शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जावेद, लता, शबाना... आणि पाकिस्तान! कितीही कडवे असू दे, खरे आहे ते...

By विजय दर्डा | Updated: February 27, 2023 08:46 IST

लाहोरमधल्या फैज महोत्सवात जावेद अख्तर यांनी आपल्या खास झोंबणाऱ्या शैलीत पाकिस्तानला आरसा दाखवला, हे उत्तमच झाले!

- विजय दर्डा चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

जिधर जाते हैं सब, जाना उधर अच्छा नहीं लगता मुझे,पामाल रस्तों का सफ़र अच्छा नहीं लगता,ग़लत बातों को ख़ामोशी से सुनना, हामी भर लेना,बहुत हैं फ़ायदे इसमें मगर अच्छा नहीं लगता...- सुप्रसिद्ध गीतकार, शायर आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांचा हा शेर त्यांना स्वत:लाच सर्वाधिक लागू पडतो. पाकिस्तानात जाऊन  झोंबणाऱ्या शैलीत ते खुलेआम खरे ते बोलले, ते त्यांचे व्यक्तिमत्त्वच आहे. बऱ्याच वर्षांपासून त्यांची आणि माझी मैत्री आहे, त्या हक्काने मी सांगतो, कितीही कडवे असू दे, खरे आहे ते तोंडावर स्पष्ट सांगायला जावेदभाई मागेपुढे पाहात नाहीत. सुप्रसिद्ध शायर फैज अहमद फैज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  लाहोरमध्ये आयोजित केलेल्या सातव्या फैज महोत्सवात एका प्रेक्षकाने जावेदभाईंना  म्हटले ‘हिंदुस्थानात जाऊन सांगा, पाकिस्तान मित्र आहे, तो प्रेम करणारा देश आहे.’

त्यांच्याजागी दुसरा कुणी असता तर प्रसंग साजरा करायचा म्हणून सहज म्हणाला असता, ‘जी जरूर’.. पण विचारणाऱ्याच्या मनातला हेतू बरोबर ओळखून जावेदभाई म्हणाले, ‘एकतर आपण दोघांनी एकमेकांवर दोषारोप करू नयेत. वातावरण निवळले पाहिजे, हे तर खरेच! आम्ही  मुंबईत राहातो. आमच्या शहरावर झालेला दहशतवादी हल्ला आम्ही पाहिला आहे. हल्ला करणारे नॉर्वे किंवा तुर्कस्थानातून आलेले नव्हते. ते लोक  इथे पाकिस्तानात खुलेआम फिरत आहेत...’

जावेद अख्तर इथेच थांबले नाहीत. ते म्हणाले, ‘हिंदुस्थानने तर नुसरत फतेह अली खान, मेहंदी हसन यांच्यासारख्या पाकिस्तानी कलाकारांचे जोरदार स्वागत केले; पण पाकिस्तानने लताजींना कधी प्रेमाने बोलावले नाही...’

- खरेतर, ही प्रत्येकच भारतीयाच्या मनातली भावना होय! दक्षिण आशिया एडिटर्स फोरमचा अध्यक्ष या नात्याने आणि संसदीय प्रतिनिधी मंडळात सहभागी होऊन पाकिस्तानात अनेकदा जाण्याची संधी मला मिळाली.  एकदा माझ्याबरोबर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि पंजाब केसरीचे तत्कालीन संपादक अश्विनीकुमार चोपडाही होते. अशाच एका भेटीत पाकिस्तानचे तत्कालीन प्रमुख परवेज मुशर्रफ यांना मी विचारले होते; ‘आपण कधीच लताजींना का नाही बोलावले? मेहंदी हसन, गुलाम अली, साबरी बंधू, नुसरत फतेह अली खान किंवा अबिदा परवीन; या सगळ्यांचा हिंदुस्थानात भरपूर सन्मान झाला.’ 

- ‘लताजींचा कार्यक्रम करावा इतके मोठे मैदान आमच्याकडे नाही’, असे सांगून परवेज मुशर्रफ यांनी उत्तर देण्याचे टाळले होते.एका लाहोर दौऱ्याच्या वेळी तेथील पत्रकारांनी मला विचारले होते, दोन्ही देश एकदमच स्वतंत्र झाले. दोघांत फरक काय आहे?मी म्हणालो, ‘आमच्याकडे गांधीजी आहेत, आपल्याकडे नाहीत. आमच्याकडे वृत्तपत्रे स्वतंत्र आहेत, आपल्याकडे वृत्तपत्र स्वातंत्र्य नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आमचा कोणीही नेता आपले घर भरण्यासाठी अन्य कुणाच्या हातचे बाहुले बनून आपल्या देशाची विक्री करत नाही!’

पाकिस्तानी जनता भले भारताशी मैत्रीच्या गोष्टी करत असेल; पण तेथील राज्यकर्त्यांची संपूर्ण दुकानदारी भारत विरोधावरच चालते. भारत विरोधाची ही मात्रा जनतेला चाटवणे बंद केले गेले, तर त्या भुकेल्या देशात विद्रोह उसळेल. आज तिथे पिठासाठी रांगा लागत असून सगळीकडे हाहाकार माजला आहे. भारताने पाकिस्तानला मदत केली पाहिजे, असे सगळे जण म्हणत असले तरी  बिलावल यांच्यासारख्या बालीश राजकारण करणाऱ्या नेत्यांनी भारताविरुद्ध आग ओकणे थांबवलेले नाही. असे असताना मैत्रीच्या पोकळ गप्पांचा काय उपयोग?

जावेदभाई पाकिस्तानमधून बाहेर पडताच तिथले एक अभिनेते, निर्माते इजाज असलम यांनी ट्वीट केले, ‘जावेद अख्तर यांच्या मनात जर इतकी घृणा आहे तर त्यांनी इथे यायलाच नको होते. तरीही उपकार माना, आम्ही त्यांना इथून सुरक्षितपणे जाऊ दिले. पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे, असे त्यांना वाटत असेल तर ते आमच्या देशात आलेच का?’ 

- आपल्या घरी आलेल्या पाहुण्याच्या बाबतीत  बोलताना ही अशी भाषा? या उद्धटपणामुळेच पाकिस्तान आज संकटात सापडला आहे. फैज महोत्सवामध्ये कुणा अज्ञात प्रेक्षकाचा हवाला देऊन सूत्रसंचालकाने जावेदभाईंना विचारले, ‘शबाना आजमी यांच्याशी आपली मैत्री जास्त आहे की प्रेम?’

जावेदभाई सहज म्हणाले, ‘ज्यामध्ये मैत्री नाही, ते प्रेम कसले? आणि ज्यात सन्मान, आदर नाही ती मैत्री तरी खरी कशी?’ - पुढे ते हसून म्हणाले, ‘हमारी दोस्ती इतनी अच्छी, की शादी भी कुछ ना बिगाड पायी! एकमेकांबद्दल काही वाटत नसेल, आत्मसन्मान सांभाळला जात नसेल तर दोन माणसे कधीही आनंदी राहू शकत नाहीत. वर्षानुवर्षे दोघांतला एक नाखुश राहिला आहे. तेव्हा हे खरे, की वाईट सवय लागली आहे. बहुत तकलीफ होगी, लेकिन सुधर जाइए!’  

रीतिरिवाजांच्या बहाण्याने घराच्या चार भिंतीत कैद करून ठेवले जाते, स्त्रियांना केवळ उपभोगाची वस्तू मानले जाते; या अस्वस्थ वास्तवावर त्यांनी नेमके बोट ठेवले. ते म्हणाले, ‘ये  दुनिया इन्सानोंका क्लब है, किसीके पास भी इसकी स्थायी सदस्यता नही है। पहिल्यांदा इथे आलेल्या माणसांनी जे घडवले त्याचा फायदा आपल्याला मिळतो आहे. किमान जे परंपरेने मिळाले, ते तरी नष्ट करू नका!’जावेदभाई, वसुधैव कुटुंबकम् हे जीवनाचे सूत्र असलेल्या  एखाद्या भारतीय माणसाकडेच विचारांची अशी विशालता असू शकते. तरीही लोक आपल्यावर हल्ला करायला टपलेले असतात, याचे वाईट वाटते! तुम्हीच लिहिले आहे ना...पंछी नदियां पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके,सरहदें इन्सानों के लिये है, सोचो तुमने और मैने क्या पाया इन्सां होके...

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरPakistanपाकिस्तान