शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

त्या मंडी टोळीचा बंदोबस्त कराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 1:22 AM

विनाकारण आरोप करून सनसनाटी निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव नाही.

राधाकृष्ण विखे पाटील ज्येष्ठ नेते आहेत. विनाकारण आरोप करून सनसनाटी निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळे त्यांनी विधानसभेत एका मंत्र्यावर गुंडांना पाठीशी घालत असल्याच्या केलेल्या गंभीर आरोपाची सरकारने तेवढ्याच तातडीने चौकशी करण्याची गरज आहे. ज्या टोळीचा विखे पाटील यांनी विधानसभेत उल्लेख केला, ती गुंडांची ‘मंडी टोळी’ निश्चितच यवतमाळची आहे. या टोळीकडे चार हजार शस्त्रे आहेत. जागा-घरे खाली करणे, खंडणी वसुली करणे, अवैध सावकारी, सुपारी घेणे असे सर्व उद्योग करणाऱ्या या कुख्यात टोळीला एका मंत्र्याचे पाठबळ आहे, असा गंभीर आरोप विखे पाटील यांनी प्रत्यक्ष सभागृहातच केला. ठोस पुरावे असल्याशिवाय विखेंसारखा ज्येष्ठ नेता असा खळबळजनक आरोप करणार नाही हे सरकारनेही लक्षात घेतले पाहिजे. विशेष म्हणजे त्यांनी ज्या मंत्र्याचा उल्लेख केला त्याचे नाव उघड करण्याचीही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे यातले सत्य बाहेर काढण्याची आणि योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी आपसूकच सरकारवर येऊन पडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि शालीन राजकारणी म्हणून ओळखले जातात. तेव्हा त्यांनी विखेंच्या आरोपांकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. सामान्य माणसाच्या मनात दहशत निर्माण करणाºया गुंडांच्या या टोळीचा बंदोबस्त करायला हवा. शिवाय त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या त्या मंत्र्याचे गुंडांना असलेले पाठबळ खुद्द मुख्यमंत्र्यांनीच मोडून काढायला हवे. यवतमाळकरांनीही या गुंडांच्या दहशतीला बळी न पडता निर्भीडपणे समोर आले पाहिजे. प्रसंगी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या पाहिजे. विशेष म्हणजे ज्या श्याम जयस्वाल आणि बंटी जयस्वालच्या नावांचा विखे पाटलांनी उल्लेख केला. त्यापैकी श्याम जयस्वाल हे यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असून त्यांच्यावर कोणतेच गंभीर गुन्हे नसल्याचे सांगत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी जयस्वालांचे जणू वकीलपत्रच घेतले की काय, असे वाटायला लागले आहे. बंटी जयस्वाल यांचा भाजपशी कुठलाही संबंध नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. विखे पाटलांनी आपल्या भाषणात ‘या’ मंत्र्याचे नाव उघड केले नसतानाही डांगे यांनी तातडीने पत्रपरिषद बोलावून यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांचा मंडी टोळीशी संबंध नसल्याचे सांगत संशयाला वाट मोकळी करून दिली आहे. विखे पाटलांनी याबाबतचे पुरावे असल्याचा दावा केला आहे. तेव्हा त्यांनी ते पुरावे खरोखरच जाहीर करायला हवे. लोकांपुढे या दहशतीची लख्तरे टांगायला हवी. तसे झाले नाही तर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेदेखील त्या गुंडांना घाबरतात की काय, असा संदेश जनतेत जाऊ शकतो. लोकशाहीत विरोधी पक्ष नेतेपद हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे आता विखे पाटलांची जबाबदारी स्वाभाविकच वाढली आहे.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील