शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

जातविरहित स्त्रीमुक्ती चळवळ, स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:54 IST

‘स्त्री शिकली तर आमची कुटुंब व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल’, असे कुजकट विचार स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत अग्रेसर असलेल्या एका राष्ट्रीय पुढा-याने व्यक्त केले होते.

‘स्त्री शिकली तर आमची कुटुंब व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल’, असे कुजकट विचार स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत अग्रेसर असलेल्या एका राष्ट्रीय पुढा-याने व्यक्त केले होते. त्यामुळे केवळ समाजच नाही तर समाज जागरणाची धुरा ज्यांच्यावर आहे अशी पुढारलेली माणसेदेखील महिलांबद्दल असे प्रतिगामी विचार करीत असल्याने स्त्रीमुक्तीच्या चळवळीला सुरुवातीपासूनच अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे. आजच्या अत्याधुनिक काळात स्त्री शिकली, किंबहुना पुरुषांपेक्षाही आज ती विविध क्षेत्रात अग्रेसर असली तरी आजही तिला लिंगभेदाच्या त्रासाला सामोरे जावे लागत असते. उच्चशिक्षित म्हणवून घेतलेल्या समाजातही त्यांना हा त्रास सहन करावा लागत असतो. अलीकडेच नागपुरात पार पडलेल्या महिला क्रांती परिषदेत या विषयावर व्यक्त झालेली चिंता आपण सा-यांनाच अंतर्मुख करणारी जशी आहे तशीच ती स्त्रीमुक्तीच्या चळवळीला पुढे नेणारी देखील आहे. अगदी पुराणकाळापासून समाजाने स्त्रियांवर दास्यत्व लादले आहे. महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतीमुळे स्त्रिया शिकल्या आणि सबंध देशात स्त्रीमुक्तीची चळवळ व्यापक झाली. पण अजूनही स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत नाही. स्त्री, मग ती कुठल्याही जातीची असो तिला लिंगभेद सहन करावाच लागतो. ती उच्च जातीची असेल तरी तिला हा त्रास होतोच. परंतु दलित समाजाच्या स्त्रीला होणारा त्रास हा तिहेरी स्वरुपाचा असतो. ती स्त्री आहे म्हणून कुटुंबात होणारा त्रास, दुसरा ती दलित आहे म्हणून आणि तिसरा ती गरीब आहे म्हणून. जातिव्यवस्थेमुळे भारतात लिंगभेदाचे स्वरूप भिन्न आहे. मात्र सर्वच जाती आणि स्तरातील स्त्रियांना हा छळ सहन करावाच लागतो. पण खेदाची बाब अशी की, स्त्रियांवर होणाºया अत्याचाराच्या प्रश्नांवरही जातीभेद आणि वर्णभेद पाळला जातोच. त्यामुळे लिंगभेदाविरुद्धच्या चळवळीत समस्त स्त्रीवर्ग एकवटू शकत नाही. गडचिरोली किंवा मेळघाटातील आदिवासी स्त्रियांचे प्रश्न स्वतंत्रपणे का चर्चिले जात नाही? ही चर्चा केवळ कुपोषण आणि नक्षलवादातून निर्माण होणाºया प्रश्नांभोवती का फिरत राहते? मजूर म्हणून काम करणाºया निरक्षर महिला किंवा कार्यालयात काम करणाºया उच्च शिक्षित महिला असो, या सर्वांना होणारा पुरुषी मानसिकतेचा त्रास हा सारखाच असतो. पण त्याची चर्चा एका व्यासपीठावर, एका आंदोलनातून होत नाही. एका जातीच्या महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत दुसºया जातीतील स्त्रियांचे मौन हा देखील एक गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे स्त्रीमुक्तीची चळवळ ही जातविरहित असणे नितांत गरजेचे आहे. नागपुरातील महिला क्रांती परिषदेतील चिंतनाचे हे सार आहे.

टॅग्स :Womenमहिला