शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

पठाणकोट वायुसेना विमान स्थळावर जैशे मुहम्मदचा हल्ला

By admin | Updated: January 4, 2016 22:38 IST

पंजाबमधील पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर तीन दिवसांपासून सुरु असलेल्या दहशतवाद्यांशी दोन हात करताना आपल्या शूर वीर सैनिकांचा त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि बलिदान पाहून हळह्ळ तर होतेच

- ब्रिगेडियर एस. एम. जोशी (निवृत्त)
 
पंजाबमधील पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर तीन दिवसांपासून सुरु असलेल्या दहशतवाद्यांशी दोन हात करताना आपल्या शूर वीर सैनिकांचा त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि बलिदान पाहून हळह्ळ तर होतेच, पण आपल्या ‘नेता’ आणि ‘बाबू’ लोकांना प्रत्येक वेळी तीच घोडचूक करायची हुक्की कशी येते हे विस्मयजनकच आहे ! 
 
पहिली घोडचूक  
पोलिस सुपरीनटेन्डेन्ट  सलिंदर सिंग यांनी, जेव्हा जैशे मुहम्मदच्या अतिरेक्यांनशी त्याची इनोव्हा बळकावून झालेल्या प्रकरणावर सूचना दिली तेव्हाच आपल्याला जागरूक होवून कळायला हवं होते, की पाकिस्तानचा ISI चा proxy जैशे मुहम्मदला, शिखंडी करून, त्यांच्या कराचीच्या नौकादळ विमानस्थळवर तालिबान आक्रमणाची पुनरावृत्ती, आपल्या पठाणकोटच्या वायुसेनेच्या विमानतळावर डावसाधून हल्ला करणार आहे. लगेच वेळ न घालवता जवळच्या इन्फंट्री ब्रिगेड नी, त्याच रात्री आपल्या Quick Reaction Teams ना त्याच्या बाहेरच्या बाजूने परिक्रमेवर विळखा घालून, Perimeter Wire Fence & Wall, अभेद्य करायला हवी होती. एकदा अतिरेकी आत घुसले, त्यानंतर आता ६४ तास झाले आणि तरी कमीत कमी दोन अतिरेकी लढत देत होते, शेवटी आज संध्याकाळी सुमारे चार वाजेपर्यन्त त्यांना कंठस्नान घालण्यात आले . आपण NSG चे Bomb Disposal Unit निष्णात लेफ्टनंट करनल निरंजन कुमार, होनोररी मेजर, सूबेदार फतेह सिंह (कॉमनवेल्थ गेम्स स्वर्ण व रजत पदक विजेते) आणि पाच शूरवीर जसे की गरुड कमांडो गुरसेवक सिंह, हवलदार राणा, हुतात्मा झाले.
 
दुसरी घोडचूक
अतिरेक्यांची आपल्या handlers/ commanders शी पाकिस्तानचे मोबाईल वर संभाषण आपल्या Intelligence units नी intercept केले होते. ह्याचा सदुपयोग पूर्णपणे आपण घेतला नाही. इतका दारुगोळा, मशीनगन, रॉकेट लोन्चर, हातगोळे घेउन ते सहा अतिरेकी, उंच भिंत चढून, आत शिरले, ही एक मोठी विफलता, आपण कबूल केली पाहिजे.
 
पहिली मोठी सफलता
अतिरेकी आत घुसले पण त्यांना आपल्या थल सेना, NSG आणि वायुसेना कमांडोनी मिग २१ फायटर विमान, आणि मी ८, मी ३५ व इतर विमाना जवळ जाऊ दिले नाही. 
 
दुसरी मोठी सफलता
अश्या आणि बाणी च्या प्रसंगी पूर्ण देश परत एकजूट झाला, आपले ‘नेता’ वगळून. अजित डोवल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नी , नेहमी प्रमाणे उत्तम कामगिरी बजावली आहे, पण ते CDS (Chief of Defence Staff) नाही आहेत. ते Intelligence आणि, राजकिय पातळीवर सुरक्षा वर पाहणी करतात. शत्रु शी कशे झुंजावे हे Chief of Defence Staff कडेच असावे. ह्या घटने मुळे परत आपल्या उच्चस्तर सुरक्षाव्यवस्थे वर परत प्रश्न चिन्ह उठले आहे.     
           
