शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीश न्या. जस्ती चेलमेश्वर यांच्या प्रकरणावरून न्यायालयानं होती, तीही घालविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:34 IST

सर्वोच्च न्यायालयात सर्व आलबेल नाही, याचे संकेत अलीकडच्या काळात अनेकदा मिळाले होते.

सर्वोच्च न्यायालयात सर्व आलबेल नाही, याचे संकेत अलीकडच्या काळात अनेकदा मिळाले होते. पूर्वी झालेले व न पटणारे निकाल शालीन पद्धतीने रद्द करण्याची न्यायालयीन प्रथा आहे. पण दुस-या न्यायाधीशांनी दिलेल्या निकालांवर न्यायासनावर बसून जाहीर टीका करण्याचे प्रकार हल्ली लागोपाठ घडले. खरे तर न्यायाधीशांनी त्यांच्या निकालपत्रांंतून बोलायचे असते. पण ते सोडून अवांतर बोलणारेच न्यायाधीश हल्ली पाहायला मिळतात. या कलुषित वातावरणात भर पडावी असे धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात घडले. निमित्त झाले दोन फौजदारी जनहित याचिकांचे. न्यायालयात दरवर्षी हजारो याचिका येत असतात. परंतु या याचिका खुद्द सरन्यायाधीशांच्या सचोटीवर दुरान्वयाने संशय घेणा-या होत्या. खरं तर त्यात तसा थेट आरोप नव्हता. पण तसा समज करून घेतला गेला. सर्वोच्च न्यायालयातील वकील संघटनेत दोन तट पूर्वीपासून आहेतच. पण या याचिकांमुळे न्यायाधीशांमध्येही परस्परांवरील अविश्वासाचे आणि मतभेदाचे बीज पेरले गेले. ‘कॉलेजियम’च्या कामावरून सरन्यायाधीशांशी फारसे सख्य नसलेले ज्येष्ठताक्रमातील दुसºया क्रमांचे न्यायाधीश न्या. जस्ती चेलमेश्वर यांच्यापुढे यापैकी एक याचिका आली. त्यांनी सर्वात ज्येष्ठ अशा पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने या याचिकेवर सुनावणी करावी, असा आदेश दिला. यामुळे जणू सरन्यायाधीशांच्या शेपटावर पाय पडला. त्यांनी लगेच दुसºया दिवशी निवडक चार न्यायाधीशांना बरोबर घेऊन एक घटनापीठ बसविले. खंडपीठांची रचना करणे, त्यावरील न्यायाधीश ठरविणे व एकूणच कोणत्या न्यायाधीशाने कोणते काम करावे हे ठरविणे हा फक्त सरन्यायाधीशांचाच अधिकार आहे, असे त्यांनी या घटनापीठाकरवी जाहीर करवून घेतले. वस्तुत: तसे करणे अनाठायी होते. कारण सरन्यायाधीश प्रशासकीय बाबींमध्ये प्रमुख असतात, हे सर्वमान्य तत्त्व आहे. परंतु न्या. चेलमेश्वर यांनी दिलेला आदेश निष्प्रभ करण्यासाठी सरन्यायाधीशांना हे करावेसे वाटले यावरूनच ते या याचिकांनी निष्कारण किती अस्वस्थ झाले होते, हेच दिसते. बरे हे करत असताना त्यांनी आक्षेपार्ह आदेशास थेट हात घातला नाही. तो अन्वयार्थाने रद्द होईल, अशी व्यवस्था केली. हेच त्यांना प्रशासकीय अधिकारात पडद्यामागूनही करता आले असते. पण ते न्यायासनावर बसून केले गेल्याने न्यायाधीशांमधील विसंवाद चव्हाट्यावर आला. नंतर यापैकी एका याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी तीन न्यायाधीशांचे एक विशेष पीठ घाईगर्दीने नेमले गेले. या विशेष पीठाने याचिका फेटाळताना याचिकाकर्ते व त्यांचे वकील यांच्या वर्तनाबद्दल तीव्र शब्दांत नाराजी नोंदविली. परंतु त्यांना न्यायालयीन बेअदबीबद्दल अद्दल घडविण्याचे धारिष्ट्य त्यांनी दाखविले नाही. एरवी न्यायालयात दाखल होणारी शेकडो प्रकरणे वर्षानुवर्षे पडून असतात व नंतर ती कालौघात निरर्थक ठरून संपुष्टात येतात. या याचिकांचीही तशीच गत करणे शक्य होते. पण त्यांची ज्या पद्धतीने तत्परतेने दखल घेतली गेली त्यावरून ‘खाई त्याला खवखवे’ असा संशय घेतला गेला. सरतेशेवटी ज्या बोटचेपे पद्धतीने या प्रकरणावर पडदा टाकला गेला त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने थोडी फार शिल्लक असलेली आब व प्रतिष्ठाही गमावली. उचापतखोर पक्षकार आणि त्यांचे वकील आपले अंतस्थ हेतू साध्य करून घेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग करून सहीसलामत सुटू शकतात, हा यातून गेलेला संदेश निकोप न्यायव्यवस्थेसाठी निश्चितच भूषणावह नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय