शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, भाजपाची शक्तिपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:58 IST

शतप्रतिशत या भाजपाच्या विस्तारवादी भूमिकेचा कस काँग्रेसचा गड बºयापैकी शाबूत असलेल्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यात होणाºया पालिका निवडणुकांमध्ये लागणार आहे.

शतप्रतिशत या भाजपाच्या विस्तारवादी भूमिकेचा कस काँग्रेसचा गड बºयापैकी शाबूत असलेल्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यात होणाºया पालिका निवडणुकांमध्ये लागणार आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मोदी लाटेत नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात भाजपाने काँग्रेसला धक्का दिला असला तरी काँग्रेसने निम्म्या जागा टिकवून ठेवल्या होत्या. त्यानंतर झालेल्या शहादा पालिका निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भाजपाचे मोतीलाल पाटील निवडून आले असले तरी सभागृहात काँग्रेसचे वर्चस्व आहे. मुळात पाटील हे मूळ काँग्रेसी असून निवडणुकीपूर्वी ते भाजपामध्ये दाखल झाले आहेत. ही पार्श्वभूमी पाहता काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना ही निवडणूक एक आव्हान ठरणार आहे.नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर आणि तळोदा तर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या चार पालिकांसाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार असून प्रभागरचना व आरक्षण सोडत ही प्रक्रिया आटोपली आहे. चारही शहरांमध्ये निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. चारही पालिका काँग्रेस वा काँग्रेसशी संबंधित मंडळींच्या ताब्यात आहेत.सात प्रमुख नेत्यांभोवती ही निवडणूक केंद्रित राहणार आहे. त्यात रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित, आमदार उदेसिंग पाडवी हे भाजपाचे तर काँग्रेसचे माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख, सुरुपसिंग नाईक, अ‍ॅड.पद्माकर वळवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा समावेश आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राजकीय पक्ष आणि स्थानिक आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातात. परंतु अलीकडे भाजपाने ‘शतप्रतिशत’चा नारा दिल्याने येनकेनप्रकारेण भाजपाचा झेंडा लावण्यासाठी नेत्यांची व्यूहरचना सुरू झाली आहे. जयकुमार रावल यांच्यावर निवडणुकीची धुरा आहे. नंदुरबार जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आणि शिंदखेडा हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. शिंदखेड्यातील विद्यमान सत्ताधाºयांनी आता रावल यांच्याशी जुळवून घेतल्याने भाजपाला ते पथ्यावर पडले आहे. काँग्रेसचे हेमंत देशमुख आणि जिल्हाध्यक्ष श्याम सनेर या पारंपरिक स्पर्धकांशी त्यांचा याठिकाणी मुकाबला होईल. दोंडाईचातील पालिका देशमुखांच्या ताब्यातून हिरावल्याने रावल शिंदखेड्यात पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात आहेत. रावल यांना नंदुरबारमध्ये मात्र भाजपातील मतभेदांवर मात करीत यश मिळविण्याचे मोठे आव्हान आहे. राष्टÑवादीतून भाजपात आलेल्या डॉ.विजयकुमार गावित आणि कन्या डॉ.हिना गावित यांनी विधानसभा व लोकसभा निवडणूक जिंकली असली तरी निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना अद्याप स्वीकारलेले नाही. निष्ठावंत गटाचे नेतृत्व आमदार उदेसिंग पाडवी हे करीत असून भाजपा जिल्हाध्यक्ष निवडणूक, समन्वय समिती नियुक्तीवरून त्यांचे गावित पिता-पुत्रीशी खटके उडाले. शहादा पालिकेतील यशाच्या श्रेयावरुन गावित व पाडवी यांच्यात वाद झाले. गावित यांना मंत्रिपदाची अपेक्षा असून ते अद्याप न मिळाल्याने या निवडणुकीत ते कितपत सक्रिय राहतात, हा कळीचा मुद्दा आहे.गावित यांचे बंधू राजेंद्रकुमार हे राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत तर शरद हे नवापूरचे माजी आमदार आहेत. त्यामुळे गावित यांनी निवडणुकीत अलिप्त राहण्याचे ठरविले तरी त्यांचे समर्थक राष्टÑवादीच्या माध्यमातून सक्रिय होऊ शकतात. रावल यातून कसा मार्ग काढतात, त्यावर यशापयश अवलंबून राहणार आहे. आमदार पाडवी यांच्या मतदारसंघातील तळोदा पालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्याठिकाणी काँग्रेसच्या गडाला धक्के देण्यात यश येते की, पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी मंत्री पद्माकर वळवी हे विधानसभेतील पराभवाचे उट्टे काढतात, यावर पुढील राजकारण अवलंबून राहील.नंदुरबार आणि नवापूरमध्ये अनुक्रमे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे एकहाती वर्चस्व आहे. अर्थात सत्तांतराची पार्श्वभूमी आणि भाजपाची विस्तारवादी भूमिका लक्षात घेता यंदाची निवडणूक या दोन्ही नेत्यांना सोपी निश्चित नाही. थेट नगराध्यक्ष निवडणुकीमुळे बिगर आदिवासींना नेतृत्वाची संधी मिळणार असल्याने मोठी चुरस आतापासून जाणवू लागली आहे.- मिलिंद कुलकर्णी