शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

फक्त राजधानीच का?

By admin | Updated: April 4, 2016 02:32 IST

डिझेलचा वापर करणाऱ्या ऐषारामी मोटारींच्या नोंदणीवर राजधानी दिल्लीत याआधीच गेल्या डिसेंबरमध्ये लागू करण्यात आलेली बंदी पुढील आदेश होईपर्यंत तशीच

डिझेलचा वापर करणाऱ्या ऐषारामी मोटारींच्या नोंदणीवर राजधानी दिल्लीत याआधीच गेल्या डिसेंबरमध्ये लागू करण्यात आलेली बंदी पुढील आदेश होईपर्यंत तशीच सुरू ठेवण्याचा आदेश जारी करून सर्वोच्च न्यायालयाने आपण प्रदूषणाबाबत किती सजग आणि संवेदनशील आहोत याचाच प्रत्यय आणून दिला आहे. दिल्लीतील प्रदूषणाची पातळी धोक्याच्याही वर गेल्यानंतर साऱ्यांनाच खडबडून जाग आली होती. त्यावर दिल्ली सरकारने सम-विषम नोंदणी क्रमांकाची वाहने दिवसाआड रस्त्यावर येतील असा उपाय योजला आणि तो बऱ्यापैकी यशस्वीदेखील झाला. परंतु सर्वोच्च न्यायालयाची भूमिका अधिक कठोर होती. न्यायालयाने डिझेलवर चालणाऱ्या मोठ्या (२००० सीसीपेक्षा अधिक) खासगी मोटारींच्या नोंदणीवर तर बंदी लागू केलीच; शिवाय दिल्लीत येणाऱ्या मोलमोटारींवर प्रवेशबंदी आणि व्यापारी वाहनांवर ‘हरित कर’ लागू करण्याचादेखील आदेश दिला. एका पर्यावरणप्रेमीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर बोलताना भल्यामोठ्या मोटारी उडविणाऱ्यांवर अत्यंत कडक शब्दांत टीका करताना, ‘हे नवश्रीमंत लोक किंवा खासगी कंपन्या फुकटच्या देखाव्यासाठी उंची मोटारी वापरतात, पण आपल्या वापरण्याने अनेक सामान्य लोकांचे जगणे दुष्कर होऊन जाते, याची त्यांना फिकीर नसते’ असे उद्गार सरन्यायाधीश तीरथसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने काढले. सुनावणीत सहभागी होताना एका बड्या मोटार कंपनीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना त्यांच्या कंपनीच्या मोटारींमध्ये प्रदूषण रोखण्याची अत्याधुनिक यंत्रणा असल्याचे तर सांगितलेच; शिवाय पेट्रोलच्या तुलनेत डिझेल अधिक प्रदूषणकारी कसे, असा सवाल उपस्थित करण्याचाही प्रयत्न केला. पण खंडपीठाने त्यांचा युक्तिवाद साफ फेटाळून लावला. पेट्रोल-डिझेल यातील अधिक प्रदूषणकारी कोण याचा फैसला १९९८ सालीच झाला असून, तो सर्वोच्च न्यायालयानेच केला आहे आणि म्हणूनच तोपर्यंत दिल्लीत डिझेलवर चालणाऱ्या बसगाड्या काढून घेतल्या जाऊन त्यांच्या जागी ‘सीएनजी’वर चालणाऱ्या गाड्या धावू लागल्या, असेही खंडपीठाने ठणकावून सांगितले. आता यापुढे पेट्रोल-डिझेल वाद होणार नाही असे बजावून या विषयावरदेखील पडदा टाकला. दिल्ली शहर हे देशाच्या राजधानीचे असल्याने आणि तिथेच सर्वोच्च न्यायालयदेखील असल्याने हा जालीम पण उपयुक्त निर्णय तिथे होऊ शकला. पण आज देशातील इतर महानगरांमधील प्रदूषणाची स्थितीदेखील धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली असून, तिथेदेखील असा जालीम उपाय योजण्याची गरज आहे. विशेषत: देशाची व्यापारी आणि आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत!