शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जातविरहित स्त्रीमुक्ती चळवळ, स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:54 IST

‘स्त्री शिकली तर आमची कुटुंब व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल’, असे कुजकट विचार स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत अग्रेसर असलेल्या एका राष्ट्रीय पुढा-याने व्यक्त केले होते.

‘स्त्री शिकली तर आमची कुटुंब व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल’, असे कुजकट विचार स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत अग्रेसर असलेल्या एका राष्ट्रीय पुढा-याने व्यक्त केले होते. त्यामुळे केवळ समाजच नाही तर समाज जागरणाची धुरा ज्यांच्यावर आहे अशी पुढारलेली माणसेदेखील महिलांबद्दल असे प्रतिगामी विचार करीत असल्याने स्त्रीमुक्तीच्या चळवळीला सुरुवातीपासूनच अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे. आजच्या अत्याधुनिक काळात स्त्री शिकली, किंबहुना पुरुषांपेक्षाही आज ती विविध क्षेत्रात अग्रेसर असली तरी आजही तिला लिंगभेदाच्या त्रासाला सामोरे जावे लागत असते. उच्चशिक्षित म्हणवून घेतलेल्या समाजातही त्यांना हा त्रास सहन करावा लागत असतो. अलीकडेच नागपुरात पार पडलेल्या महिला क्रांती परिषदेत या विषयावर व्यक्त झालेली चिंता आपण सा-यांनाच अंतर्मुख करणारी जशी आहे तशीच ती स्त्रीमुक्तीच्या चळवळीला पुढे नेणारी देखील आहे. अगदी पुराणकाळापासून समाजाने स्त्रियांवर दास्यत्व लादले आहे. महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतीमुळे स्त्रिया शिकल्या आणि सबंध देशात स्त्रीमुक्तीची चळवळ व्यापक झाली. पण अजूनही स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत नाही. स्त्री, मग ती कुठल्याही जातीची असो तिला लिंगभेद सहन करावाच लागतो. ती उच्च जातीची असेल तरी तिला हा त्रास होतोच. परंतु दलित समाजाच्या स्त्रीला होणारा त्रास हा तिहेरी स्वरुपाचा असतो. ती स्त्री आहे म्हणून कुटुंबात होणारा त्रास, दुसरा ती दलित आहे म्हणून आणि तिसरा ती गरीब आहे म्हणून. जातिव्यवस्थेमुळे भारतात लिंगभेदाचे स्वरूप भिन्न आहे. मात्र सर्वच जाती आणि स्तरातील स्त्रियांना हा छळ सहन करावाच लागतो. पण खेदाची बाब अशी की, स्त्रियांवर होणाºया अत्याचाराच्या प्रश्नांवरही जातीभेद आणि वर्णभेद पाळला जातोच. त्यामुळे लिंगभेदाविरुद्धच्या चळवळीत समस्त स्त्रीवर्ग एकवटू शकत नाही. गडचिरोली किंवा मेळघाटातील आदिवासी स्त्रियांचे प्रश्न स्वतंत्रपणे का चर्चिले जात नाही? ही चर्चा केवळ कुपोषण आणि नक्षलवादातून निर्माण होणाºया प्रश्नांभोवती का फिरत राहते? मजूर म्हणून काम करणाºया निरक्षर महिला किंवा कार्यालयात काम करणाºया उच्च शिक्षित महिला असो, या सर्वांना होणारा पुरुषी मानसिकतेचा त्रास हा सारखाच असतो. पण त्याची चर्चा एका व्यासपीठावर, एका आंदोलनातून होत नाही. एका जातीच्या महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत दुसºया जातीतील स्त्रियांचे मौन हा देखील एक गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे स्त्रीमुक्तीची चळवळ ही जातविरहित असणे नितांत गरजेचे आहे. नागपुरातील महिला क्रांती परिषदेतील चिंतनाचे हे सार आहे.

टॅग्स :Womenमहिला