भारताची उच्च स्तर सुरक्षा व्यवस्थाच्या अत्यावश्यक सुधारणा...
चेयरमन चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे (COSC) अध्यक्ष की चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS)
१. आज,  ०४ जानेवारी २०१६ ला, ऐयर चीफ मार्शल अरुप राहा, वायु सेना अध्यक्ष आहेत. ते, तिन्ही सेनापतीत सगळ्यात आधी, आपल्या सर्विस चे अध्यक्ष झाले होते, म्हणून चेयरमन चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे (COSC) अध्यक्ष पण आहेत. पण असं पुष्कळदा नसते, की, जो  सेनाधीश सगळ्यात आधी आपल्या स्वतः च्या सेनेचा अध्यक्ष झाला असेल, तो तिन्ही सेना अध्यक्ष मध्ये सगळ्यात सीनियर पण असेल. मुख्य म्हणजे, आजच्या सामरिक सुरक्षा वातावरणात ह्या दोन्ही जबाबदाऱ्या एकानेच सांभाळणे अत्यंत अवगढ असते. म्हणून, सगळ्या आधुनिक मोठ्या गणतंत्र देशातील सर्वोच्च सेनापतीपद, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) कडे असते. हे गृहितच आहे की, तो तिन्ही सेन्ध्याक्षांचा पण सेनापती असतो, आणि त्यांना अनुभव आणि पदाने सीनियर असतो.
२. ‘बाबू’ लोकांना हे नको आहे, कारण त्यांना वाटते की चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS), थेट रक्षा मंत्री आणि पंत प्रधानांशी सम्पर्क साधेल आणि त्यांचे महात्म्य कमी होईल. पण ह्या सुधाराची अत्यंत तातडीने गरज आहे, आधीच फार उशीर झालाय! आधुनिक युध्द त्रिदलानी पूर्ण पणे एकत्रित होऊन लढावे लागणार आहे. १९७१चे चमत्कार २०१६च्या वातावरणात जुन्या व्यव्स्थेनी करणे असंभव आहे. ‘बाबू’ लोकांनी नेत्यांच्या मनात जी १९४७ पासून भीती भरली आहे की त्रिद्लाचा मुख्य पूर्ण सत्ता आपल्या हाती घेईल, एकदम हास्यास्पद आहे...___
पंत प्रधानांचे त्रिदलाचे सर्वोच्च अधिकाऱ्यांना नुकतेच केलेले राष्ट्रीय सुरक्षा संबंधी वार्षिक संभाषण..
 
३. पंतप्रधानानी आपल्या वार्षिक भाशणात स्पष्टपणे दर्शवले की आपल्या देशा समोर मुख्यता चीन, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगानिस्तान पासून कितपत धोका आहे आणि त्याबद्दल आपण तयारी करायला हवी आणि अत्यंत सावध असावे.  तरीसुद्धा अडथळे, अतिरेकी हल्ले होण्याची पण पूर्ण शक्यता आहे. नेपाळ च्या नुकत्याच झाल्येल्या निवडणूकीत, त्यांचे सहा वर्षे सतावणारे प्रश्न सोडवायचे सोडून, अधिकच गुंतवले आहेत. नवीन संविधान सभा त्रिशंकू आहे. मधेसी समस्या, परत नेपाळ ला चीन च्या पाशात जायला बाध्य करणार असे वाटते
४. बांगलादेशच्या निवडणूकीत, शेख हसीना नी  बेगम खालिदा झिया ला हरवून हाती परत सत्ता घेतली. बेगम खालिदा झिया ची भारत विरोधी अतिरेक्यांशी साठगाठ आहे, आणि तिथून आपल्याला अत्यंत सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. श्रीलंकेशी पण तमिळ लोकांच्या वर अत्याचार, पंत प्रधानांचे CHOGM चे कोलंबो मीटिंगला न गेल्या मुळे वाद, आपल्या नाविकांचा छळ, ह्या वादामुळे आपले सम्बंध चिघळले आहेत. आपल्या उत्तर पश्चिम आणि 
मध्य पश्चिमे कडे जे तालिबान/ अल कायदा अतिरेक्यांचा तांडव माजलाय, त्याने भारतीय मुळच्या ७० लाख लोकांना दुबई, कुवेत आणि पूर्ण इराणी ‘गल्फ’ मध्ये आपली जीविका/ नोकऱ्या सोडा, जीवाला पण धोका आहे.
५. पंतप्रधान अपल्या समुद्र वाहतुकीची सुरक्षा बद्दल सुद्धा स्पष्ट म्हणाले, आपल्या सामरिक गर्जीच्या तेल, खनिज आणि इंजिनियरी यंत्र/ तंत्र च्या आदान/ प्रदान मध्ये व्यत्यय कदापि नाही यायला पाहिजे. एशिया/ प्रशांत सागर भागात चीन, जापान, दक्षिण कोरिया मध्ये तणाव वर सुद्धा त्यांनी सूक्ष्म लक्ष ठेवण्यावर भर घातली. विमान वाहक पोत ‘विक्रमादित्य’ (  नाविन्याने तैय्यार केलेले Aircraft Carrier, Soviet ‘Admiral Gorshkov’) नी आपले नौदल बलाढ्य झाले आहे, पण चीन ची ह्या क्षेत्रात प्रगति आपल्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. ‘तेजस’ , आपले स्वतः चे नवीन सुपरसोनिक जेट विमान, वायू सेनेच्यात वापारण्या करता अजून पुष्कळ वेळ आहे.
६.त्यांनी सगळ्या मिलिटरी कमांडर ना आपल्या देशाची सामरिक शस्त्रास्त्रे स्वतः बनवण्याचे सामर्थ्य वाढव्ण्याकडे लक्ष देण्यास आवर्जून आव्हान केले. रक्षा मंत्रालय, त्रिदल आणि रक्षा अनुसंधान नी एकत्र येऊन हे साधायला पाहिजे. ह्यात प्राइव्हेट, पब्लिक सेक्टर च्या ताकतीला पण पणाला लावायला हवे.
 
