शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

जमाअत-ए-इस्लामी हिंदचा शांती मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:41 IST

सर्व जाती-धर्मातील बांधवांना सोबत घेत जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रने १२ ते २१ जानेवारी दरम्यान राज्यात सुमारे ६०० लहान-मोठ्या शहरांमध्ये शांतीचा संदेश दिला़ सर्व धर्मातील सुजाण लोकांनी एकत्र आले पाहिजे,सर्व धर्म मानव कल्याणाचीच शिकवण देतात़ आपण एकाच विधात्याची लेकरे आहोत, भाऊ-बहीण आहोत, असे मंथन करीत जमाअत-ए- इस्लामी हिंदने सर्व धर्मगुरूंना एका मंचावर आणले़ प्रत्येक धर्माची शिकवण आणि त्यातील साधर्म्य याची चर्चा केली़

सर्व जाती-धर्मातील बांधवांना सोबत घेत जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रने १२ ते २१ जानेवारी दरम्यान राज्यात सुमारे ६०० लहान-मोठ्या शहरांमध्ये शांतीचा संदेश दिला़ सर्व धर्मातील सुजाण लोकांनी एकत्र आले पाहिजे,सर्व धर्म मानव कल्याणाचीच शिकवण देतात़ आपण एकाच विधात्याची लेकरे आहोत, भाऊ-बहीण आहोत, असे मंथन करीत जमाअत-ए- इस्लामी हिंदने सर्व धर्मगुरूंना एका मंचावर आणले़ प्रत्येक धर्माची शिकवण आणि त्यातील साधर्म्य याची चर्चा केली़समाजात सभोवार डोळे दिपवून टाकणारी प्रगती आणि विकास दिसत आहे़ त्याचवेळी अन्याय, अत्याचार आणि शोषणही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्ती’ हे ब्रीद घेऊन सुरू असलेल्या अभियानाची प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांनी मौलिक माहिती दिली़ सुमारे चार कोटी लोकांपर्यंत ही मोहीम पोहोचविली़ जात आणि धर्म भेद हा मानवी कल्याणाच्या आड येतो़ कोणी कुठल्याही जाती-धर्माचा असो, त्याने सद्विचार आणि आचार केला पाहिजे़ त्यासाठी जमाअते इस्लामी हिंदने या अभियानादरम्यान सर्व धर्मगुरूंना एका मंचावर स्थान दिले़ त्यांच्याकडून शांती, प्रगती आणि मुक्तीचा मार्ग जनसामान्यांपर्यंत पोहोचविला़ सरकार काय करीत आहे, यापेक्षा मी समाजासाठी काय करतो हे अधिक महत्त्वाचे आहे़ एकात्मतेचा विचार घेऊन भारत देश साºया जगाला दिशा देऊ शकतो, हा विश्वास या अभियानाने पेरला आहे़ एकीकडे प्रगतीची शिखरे दिसत असली तरी मोठी संख्या दारिद्र्यरेषेखाली जगत आहे़ दोन वेळचे पोटभर अन्न मिळत नाही, असेही लोक आपल्या अवतीभोवती आहेत़ ते कोणत्याही जाती-धर्माचे असोत त्यांना प्रवाहात आणणे व त्यांच्यासाठी प्रगतीची दारे खुली करणे हेही धार्मिक विचार असलेल्या, सद्वर्तनी प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे़ जिथे शांतता आहे, तिथेच प्रगती होऊ शकते़ जे लोक चुकीच्या मार्गाने जात आहेत, त्यांना योग्य मार्गावर आणावे लागेल, हे सद्भावना सभांमधील चिंतन खºया अर्थाने प्रगतीकडे नेणारे ठरणार आहे़ आज बुलेट ट्रेनची चर्चा होते, दळणवळणाची चौफेर प्रगती सांगितली जाते़ परंतु, उंच इमारती, देखण्या वास्तू ही सर्व आभासी प्रगती आहे़ समाजा-समाजात विश्वासाचे नाते निर्माण करणे, सामाजिक सौहार्द टिकविणे आणि शांतता अबाधित ठेवणे हे प्रगतीसाठीचे पहिले पाऊल आहे़जमाअत-ए-इस्लामी हिंदने राबविलेल्या सद्भावना अभियानात मुस्लीम बांधवांनी विशेषत: तरूणांनी नोंदविलेला सहभाग अनुकरणीय आहे़ याच मोहिमेचा एक भाग म्हणून लातुरातील अन्य धर्मीय बांधवांना ‘मस्जिद परिचय’ करून देण्यात आला़ सद्भावना सभांमध्ये हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, जैन या धर्मातील धर्मगुरूंनीही विचार मंथन केले़ विश्वास वाढविणारी ही प्रक्रिया निरंतर चालविणे ही यापुढे सर्वांची जबाबदारी आहे़ त्यात बहुसंख्य असलेल्या समाज बांधवांचे उत्तरदायित्व अधिक आहे़ सोशल मीडियामधून, विविध घटनांच्या संदर्भाने समाजात तेढ निर्माण करणा-या प्रवृत्तींना सद्भावना मोहिमेने पायबंद घातला आहे़ विशिष्ट जात, धर्म वा समूहाला समोर ठेवून केला जाणारा विषारी प्रचार रोखण्याची ताकदही सद्भावनेतच आहे़ त्याचे सूत्र विणण्याचे काम जमाअत-ए-इस्लामी हिंदने केले़- धर्मराज हल्लाळे (dharmraj.hallale@lokmat.com)