शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
5
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
6
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
7
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
8
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
9
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
10
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
11
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
12
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
13
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
14
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
15
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
16
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
17
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
19
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
20
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री

जमाअत-ए-इस्लामी हिंदचा शांती मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:41 IST

सर्व जाती-धर्मातील बांधवांना सोबत घेत जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रने १२ ते २१ जानेवारी दरम्यान राज्यात सुमारे ६०० लहान-मोठ्या शहरांमध्ये शांतीचा संदेश दिला़ सर्व धर्मातील सुजाण लोकांनी एकत्र आले पाहिजे,सर्व धर्म मानव कल्याणाचीच शिकवण देतात़ आपण एकाच विधात्याची लेकरे आहोत, भाऊ-बहीण आहोत, असे मंथन करीत जमाअत-ए- इस्लामी हिंदने सर्व धर्मगुरूंना एका मंचावर आणले़ प्रत्येक धर्माची शिकवण आणि त्यातील साधर्म्य याची चर्चा केली़

सर्व जाती-धर्मातील बांधवांना सोबत घेत जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रने १२ ते २१ जानेवारी दरम्यान राज्यात सुमारे ६०० लहान-मोठ्या शहरांमध्ये शांतीचा संदेश दिला़ सर्व धर्मातील सुजाण लोकांनी एकत्र आले पाहिजे,सर्व धर्म मानव कल्याणाचीच शिकवण देतात़ आपण एकाच विधात्याची लेकरे आहोत, भाऊ-बहीण आहोत, असे मंथन करीत जमाअत-ए- इस्लामी हिंदने सर्व धर्मगुरूंना एका मंचावर आणले़ प्रत्येक धर्माची शिकवण आणि त्यातील साधर्म्य याची चर्चा केली़समाजात सभोवार डोळे दिपवून टाकणारी प्रगती आणि विकास दिसत आहे़ त्याचवेळी अन्याय, अत्याचार आणि शोषणही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्ती’ हे ब्रीद घेऊन सुरू असलेल्या अभियानाची प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांनी मौलिक माहिती दिली़ सुमारे चार कोटी लोकांपर्यंत ही मोहीम पोहोचविली़ जात आणि धर्म भेद हा मानवी कल्याणाच्या आड येतो़ कोणी कुठल्याही जाती-धर्माचा असो, त्याने सद्विचार आणि आचार केला पाहिजे़ त्यासाठी जमाअते इस्लामी हिंदने या अभियानादरम्यान सर्व धर्मगुरूंना एका मंचावर स्थान दिले़ त्यांच्याकडून शांती, प्रगती आणि मुक्तीचा मार्ग जनसामान्यांपर्यंत पोहोचविला़ सरकार काय करीत आहे, यापेक्षा मी समाजासाठी काय करतो हे अधिक महत्त्वाचे आहे़ एकात्मतेचा विचार घेऊन भारत देश साºया जगाला दिशा देऊ शकतो, हा विश्वास या अभियानाने पेरला आहे़ एकीकडे प्रगतीची शिखरे दिसत असली तरी मोठी संख्या दारिद्र्यरेषेखाली जगत आहे़ दोन वेळचे पोटभर अन्न मिळत नाही, असेही लोक आपल्या अवतीभोवती आहेत़ ते कोणत्याही जाती-धर्माचे असोत त्यांना प्रवाहात आणणे व त्यांच्यासाठी प्रगतीची दारे खुली करणे हेही धार्मिक विचार असलेल्या, सद्वर्तनी प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे़ जिथे शांतता आहे, तिथेच प्रगती होऊ शकते़ जे लोक चुकीच्या मार्गाने जात आहेत, त्यांना योग्य मार्गावर आणावे लागेल, हे सद्भावना सभांमधील चिंतन खºया अर्थाने प्रगतीकडे नेणारे ठरणार आहे़ आज बुलेट ट्रेनची चर्चा होते, दळणवळणाची चौफेर प्रगती सांगितली जाते़ परंतु, उंच इमारती, देखण्या वास्तू ही सर्व आभासी प्रगती आहे़ समाजा-समाजात विश्वासाचे नाते निर्माण करणे, सामाजिक सौहार्द टिकविणे आणि शांतता अबाधित ठेवणे हे प्रगतीसाठीचे पहिले पाऊल आहे़जमाअत-ए-इस्लामी हिंदने राबविलेल्या सद्भावना अभियानात मुस्लीम बांधवांनी विशेषत: तरूणांनी नोंदविलेला सहभाग अनुकरणीय आहे़ याच मोहिमेचा एक भाग म्हणून लातुरातील अन्य धर्मीय बांधवांना ‘मस्जिद परिचय’ करून देण्यात आला़ सद्भावना सभांमध्ये हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, जैन या धर्मातील धर्मगुरूंनीही विचार मंथन केले़ विश्वास वाढविणारी ही प्रक्रिया निरंतर चालविणे ही यापुढे सर्वांची जबाबदारी आहे़ त्यात बहुसंख्य असलेल्या समाज बांधवांचे उत्तरदायित्व अधिक आहे़ सोशल मीडियामधून, विविध घटनांच्या संदर्भाने समाजात तेढ निर्माण करणा-या प्रवृत्तींना सद्भावना मोहिमेने पायबंद घातला आहे़ विशिष्ट जात, धर्म वा समूहाला समोर ठेवून केला जाणारा विषारी प्रचार रोखण्याची ताकदही सद्भावनेतच आहे़ त्याचे सूत्र विणण्याचे काम जमाअत-ए-इस्लामी हिंदने केले़- धर्मराज हल्लाळे (dharmraj.hallale@lokmat.com)