शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

केवळ धूळफेक !

By admin | Updated: March 6, 2017 23:54 IST

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भयावह दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा हात होता

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भयावह दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा हात होता, अशी कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मुहम्मद अली दुर्रानी यांनी सोमवारी दिली. काही भारतीय प्रसारमाध्यमांच्या आॅनलाइन आवृत्त्यांमध्ये, दुर्रानी यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानचे पितळ उघडे पडले, पाकिस्तानने प्रथमच दहशतवादी कृत्यांमध्ये लिप्त असल्याची कबुली दिली, अशा आशयाचे मथळे झळकले आहेत. ‘सबसे तेज’ पत्रकारितेचा हा उत्कृष्ट नमुना म्हणायला हवा. दुर्रानी यांचे संपूर्ण वक्तव्य विचारात न घेताच, हे मथळे झळकविण्यात आले आहेत. मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा हात होता, अशी कबुली दुर्रानी यांनी दिली असली तरी, त्याचवेळी हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा हात नव्हता, अशी पुस्ती जोडायलाही ते विसरले नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. दुर्रानी यांचे संपूर्ण वक्तव्य विचारात घेतले, तर पाकिस्तानच्या आजवरच्या भूमिकेला छेद देणारा कोणताही शब्द त्यांनी उच्चारलेला नाही, हे सहज लक्षात येते. दहशतवादाच्या अगदी प्रारंभीच्या काळात, पाकिस्तानी भूमीवरून दहशतवादी संघटना कार्यरत असल्याचे तो देश नाकारत होता; मात्र पुढे आमच्या देशातील दहशतवादी संघटनांवर आमचा जोर चालत नाही आणि इतर काही देशांना त्यांच्या दहशतवादी कृत्यांचा जेवढा त्रास होता, त्यापेक्षा किती तरी अधिक त्रास आम्हालाच होतो, अशी भूमिका घ्यायला पाकिस्तान सरकारने प्रारंभ केला. सध्या नजरकैदेत असलेल्या हाफीज सईदच्या विरोधात कारवाई करायला हवी, या दुर्रानी यांच्या दुसऱ्या वक्तव्यातही हुरळून जाण्यासारखे काही नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर डोनाल्ड ट्रम्प आरूढ झाल्यानंतर, जगाच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी पाकिस्तानने सईदला नजरकैदेत ठेवले. ती जशी धूळफेक होती, तशीच सईदवर आणखी कडक कारवाईची जी गरज दुर्रानी यांनी प्रतिपादित केली आहे, तीदेखील धूळफेकच आहे. ‘सर्जिकल स्ट्राइक’, पाकिस्तानसोबतच्या सर्व वाटाघाटी थांबविणे आणि सिंधू जल करारानुसार भारताच्या वाट्याला आलेल्या संपूर्ण पाण्याचा वापर करण्यासाठी पावले उचलणे, या भारत सरकारच्या कृतींमुळे पाकिस्तानवर निर्माण झालेल्या दबावाचा परिपाक म्हणजे दुर्रानी यांचे वक्तव्य म्हणता येईल. आज अफगाणिस्तान पाकिस्तानच्या प्रभावातून बाहेर पडला आहे, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबियासारखे पाकचे कधीकाळचे जवळचे मित्र देश भारताच्या नजीक येऊ लागले आहेत, डोनाल्ड ट्रम्परूपी तलवार पाकच्या शिरावर लटकत आहे. या घडामोडींचा दबाव त्या देशावर दिसू लागला आहे. दुर्रानी यांच्या वक्तव्यांना ही किनार आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यामधून खूप मोठी अपेक्षा करणे, ही आपण आपल्याच डोळ्यात केलेली धूळफेकच ठरेल!