शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

आदिमायेचा जागर

By admin | Updated: October 8, 2016 04:00 IST

नवरात्रात, अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळात आपल्या पूर्ण देशात उत्साहाने पूजिले जाते.

विश्वाचे चलन वलन चालवणारी, डोळ्यांना न दिसणारी, पण कार्यरूपाने प्रकटणारी, अशा शक्तीला देवीचे, मूळमायेचे, आदिमायेचे रूप देऊन नवरात्रात, अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळात आपल्या पूर्ण देशात उत्साहाने पूजिले जाते. अग्नी आणि त्याची दाहक शक्ती जशी एकरूप असते तसेच परब्रह्म आणि प्रकृती (शक्ती) एकरूपच असतात. देवी भागवत, देवी उपनिषद, देवी पुराण, मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य म्हणजेच दुर्गासप्तशती यातून समाजाच्या सर्व स्तरांसाठी देवीपूजा सांगितली आहे. देवी महात्म्यात तर म्हटले आहे की जगात जेवढ्या स्त्रिया आहेत त्या साऱ्यात देवीचेच रूप आहे. अग्निवर्णा, तप:तेजाने आणि सूर्यशक्तीने तेजस्वी दिसणारी, कर्मफळ देणारी असे ऋग्वेदातील श्रीसूक्तात तिचे वर्णन आहे.भगवान नारायणांनी गणेशजननी दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, सावित्री, राधा या पाच देवींचा प्रकृती म्हणून नारदांना परिचय करून दिला आहे. शक्तीप्रकृतीच्या उल्लेखानेच देवी भागवत सुरू होते. महालक्ष्मी, दुर्गा, जगदंबा, सरस्वती, सावित्री, गायत्री, रेणुका, अंबा, शारदा ही सारी या देवीचीच भिन्न नावे व रूपे आहेत. विश्वातील मातृरूप चैतन्यशक्ती समान रूपात सर्वत्र असते. त्यामुळे स्त्री पुरुष भक्तांकडून समानतेची, अभेदाची अपेक्षा केली जाते. विश्वातील सर्व जीव ही तिची मुले आहेत. हीच तिची मूल्यवान संपत्ती आहे. सर्व जीवांमधील स्पंदनांची उत्पत्ती या आदिमायेमुळेच होत असते.शारदा हे या देवीचेच वाणीरूप. रामदासस्वामींनी शारदास्तवनासाठी दासबोधात एक स्वतंत्र समास लिहिला आहे. ज्ञानदेवांनी ‘अभिनव वाग्विलासिनी, चातुर्यार्थ कलाकामिनी’ म्हणून तिला वंदन केले आहे. शंकराचार्यांनी तिच्यावर स्तोत्र लिहिले आहे. या शब्दशक्तीत विश्वाचे प्राण आहेत आणि या प्राणशक्तीविना सारे विश्व मृतवत् होईल, याची जाण या साऱ्यांना आहे. साऱ्या विद्या, कला, प्रतिभा, कल्पना आणि बुद्धी ही तिचीच रूपे आहेत. त्यामुळे अमृतानुभवात ‘बाप उपेगी वस्तू शब्दू’ असे म्हटले आहे. ‘शब्दचि आमुच्या जिवीचे साधन’ असे संत तुकाराम मोठ्या गौरवाने म्हणतात. प्रत्येक शरीरातील आत्मा जसा त्या असीम परमतत्त्वाचा एक भाग तसेच घटातील आकाश त्या असीम, अमर्याद आकाशाचा अंश. पिढ्यान् पिढ्या जीवांचे जतन करणारी ही सृजनशक्ती, तिच्या गौरवासाठी गरबा. विश्वव्यवहार, विश्वगती अविरत चालू ठेवणारी ही शक्ती आपण महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली म्हणून पूजितो. पाणी, वायू, सूर्य, पृथ्वी साऱ्यांना गतिशील ठेवणाऱ्या देवतेला, सर्व स्तरातून ‘कीर्ति: श्री:, वाक्, स्मृतिर्मेधा, धृति: क्षमा’ (गीता १०.३४) हे स्त्रीतले सुप्त गुण जागवण्यासाठी (जागरता), आदिमायेकडे मागितलेला हा जोगवा आहे.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे