शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमधील सत्तासंघर्षाने लोकशाही झाली लाजिरवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:31 IST

त्यामुळे भारतीय जनता पार्टी कर्नाटकात पुरती चितपट झाली!

राज्यपालांच्या खांद्यावर स्वार होऊन मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेल्या येडियुरप्पांचे असे हसे होणार हे ठरलेलेच होते! पण, कल्पना करा, राज्यपालांनी दिल्याप्रमाणे येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करायला खरंच १५ दिवसांचा वेळ मिळाला असता तर काय झाले असते! तर येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदावर शाबूत राहिले असते, पण लोकशाही मात्र गलितगात्र होऊन कण्हत राहिली असती! लोकशाही आणि संविधानासाठी न्याय्य मार्ग सुकर केल्याबद्दल आपण सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानायला हवेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी कर्नाटकात पुरती चितपट झाली!पण खरा प्रश्न असा आहे की, निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल पलटवून सत्ता काबीज करण्याची एवढी हाव भाजपाला का लागली आहे? त्यांनी जनादेशाचा सन्मान करणे आवश्यक होते; कारण त्यांना फक्त १०४ जागा मिळाल्या व काँग्रेस (७८), जेडीएस (३७) अणि बसपा १ यांना मिळून ११६ जागा मिळाल्या, तरीही भाजपाने हट्टाने आपले सरकार स्थापन केले. यावरून स्पष्ट होते की, घटनाबाह्य पद्धतीने जनादेश पलटविण्याच्या आपल्या क्षमतेची या पक्षाला घमेंड होती. भाजपाचा हा बेशरमपणा संपूर्ण देश पाहत होता. राजकारणातील शुचितेची भाषा करणाऱ्या भाजपाला हे झालंय तरी काय, सत्तेसाठी ते लोकशाहीची अशी क्रूर थट्टा का करीत आहेत, सर्व विरोधी पक्षांना नेस्तनाबूत करण्याची खेळी का खेळत आहेत? असा प्रश्न लोकांना पडला होता.जग भारताला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखतो, हे आपल्याला विसरून चालणार नाही. जगाला लोकशाहीची देण भारताने दिली, याचा इतिहास साक्षीदार आहे. त्यामुळे आपल्या देशात लोकशाही मजबूत करणे ही आपली जबाबदारी ठरते.लिच्छवी राजांच्या काळात आताच्या संसदेप्रमाणेच लोकपरिषदा स्थापन केल्या जात. लिच्छवींच्या केंद्रीय परिषदेत ७,७०७ सदस्य असत. आताप्रमाणेच या परिषदेची ठराविक काळानंतर नियमित अधिवेशने व्हायची. या परिषदेत सर्व विषयांवर मोकळेपणाने चर्चा व्हायची. पण सहमती न झाल्यास मतदान घेतले जाई. मी लिच्छवी गणतंत्राचे उदाहरण देण्याचे कारण असे की, जगाला ज्याने लोकशाही व गणतंत्राचे पहिले धडे दिले व प्रदीर्घ काळाच्या गुलामीनंतर पुन्हा लोकशाहीचा अंगिकार केला त्याच भारतात या घटना होत आहेत, हे आपल्याला समजावे. असे घडणे लोकशाहीच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक आहे, याचीही आपल्याला जाणीव व्हावी.आपला देश स्वतंत्र झाल्यावर आपल्या नेत्यांनी असा निर्णय घेतला की, भारताची शासनव्यवस्था पूर्णपणे लोकशाहीची असेल. खूप परिश्रम घेऊन या शासनव्यवस्थेची पक्की घडी बसविली गेली. राज्यघटनेला गुलाम करून आपल्या मनमानीप्रमाणे वापरण्याचा प्रयत्न करण्याएवढे देशाचे राजकारण भविष्यात स्वार्थी, लोभी व लालची होईल, अशी कल्पनाही त्यावेळच्या राष्ट्रनेत्यांनी कधी केली नसेल. