातही राहिले. राजीव गांधींच्या हत्येशी त्यांच्या पक्षाचा संबंध जुळविण्याचा प्रयत्न काहींनी केला. पण त्याला कधी बळकटी आली नाही. पुढे त्यांनी नरसिंहरावांच्या सरकारला व नंतर मनमोहनसिंग यांच्या सरकारांना साथ दिली. मृत्यूच्या काळात त्यांचा पक्ष सत्तेवर नाही. जयललितांना मानणारा अण्णाद्रमुक हा पक्ष तामिळनाडूत सध्या सत्तेवर आहे. त्याचा करुणानिधींना असलेला विरोध टोकाचा आहे. त्यांची अंत्ययात्रा मरिना बीचवर येणार नाही आणि अण्णादुराई व जयललिता यांच्या शेजारी त्यांची समाधी उभी होणार नाही यासाठी त्या सरकारने अतिशय क्षुद्र पातळीवरून प्रयत्न केले. न्यायालयाने ते हाणून पाडल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीला त्या किनाºयावर जागा दिली गेली व आता तेथेच त्यांचे समाधीस्थळही उभे होईल. करुणानिधींच्या राजवटीने तामिळनाडूचा सर्व क्षेत्रात विकास घडविला. उद्योग, रोजगार, कृषी, शिक्षण, आरोग्य, पर्यटन व संस्कृती ही सगळी क्षेत्रे त्यांच्या कार्यकाळात विकसित झाली. त्यामुळे एक विकसनशील व कार्यक्षम नेता म्हणूनही त्यांचे नाव देशात आदराने घेतले गेले. आपल्या सत्ताकारणात आपल्या मुलांना, नातेवाईकांना व जवळच्या लोकांना सामावून घेण्यात व त्यासाठी होणाºया टीकेकडे दुर्लक्ष करण्यातही ते आघाडीवर होते. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांची मुले होती. त्यांचे जे मंत्री केंद्रात होते, त्यातही त्यांची मुले, पुतणे वा भाचे होते. खासदार व आमदारांमध्येही त्यांच्या नातेवाईकांचा भरणा मोठा होता. मात्र करुणानिधींचा पक्षावरील व राज्यावरील दरारा असा की त्यांच्यावर टीकाही दबल्या आवाजात केली जायची. भ्रष्टाचारही होता. प्रत्यक्ष त्यांच्याविरुद्ध, त्यांच्या पत्नी व मुलांविरुद्ध आणि केंद्रातील त्यांच्या मंत्र्यांविरुद्ध चौकशी आयोग बसविले गेले व त्यातील काहींचे खटले अद्याप न्यायप्रविष्ट आहेत. मात्र या साºया गैरप्रकारांमुळेही करुणानिधींची लोकप्रियता कधी कमी झालेली दिसली नाही. तामिळनाडू विधानसभेवर ते १३ वेळा निवडले गेले. देशात सर्वाधिक काळ आमदार राहिल्याची नोंदही बहुदा त्यांच्याच नावावर असावी. ते अतिशय उत्तम वक्ते होते. त्याहून मोठे संघटक होते. चित्रपट व्यवसायाचा व त्यांचा संबंध प्रत्यक्ष आणि घनिष्ट होता. सत्तेवर असताना व नसतानाही त्यांचा जनसंपर्क कायम होता. टीकेएवढीच प्रशंसा आणि विरोधकांनी केलेल्या अवमानाएवढाच सार्वजनिक आदरही त्यांच्या वाट्याला आला. असे नेतृत्व आपल्यातून नाहिसे होणे ही समाजाएवढीच देशाचीही हानी आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन.

टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीTamilnaduतामिळनाडू