शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

जातविरहित स्त्रीमुक्ती चळवळ, स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:54 IST

‘स्त्री शिकली तर आमची कुटुंब व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल’, असे कुजकट विचार स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत अग्रेसर असलेल्या एका राष्ट्रीय पुढा-याने व्यक्त केले होते.

‘स्त्री शिकली तर आमची कुटुंब व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल’, असे कुजकट विचार स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत अग्रेसर असलेल्या एका राष्ट्रीय पुढा-याने व्यक्त केले होते. त्यामुळे केवळ समाजच नाही तर समाज जागरणाची धुरा ज्यांच्यावर आहे अशी पुढारलेली माणसेदेखील महिलांबद्दल असे प्रतिगामी विचार करीत असल्याने स्त्रीमुक्तीच्या चळवळीला सुरुवातीपासूनच अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे. आजच्या अत्याधुनिक काळात स्त्री शिकली, किंबहुना पुरुषांपेक्षाही आज ती विविध क्षेत्रात अग्रेसर असली तरी आजही तिला लिंगभेदाच्या त्रासाला सामोरे जावे लागत असते. उच्चशिक्षित म्हणवून घेतलेल्या समाजातही त्यांना हा त्रास सहन करावा लागत असतो. अलीकडेच नागपुरात पार पडलेल्या महिला क्रांती परिषदेत या विषयावर व्यक्त झालेली चिंता आपण सा-यांनाच अंतर्मुख करणारी जशी आहे तशीच ती स्त्रीमुक्तीच्या चळवळीला पुढे नेणारी देखील आहे. अगदी पुराणकाळापासून समाजाने स्त्रियांवर दास्यत्व लादले आहे. महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतीमुळे स्त्रिया शिकल्या आणि सबंध देशात स्त्रीमुक्तीची चळवळ व्यापक झाली. पण अजूनही स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत नाही. स्त्री, मग ती कुठल्याही जातीची असो तिला लिंगभेद सहन करावाच लागतो. ती उच्च जातीची असेल तरी तिला हा त्रास होतोच. परंतु दलित समाजाच्या स्त्रीला होणारा त्रास हा तिहेरी स्वरुपाचा असतो. ती स्त्री आहे म्हणून कुटुंबात होणारा त्रास, दुसरा ती दलित आहे म्हणून आणि तिसरा ती गरीब आहे म्हणून. जातिव्यवस्थेमुळे भारतात लिंगभेदाचे स्वरूप भिन्न आहे. मात्र सर्वच जाती आणि स्तरातील स्त्रियांना हा छळ सहन करावाच लागतो. पण खेदाची बाब अशी की, स्त्रियांवर होणाºया अत्याचाराच्या प्रश्नांवरही जातीभेद आणि वर्णभेद पाळला जातोच. त्यामुळे लिंगभेदाविरुद्धच्या चळवळीत समस्त स्त्रीवर्ग एकवटू शकत नाही. गडचिरोली किंवा मेळघाटातील आदिवासी स्त्रियांचे प्रश्न स्वतंत्रपणे का चर्चिले जात नाही? ही चर्चा केवळ कुपोषण आणि नक्षलवादातून निर्माण होणाºया प्रश्नांभोवती का फिरत राहते? मजूर म्हणून काम करणाºया निरक्षर महिला किंवा कार्यालयात काम करणाºया उच्च शिक्षित महिला असो, या सर्वांना होणारा पुरुषी मानसिकतेचा त्रास हा सारखाच असतो. पण त्याची चर्चा एका व्यासपीठावर, एका आंदोलनातून होत नाही. एका जातीच्या महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत दुसºया जातीतील स्त्रियांचे मौन हा देखील एक गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे स्त्रीमुक्तीची चळवळ ही जातविरहित असणे नितांत गरजेचे आहे. नागपुरातील महिला क्रांती परिषदेतील चिंतनाचे हे सार आहे.

टॅग्स :Womenमहिला