शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

केवळ धूळफेक !

By admin | Updated: March 6, 2017 23:54 IST

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भयावह दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा हात होता

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भयावह दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा हात होता, अशी कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मुहम्मद अली दुर्रानी यांनी सोमवारी दिली. काही भारतीय प्रसारमाध्यमांच्या आॅनलाइन आवृत्त्यांमध्ये, दुर्रानी यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानचे पितळ उघडे पडले, पाकिस्तानने प्रथमच दहशतवादी कृत्यांमध्ये लिप्त असल्याची कबुली दिली, अशा आशयाचे मथळे झळकले आहेत. ‘सबसे तेज’ पत्रकारितेचा हा उत्कृष्ट नमुना म्हणायला हवा. दुर्रानी यांचे संपूर्ण वक्तव्य विचारात न घेताच, हे मथळे झळकविण्यात आले आहेत. मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा हात होता, अशी कबुली दुर्रानी यांनी दिली असली तरी, त्याचवेळी हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा हात नव्हता, अशी पुस्ती जोडायलाही ते विसरले नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. दुर्रानी यांचे संपूर्ण वक्तव्य विचारात घेतले, तर पाकिस्तानच्या आजवरच्या भूमिकेला छेद देणारा कोणताही शब्द त्यांनी उच्चारलेला नाही, हे सहज लक्षात येते. दहशतवादाच्या अगदी प्रारंभीच्या काळात, पाकिस्तानी भूमीवरून दहशतवादी संघटना कार्यरत असल्याचे तो देश नाकारत होता; मात्र पुढे आमच्या देशातील दहशतवादी संघटनांवर आमचा जोर चालत नाही आणि इतर काही देशांना त्यांच्या दहशतवादी कृत्यांचा जेवढा त्रास होता, त्यापेक्षा किती तरी अधिक त्रास आम्हालाच होतो, अशी भूमिका घ्यायला पाकिस्तान सरकारने प्रारंभ केला. सध्या नजरकैदेत असलेल्या हाफीज सईदच्या विरोधात कारवाई करायला हवी, या दुर्रानी यांच्या दुसऱ्या वक्तव्यातही हुरळून जाण्यासारखे काही नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर डोनाल्ड ट्रम्प आरूढ झाल्यानंतर, जगाच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी पाकिस्तानने सईदला नजरकैदेत ठेवले. ती जशी धूळफेक होती, तशीच सईदवर आणखी कडक कारवाईची जी गरज दुर्रानी यांनी प्रतिपादित केली आहे, तीदेखील धूळफेकच आहे. ‘सर्जिकल स्ट्राइक’, पाकिस्तानसोबतच्या सर्व वाटाघाटी थांबविणे आणि सिंधू जल करारानुसार भारताच्या वाट्याला आलेल्या संपूर्ण पाण्याचा वापर करण्यासाठी पावले उचलणे, या भारत सरकारच्या कृतींमुळे पाकिस्तानवर निर्माण झालेल्या दबावाचा परिपाक म्हणजे दुर्रानी यांचे वक्तव्य म्हणता येईल. आज अफगाणिस्तान पाकिस्तानच्या प्रभावातून बाहेर पडला आहे, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबियासारखे पाकचे कधीकाळचे जवळचे मित्र देश भारताच्या नजीक येऊ लागले आहेत, डोनाल्ड ट्रम्परूपी तलवार पाकच्या शिरावर लटकत आहे. या घडामोडींचा दबाव त्या देशावर दिसू लागला आहे. दुर्रानी यांच्या वक्तव्यांना ही किनार आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यामधून खूप मोठी अपेक्षा करणे, ही आपण आपल्याच डोळ्यात केलेली धूळफेकच ठरेल!