शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
2
'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
3
"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम
4
LPG सबसिडीचे सूत्र बदलणार! अमेरिकेकडून गॅस आयातीमुळे केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत
5
'या' वस्तूंवर GST कपातीची शक्यता; जीएसटी काऊन्सिल करू शकते घोषणा, कोणते आहेत प्रोडक्ट?
6
“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
7
प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
8
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
9
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
10
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
11
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
12
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
13
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
14
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
15
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
17
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
18
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
19
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
20
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
Daily Top 2Weekly Top 5

देरी से चल रही है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 04:01 IST

दरवाढ, लांब पल्ल्याच्या किंवा उपनगरी गाड्या वाढवणे सोयीनुसार होत असल्याने तसाही फारसा अर्थ न उरलेला रेल्वेचा अर्थसंकल्प बंद झाल्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी किती तरतूद होते आणि त्यातून कोणते प्रकल्प मार्गी लागतात, एवढ्यापुरतीच मुंबईच्या ७५ लाख उपनगरी प्रवाशांना उत्सुकता असते.

दरवाढ, लांब पल्ल्याच्या किंवा उपनगरी गाड्या वाढवणे सोयीनुसार होत असल्याने तसाही फारसा अर्थ न उरलेला रेल्वेचा अर्थसंकल्प बंद झाल्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी किती तरतूद होते आणि त्यातून कोणते प्रकल्प मार्गी लागतात, एवढ्यापुरतीच मुंबईच्या ७५ लाख उपनगरी प्रवाशांना उत्सुकता असते. यंदा अर्थसंकल्पी तरतूद जरी ५१ हजार कोटींची दिसत असली, तरी त्यातून उपनगरी प्रवाशांना लागलीच कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही. तीच अवस्था महाराष्ट्रातील प्रकल्पांची. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांतर्गत केंद्र-राज्य सरकारप्रमाणेच रेल्वेला दरवर्षी आपला हिस्सा द्यावा लागतो. तशीच यंदा ४० हजार कोटींची तरतूद आहे आणि उरलेले ११ हजार कोटी आधीचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिले जाणार आहेत. त्यामुळे हे आकडे पाहून रेल्वेने मुंबईकरांच्या पदरात घसघशीत काही टाकले आहे, या भ्रमात राहण्याची गरज नाही. सध्या तिसºया टप्प्यातील प्रकल्पांचा गाजावाजा सुरू असला; तरी दुसºया टप्प्यातील ठाणे-दिवा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्लादरम्यानचे दोन जादा मार्ग, बोरीवलीपर्यंतचा सहावा मार्ग, हार्बरचा गोरेगावपर्यंतचा विस्तार असे अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. पनवेल-डहाणू मार्गाला उपनगरी सेवेचा दर्जा देऊन तीन वर्षे उलटली. त्यातून तिकीटदर वाढले, पण उपनगरी वाहतूक सुरू होत नव्हती. आता तरतूद आहे. हार्बरचा विस्तार गोरेगाव ते बोरीवली करण्याचे नियोजनही याच पातळीवरचे. भूसंपादनाच्या कचाट्यात सापडलेले. मुंबई ते पनवेल या उड्डाणमार्गाची चर्चा भरपूर झाली. त्यावरील १२ हजार कोटींचा खर्चही या तरतुदीत धरला आहे. अजून सर्वेक्षणाच्या पातळीवर असलेल्या या प्रकल्पाची ही रक्कम खर्च होण्याची शक्यता नाही. त्यामुळे कागदावरील ५१ हजार कोटींपैकी रखडलेल्या प्रकल्पांचा निधी आणि गाड्या खरेदी, तांत्रिक सुविधा, प्रवासी सुविधांवर खर्च होणारी रक्कम वेगळी काढली, तर रेल्वेच्या घोषणांंतील सूज लक्षात येते. मुंबईतील मेट्रोच्या सात प्रकल्पांची घोषणा झाली, तरी त्यातील एका प्रकल्पासाठी निधी दिल्याने बाकीच्यांचे फक्त भूमिपूजन होईल, याची खूणगाठ आत्ताच बांधलेली बरी. मुंबई-दिल्ली मालवाहतूक मार्गही भूसंपादनात अडकलेला आहे आणि एसी गाड्या प्रयोगांच्या पातळीवर. रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या घोषणा दरवर्षी होतात, पण ते नियोजन असते. रेल्वेच्या धावण्यातील वक्तशीरपणासारखेच ते असते. त्यामुळे नियोजन छान आहे, पण तेही ‘देरी से’ प्रत्यक्षात येईल आणि तोवर वाढलेल्या प्रवासी संख्येपुढे ते तोकडे पडेल, हे सांगायला तज्ज्ञांची गरज नाही.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेMumbai Localमुंबई लोकल