शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

फक्त राजधानीच का?

By admin | Updated: April 4, 2016 02:32 IST

डिझेलचा वापर करणाऱ्या ऐषारामी मोटारींच्या नोंदणीवर राजधानी दिल्लीत याआधीच गेल्या डिसेंबरमध्ये लागू करण्यात आलेली बंदी पुढील आदेश होईपर्यंत तशीच

डिझेलचा वापर करणाऱ्या ऐषारामी मोटारींच्या नोंदणीवर राजधानी दिल्लीत याआधीच गेल्या डिसेंबरमध्ये लागू करण्यात आलेली बंदी पुढील आदेश होईपर्यंत तशीच सुरू ठेवण्याचा आदेश जारी करून सर्वोच्च न्यायालयाने आपण प्रदूषणाबाबत किती सजग आणि संवेदनशील आहोत याचाच प्रत्यय आणून दिला आहे. दिल्लीतील प्रदूषणाची पातळी धोक्याच्याही वर गेल्यानंतर साऱ्यांनाच खडबडून जाग आली होती. त्यावर दिल्ली सरकारने सम-विषम नोंदणी क्रमांकाची वाहने दिवसाआड रस्त्यावर येतील असा उपाय योजला आणि तो बऱ्यापैकी यशस्वीदेखील झाला. परंतु सर्वोच्च न्यायालयाची भूमिका अधिक कठोर होती. न्यायालयाने डिझेलवर चालणाऱ्या मोठ्या (२००० सीसीपेक्षा अधिक) खासगी मोटारींच्या नोंदणीवर तर बंदी लागू केलीच; शिवाय दिल्लीत येणाऱ्या मोलमोटारींवर प्रवेशबंदी आणि व्यापारी वाहनांवर ‘हरित कर’ लागू करण्याचादेखील आदेश दिला. एका पर्यावरणप्रेमीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर बोलताना भल्यामोठ्या मोटारी उडविणाऱ्यांवर अत्यंत कडक शब्दांत टीका करताना, ‘हे नवश्रीमंत लोक किंवा खासगी कंपन्या फुकटच्या देखाव्यासाठी उंची मोटारी वापरतात, पण आपल्या वापरण्याने अनेक सामान्य लोकांचे जगणे दुष्कर होऊन जाते, याची त्यांना फिकीर नसते’ असे उद्गार सरन्यायाधीश तीरथसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने काढले. सुनावणीत सहभागी होताना एका बड्या मोटार कंपनीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना त्यांच्या कंपनीच्या मोटारींमध्ये प्रदूषण रोखण्याची अत्याधुनिक यंत्रणा असल्याचे तर सांगितलेच; शिवाय पेट्रोलच्या तुलनेत डिझेल अधिक प्रदूषणकारी कसे, असा सवाल उपस्थित करण्याचाही प्रयत्न केला. पण खंडपीठाने त्यांचा युक्तिवाद साफ फेटाळून लावला. पेट्रोल-डिझेल यातील अधिक प्रदूषणकारी कोण याचा फैसला १९९८ सालीच झाला असून, तो सर्वोच्च न्यायालयानेच केला आहे आणि म्हणूनच तोपर्यंत दिल्लीत डिझेलवर चालणाऱ्या बसगाड्या काढून घेतल्या जाऊन त्यांच्या जागी ‘सीएनजी’वर चालणाऱ्या गाड्या धावू लागल्या, असेही खंडपीठाने ठणकावून सांगितले. आता यापुढे पेट्रोल-डिझेल वाद होणार नाही असे बजावून या विषयावरदेखील पडदा टाकला. दिल्ली शहर हे देशाच्या राजधानीचे असल्याने आणि तिथेच सर्वोच्च न्यायालयदेखील असल्याने हा जालीम पण उपयुक्त निर्णय तिथे होऊ शकला. पण आज देशातील इतर महानगरांमधील प्रदूषणाची स्थितीदेखील धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली असून, तिथेदेखील असा जालीम उपाय योजण्याची गरज आहे. विशेषत: देशाची व्यापारी आणि आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत!