शहरं
Join us  
Trending Stories
1
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
2
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
3
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
4
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
5
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
6
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
7
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
8
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
9
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
10
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
11
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
12
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
13
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
15
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
16
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
17
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
18
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
19
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
20
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:21 IST

पूजा संपन्न झाली़ नवदाम्पत्याने पुरोहिताच्या पायावर डोके टेकवले़ कल्याणमस्तु! कल्याणमस्तु! असा भरभरून आशीर्वाद पुरोहितांनी दिला़ धर्मकृत्य करणाऱ्यांना आशीर्वाद लाभतो़ धर्मकृत्य करणे ज्याला शक्य होत नाही तो कुणापुढे नतमस्तक होणार? त्या गरिबाला कोण आशीर्वाद देणार? ज्याला नतमस्तक होणे जमेल नाही त्याचा वाली कोण? रखवाला कोण? ‘जन हे सुखाचे। दिल्या घेतल्याचे’ आशीर्वादसुद्धा काहीतरी दिले तरच मिळतो.

- डॉ़ गोविंद काळेपूजा संपन्न झाली़ नवदाम्पत्याने पुरोहिताच्या पायावर डोके टेकवले़ कल्याणमस्तु! कल्याणमस्तु! असा भरभरून आशीर्वाद पुरोहितांनी दिला़ धर्मकृत्य करणाऱ्यांना आशीर्वाद लाभतो़ धर्मकृत्य करणे ज्याला शक्य होत नाही तो कुणापुढे नतमस्तक होणार? त्या गरिबाला कोण आशीर्वाद देणार? ज्याला नतमस्तक होणे जमेल नाही त्याचा वाली कोण? रखवाला कोण? ‘जन हे सुखाचे। दिल्या घेतल्याचे’ आशीर्वादसुद्धा काहीतरी दिले तरच मिळतो़ ‘कल्याण या आशीर्वादे। जाती द्वंद्वे नासोनि’ अशी आशीर्वादाची महती तुकाराम महाराज गातात़ जीवनातील किंकर्तव्यमूढतेचे द्वंद्व नाहीसे करण्याची ताकद केवळ आशीर्वाद या चार अक्षरात आहे़‘कल्याण’ शब्दाची परम कल्याण करणारी ताकद समर्थांनी ओळखली नव्हे तर अनुभवली होती़ माणुसकीचा गहिवर दाटून आल्यामुळेच तर त्यांना रामरायाला साकडे घालावे लागले़ विशालबुद्धीच्या व्यासांनासुद्धा वैताग आला असावा असे अनुमान करण्यास जागा आहे़ कळत नकळत का होईना पण ते लिहून गेले ‘न कश्र्चित् श्रुणोति माम्’ माझे कुणी ऐकतच नाही अशी खंत ते व्यक्त करतात़ समर्थ तर एक पाऊल व्यासांच्याही पुढे होते़ जनसामान्यांची चिंता समर्थांना अधिक लागली होती़ ते लिहिते झाले ‘अपराधी जन चुकतची गेले। तुझा तुची सावरी । कल्याण करी रामराया’ चुकीच्या मार्गावर पाऊल पडले! हजारो अपराध जनसामान्यांकडून झाले तरी त्यांना सावरले पाहिजे़जनहिताच्या चार गोष्टी सांगितल्या पाहिजेत़ त्यांचे दु:ख कोण हरण करणार? सगळेच हाताबाहेर चालले आहे़ चारशे वर्षांपूर्वी समर्थांनी जनसामान्यांची होणारी ससेहोलपट ओळखली होती़ ‘कोठे जावे काय करावे / आरंभिली बोहरी’ बोहरी म्हणजे सर्वनाश़ जनसामान्यांचे जगणे फार कठीण होत चालले आहे़ कठीण करिता कठिणची झाले’ अशावेळी रामराया तूच धावून आले पाहिजेस़ त्यांचे दु:ख निवारण केले पाहिजे़ समर्थ पुढे लिहितात़ ‘दास म्हणे आम्ही केले, पावलो/दयेसी नाही सरी’़आपदाम् अपहर्तारम् / दातारं सर्व संपदाम्’ हाच तर तुझा लौकिक़ यासाठी तर तुझा डंका पिटायचा. ‘राम राम इति गर्जनम़्’ आताचा काळ तर खूपच अवघड़ रामनामाचे सर्वांनाच वावडे़ राम भेटणार तरी कोठे? तुकोबाराय सरळ रामदूताला म्हणजे हनुमानालाच शरण गेले़ दूताच्या भक्तीची ताकद त्यांना माहीत होती़ ‘शरण शरण हनुमंता / तुज आलो रामदूता/ काय भक्तीच्या या वाटा/ मज दावाव्या सुभटा/

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकMaharashtraमहाराष्ट्र