पंतप्रधानांचे वक्तव्य आणि प्रतय्क्ष करणीत विरोधाभास
 
७.पूर्व कॅबिनेट सचिव नरेश चन्द्रांच्या अध्यक्षतेत एक टास्क फोर्स निर्माण केले होते ह्याच देशाच्या  सुरक्षे वरच्या त्रुटी सुधारण्या करता. सामरिक प्रद्योगिकी क्षेत्रात त्यांनी रक्षा फेक्टरी मध्ये FDI(Foreign Direct Investment) वाढ करण्याचे सुचवले होते. पण त्या वेळचे रक्षा मंत्री अन्तोनी नी २६% च्या वर FDI वाढवणे नकारले. सगळे विदेशी शस्त्र निर्माणकर्ते ‘चोर’ नसतात. कारगिलच्या युद्धात १५५ मि.मि. होवित्झर ‘बोफोर्स’ नी उत्तम कामगिरी केली होती. पण आपण त्यांना ‘ब्लेक लिस्ट’ केले होते, आणि गर्जेपोटी १९९८ मधे तीनपट किंमत देवून आपणाला त्याचे अम्युनिशन आणावे लागले! आपणास तेव्हां हे पण कळले की करारा प्रमाणे स्वीडन ने आपणास सगळी Technology Transfer ची माहिती दहा वर्ष आधीच दिली होती, आणि आपण दोन दशक राजकारणे पोटी ही उत्तम तोफ स्वतः बनवण्याची संधी गमावली होती.
८.पंतप्रधान (वित्त मंत्री जेटली मुळे) नी रक्षा मंत्रालय चे बजेट पण कमी होण्याची शक्यता बद्दल इशारा केला. पण तो आधीच आपल्या GDP चा दोन प्रतिशतच आहे, आणि आपण चीन आणि आपल्या मधे जो अत्यंत मोठा आणि सतत वाढत चाललेला अंतर कसा आवरू हा प्रश्न महत्वाचा आहे. पंत प्रधान देशाचे CEO आहेत. कन्सल्टन्ट नाहीत. एकदा तुम्ही देशाची सुरक्षा व्यवस्थेची समीक्षा केली, त्यातून ज्या समस्या आणि त्यांचे निवारण सुद्धा तुमचेच परम कर्तव्य आहे. आता तुम्ही फक्त भाषण करणारे नाही राहिलात? पण तुम्ही मे २०१४ पासून आमचे पंतप्रधान आहात!
९. शेवटी, परत आचार्य अत्रे जे म्हणाले होते, तेच आपल्या ‘नेता’ ना सांगावे असे वाटते, ‘नेता. कुठे नेता?’ ह्या वेळी जें हुतात्मे झाले, त्यांच्या अंत्येष्टी संस्कार साठी ‘हे नेते’ ‘Photo Op’ करता दिसले. मला एवढेच   म्हणायचे आहे की त्यां हुतात्म्यांच्या विधवा आणि आप्तजनांची योग्य ते पेंशन, शिक्षण, भविष्य, ह्याच्या कडे पण लक्ष द्या ! जेंव्हा हा प्रश्न येतो, अशे ‘नेता’ फ़्क़्त ‘बाबू’ लोकांच ऐकतात, आणि १९४७ पासून जी दुर्दशा सुरक्षा सैनिकांची ह्या ‘बाबू’ लोकांनी केली आहे, हे बघून चीन, पाकिस्तान ची फौज कशी हसत असेल ते म्हणायलाच नको.