शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देरी से चल रही है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 04:01 IST

दरवाढ, लांब पल्ल्याच्या किंवा उपनगरी गाड्या वाढवणे सोयीनुसार होत असल्याने तसाही फारसा अर्थ न उरलेला रेल्वेचा अर्थसंकल्प बंद झाल्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी किती तरतूद होते आणि त्यातून कोणते प्रकल्प मार्गी लागतात, एवढ्यापुरतीच मुंबईच्या ७५ लाख उपनगरी प्रवाशांना उत्सुकता असते.

दरवाढ, लांब पल्ल्याच्या किंवा उपनगरी गाड्या वाढवणे सोयीनुसार होत असल्याने तसाही फारसा अर्थ न उरलेला रेल्वेचा अर्थसंकल्प बंद झाल्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी किती तरतूद होते आणि त्यातून कोणते प्रकल्प मार्गी लागतात, एवढ्यापुरतीच मुंबईच्या ७५ लाख उपनगरी प्रवाशांना उत्सुकता असते. यंदा अर्थसंकल्पी तरतूद जरी ५१ हजार कोटींची दिसत असली, तरी त्यातून उपनगरी प्रवाशांना लागलीच कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही. तीच अवस्था महाराष्ट्रातील प्रकल्पांची. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांतर्गत केंद्र-राज्य सरकारप्रमाणेच रेल्वेला दरवर्षी आपला हिस्सा द्यावा लागतो. तशीच यंदा ४० हजार कोटींची तरतूद आहे आणि उरलेले ११ हजार कोटी आधीचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिले जाणार आहेत. त्यामुळे हे आकडे पाहून रेल्वेने मुंबईकरांच्या पदरात घसघशीत काही टाकले आहे, या भ्रमात राहण्याची गरज नाही. सध्या तिसºया टप्प्यातील प्रकल्पांचा गाजावाजा सुरू असला; तरी दुसºया टप्प्यातील ठाणे-दिवा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्लादरम्यानचे दोन जादा मार्ग, बोरीवलीपर्यंतचा सहावा मार्ग, हार्बरचा गोरेगावपर्यंतचा विस्तार असे अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. पनवेल-डहाणू मार्गाला उपनगरी सेवेचा दर्जा देऊन तीन वर्षे उलटली. त्यातून तिकीटदर वाढले, पण उपनगरी वाहतूक सुरू होत नव्हती. आता तरतूद आहे. हार्बरचा विस्तार गोरेगाव ते बोरीवली करण्याचे नियोजनही याच पातळीवरचे. भूसंपादनाच्या कचाट्यात सापडलेले. मुंबई ते पनवेल या उड्डाणमार्गाची चर्चा भरपूर झाली. त्यावरील १२ हजार कोटींचा खर्चही या तरतुदीत धरला आहे. अजून सर्वेक्षणाच्या पातळीवर असलेल्या या प्रकल्पाची ही रक्कम खर्च होण्याची शक्यता नाही. त्यामुळे कागदावरील ५१ हजार कोटींपैकी रखडलेल्या प्रकल्पांचा निधी आणि गाड्या खरेदी, तांत्रिक सुविधा, प्रवासी सुविधांवर खर्च होणारी रक्कम वेगळी काढली, तर रेल्वेच्या घोषणांंतील सूज लक्षात येते. मुंबईतील मेट्रोच्या सात प्रकल्पांची घोषणा झाली, तरी त्यातील एका प्रकल्पासाठी निधी दिल्याने बाकीच्यांचे फक्त भूमिपूजन होईल, याची खूणगाठ आत्ताच बांधलेली बरी. मुंबई-दिल्ली मालवाहतूक मार्गही भूसंपादनात अडकलेला आहे आणि एसी गाड्या प्रयोगांच्या पातळीवर. रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या घोषणा दरवर्षी होतात, पण ते नियोजन असते. रेल्वेच्या धावण्यातील वक्तशीरपणासारखेच ते असते. त्यामुळे नियोजन छान आहे, पण तेही ‘देरी से’ प्रत्यक्षात येईल आणि तोवर वाढलेल्या प्रवासी संख्येपुढे ते तोकडे पडेल, हे सांगायला तज्ज्ञांची गरज नाही.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेMumbai Localमुंबई लोकल