शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

जब्बेबाई

By admin | Updated: June 21, 2016 01:55 IST

गडचिरोलीच्या जिल्हा न्यायालयात न्यायासाठी तिष्ठत असलेली आदिवासी महिला दिसली की जब्बेबाई आठवते. या महिलेवर एखादी दारू विक्रीची केस असते किंवा नक्षलसमर्थक असल्याचा आरोप

गडचिरोलीच्या जिल्हा न्यायालयात न्यायासाठी तिष्ठत असलेली आदिवासी महिला दिसली की जब्बेबाई आठवते. या महिलेवर एखादी दारू विक्रीची केस असते किंवा नक्षलसमर्थक असल्याचा आरोप. अनेकदा आरोप बळजबरीचा. साक्षीपुरावे नसतातच, तपास अधिकाऱ्याची बदली झालेली. तो कधी तारखेवर येत नाही तर कधी वकिलांच्या ‘सरकारी’ अडचणी. त्यामुळे न्यायालय तिला तारखांपलीकडे काहीच देत नाही. उसनवारी करून तरीही ती निष्ठेने तारखांवर येते. तिला न्याय हवा असतोे. पण ही लोकशाही व्यवस्था तिच्यासाठी नसतेच. तरीही या निरक्षर आदिवासी महिलेचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास एवढा प्रगाढ की, ती प्रत्येक तारखेला न्यायाची भाबडी आशा ठेऊन हजर होते. जब्बेबाई मट्टामी अशीच न्यायासाठी लढली. ती मरकनारच्या चिन्ना मट्टामीची आई. १५ वर्षापूर्वीची ही गोष्ट. २७ मार्च २००१ रोजी चिन्ना मासेमारीसाठी जंगलात गेला. परत येताना जंगलात गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या नजरेस पडला. नक्षलवादी ठरला आणि गोळीबारात मारला गेला. किंचितसा आवाज उठला, चौकशीही झाली. चिन्ना नक्षलवादी नव्हताच, असे दंडाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले. पण कुणीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. चिन्नाला न्याय मिळवून देण्यासाठी मालू कोपा बोगामी हा कार्यकर्ता समोर आला. पण काही दिवसांतच बोगामीचा नक्षलवाद्यांनी बळी घेतला. जब्बेबाईला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणाऱ्या पत्रकाराला पोलिसांनी नक्षल समर्थक ठरवले. त्याचीही चौकशी झाली. पारोमिता गोस्वामी ही कार्यकर्ती पुढे आली, तिलाही पोलिसांनी त्रास देणे सुरू केले. जंगलात राहणारे सर्वच जण नक्षलवादी असतात आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारे नक्षल समर्थक, ही आदिवासी भागातील सुलतानी व्यवस्था. मरकनारला घराजवळच चिन्नाची समाधी आहे. जब्बेबाई तिथे रोज जाऊन बसायची. समाधीवरील त्याचे कपडे, वस्तू हृदयाशी कवटाळून घेत रडत राहायची. पण असे किती काळ बसून राहायचे? रडायचे तरी किती दिवस? समाधीजवळ तासन्तास बसून असलेल्या जब्बेबाईचे मन अशा प्रश्नांनी पेटून उठायचे. शेवटी तिने ठरवले, आता आपण लढायचे. कोण होते तिच्या पाठिशी? पारोमिता गोस्वामी, विवेक पंडित आणि एखाद-दोन पत्रकार. तिने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढीत तिला दोन लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. पण पाषाणहृदयी सरकार या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात गेले. एका आदिवासी महिलेला मदत मिळू नये यासाठी आटापिटा करणारे सरकार त्याचवेळी पप्पू कलानी, संजय दत्तवरील खटले मागे घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचना करीत होते. सरकार नेमके कुणाचे? गरीब आदिवासींचे की पप्पू कलानी, संजय दत्तचे?सर्वोच्च न्यायालयाने या नुकसानभरपाईला अखेर स्थगिती दिली. जब्बेबाई सहा वर्षे दिल्लीत जाऊन लढत होती. आर. आर. पाटील गृहमंत्री झाल्यानंतर जब्बेबार्इंचा संघर्ष त्यांच्या कानावर गेला. आबांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेत तिला दोन लाख रुपये मिळवून दिले. पाच वर्षापूर्वी जब्बेबाई गेली. आपल्या निष्पाप मुलावरचा नक्षलवादी असण्याचा डाग तिला पुसता आला नाही. त्यासाठी ती अखेरपर्यंत तळमळत राहिली. तिच्या डोळ्यातील आसवे संपली. पण वेदना कायम होत्या. एवढ्या मेटाकुटीला येणाऱ्या संघर्षानंतर मोठी माणसेही निराश, हतबल होतात. जब्बेबाई मात्र थकली नाही आणि निराशही झाली नाही. आपला मुलगा नक्षलवादी नव्हता हे कधी तरी सरकार मान्य करेल, असे तिला वाटायचे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोराच्या समाधीजवळ येऊन माफी मागावी, एवढेच तिचे मागणे होते. ते चुकीचेही नव्हते. तिने पोराची समाधी आणि कपडे अखेरपर्यंत जपून ठेवले... मुख्यमंत्र्यांना दाखविण्यासाठी.जब्बेबाई आता या जगात नाही. तिचा अहिंसक लढा अरण्यप्रदेशात प्रेरक ठरू शकला नाही, हे शल्य सतत बोचत राहते. पण न्यायदेवतेच्या आसपास ताटकळत असलेली आदिवासी महिला दिसली की या अहिंसेच्या वाटेवरील श्रद्धा अधिक बळकट होते. लोकशाहीला दलित-आदिवासींचे मूूल्य कधीतरी ठरवावे लागेल, हा आशावादही अशावेळी मनाला स्पर्शून जातो.- गजानन जानभोर