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाºयांना असे वाटले की, आपल्यासारखेच इमानदार व सेवाभावी लोक राजकारणात येतील. पण त्यांची ही भाबडी अपेक्षा खोटी ठरली. त्यामुळे एका शायरने अगदी चपखलपणे म्हटले आहे की...इल्मो अदब के सारे खजाने गुजर गएक्या खूब थे वो लोग पुराने गुजर गए!काळ बदलत गेला तशी राजकारण्यांना जाणीव झाली, राजकारण हा तर सरळसरळ व्यवसाय आहे, त्यात सेवाभाव कशासाठी हवा? त्यामुळे त्यांच्या दृष्टीने सत्ता ही सर्वात महत्त्वाची झाली. काही झाले तरी सत्ता सदोदित आपल्याकडेच असावी, हीच त्यांची महत्त्वाकांक्षी बनली. त्यामुळे त्यांनी आपल्या तालावर नाचेल अशी कार्यपालिका तयार केली. न्यायसंस्थेवर अंकुश ठेवणे सोपे नव्हते. तरीही आपले राजकारणी त्यासाठीही प्रयत्न करत राहिले. आपल्याकडे निरंकुश सत्ता राहावी यासाठी राजकारण्यांचे प्रयत्न चालूच असतात. पण आपल्याला न्या. चेलमेश्वर आणि त्यांच्या सहकाºयांचे यासाठी आभार मानले पाहिजेत की, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला दबावमुक्त ठेवण्यासाठी मोठे धाडसी पाऊल उचलले.आमच्या राज्यघटनेने बहुमताकडे सत्ता असण्याचा स्पष्ट मार्ग दाखविला आहे, मात्र राजकारण हे संविधानातील पळवाटा शोधत असते. राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, लोकसभा किंवा राज्यसभेचे सभापती हे पद नावालाच संवैधानिक राहिले आहे. या सर्वांच्या राजकीय भूमिकांनी इतिहासाची पाने नि पाने भरून गेली आहेत. खरे तर सर्वच जण तसे असतात असेही नाही. मी राज्यसभेत भैरोसिंग शेखावत, कृष्णकांतजी, कुरियन साहेब आणि व्यंकय्या नायडू यांची पारदर्शक कार्यशैली बघितली आहे. त्यांनी राजकारणापलीकडे जात संविधानाचे रक्षण करण्याचे कार्य केले आहे. त्याच वेळी अनेक उदाहरणे विरोधाभासी दिसतात. बहुतांश राज्यपालांनी ‘जिसकी लाठी उसकी भैंस’ ही म्हण आचरणात आणत डझनावर वेळा सत्तेला साथ दिली आहे. याच कारणामुळे केंद्रात सरकार सांभाळणारे पक्ष आपल्या पसंतीच्या राज्यपालांची नियुक्ती करतात. कारण वेळी-अवेळी ते कामाला येऊ शकतात. आपल्या पक्षाप्रति जवळीक असणे स्वाभाविक आहे. मात्र संवैधानिक पदांवर बसलेल्यांनी आपली निष्ठा कोणताही पक्ष किंवा नेत्यांसोबत नव्हे तर देशाचे संविधान आणि देशाच्या लोकशाहीप्रति बाळगायला हवी. चांगल्या लोकशाहीसाठी सशक्त विरोधी पक्ष असायला हवा, हे सत्ताधाºयांनी समजून घ्यायला हवे.हे लिखाण संपविण्यापूर्वी...चंद्रपूर जिल्ह्यातील चार आदिवासी तरुण-तरुणींनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याच्या बातमीने मी रोमांचित झालो. माझ्या प्रदेशातील युवकांनी ही धाडसी मोहीम फत्ते केली याने माझी मान अभिमानाने ताठ झाली. उमाकांत, मनीषा, कविदास आणि परमेश या एव्हरेस्टवीरांचे मनापासून अभिनंदन. हे चौघे इतरांसाठी स्फूर्ती ठरले आहेत. हिंमत आणि जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही!

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपा