शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

हे नेहमीचंच झालं

By admin | Updated: October 21, 2016 02:46 IST

एखादी दुर्घटना घडून गेली की, साऱ्यांनी एका सुरात हळहळ व्यक्त करायची, सरकारने संबंधितांना आर्थिक मदत जाहीर करतानाच चौकशी समिती नियुक्त करायची,

एखादी दुर्घटना घडून गेली की, साऱ्यांनी एका सुरात हळहळ व्यक्त करायची, सरकारने संबंधितांना आर्थिक मदत जाहीर करतानाच चौकशी समिती नियुक्त करायची, समस्त राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दुर्घटनास्थळी रांग लावायची आणि हळूचकन मग सगळ्यांनीच झाले गेले विसरुन जायचे. आजवर हेच आणि असेच होत आले आहे आणि त्यामुळे गेल्या सोमवारी सायंकाळी ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे जी भीषण दुर्घटना घडली तिच्याबाबतीत यापेक्षा फार काही वेगळे होईल असे नाही. तेथील एका खासगी विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात भीषण आग लागली आणि आगीत २१ जण मरण पावले तर शंभरहून अधिक जखमी झाले. यातील अधिक गंभीर बाब म्हणजे ही आग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागली. अशा विभागात जे रुग्ण दाखल केले जातात त्यांची अवस्था आधीच बिकट असल्याने स्वत:चा जीव वाचविणे त्यांच्या दृष्टीने अशक्यच असते. रितीप्रमाणे प्रस्तुत विद्यापीठाचे मालक मनोज नायक लगबगीने फरार झाले आणि चार दिवस उलटून गेल्यानंतर पोलिसांसमोर हजर झाले. दुर्घटनेचे वृत्त समजताक्षणी त्या राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हजर झाले आणि त्यांनी नेहमीचे सोपस्कार पूर्ण केले. केन्द्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनीही दुर्घटना रुग्णालयास भेट दिली आणि इतकेच नव्हे तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या गंभीर प्रकाराची आपणहून दखल घेतली. त्यानंतर जे काही सोपस्कार सुरु झाले त्यातून जे जळजळीत वास्तव समोर आले, ते म्हणजे ओडिशा राज्यातील तब्बल ५६८ रुग्णालयांपैकी अवघ्या तीन रुग्णालयांनी अग्नीप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित केली आहे आणि त्यांच्याकडे तसा दाखलाही उपलब्ध आहे. मानवाधिकार आयोगानेच ही बाब जगासमोर मांडली आहे. आरोग्यमंत्री नड्डा यांनीदेखील आता सर्वच राज्यांमधील रुग्णालयांना नव्याने आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यन्वित करण्याच्या सूचना दिल्या जातील असे जाहीर केले आहे. मुळात त्याची गरजच काय? इमारतीत रुग्णालय असो की एखादे कार्यालय, जिथे एकाचवेळी अनेक लोकांचा राबता असतो तिथे आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित असणे आणि तरीही आग लागलीच तर बचाव यंत्रणा सक्षम असणे या अगदी सामान्य बाबी झाल्या. त्या सर्वांनी पाळणे अपेक्षित असते. पण तसे होते आहे अथवा नाही हे पाहाण्याची ज्यांची जबाबदारी असते त्यांचा कामचुकारपणा वा भ्रष्टाचारच दुर्घटनांना आमंत्रण देत असतो. ओडिशा हे महाराष्ट्राच्या तुलनेत एक अविकसित राज्य आहे म्हणून तिथे असे होऊ शकते हा युक्तिवाददेखील अत्यंत फोल असून उद्या संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर मुंबई-नागपूर वा पुणे शहरातील रुग्णालयांची अचानक तपासणी केली गेली तर भुवनेश्वर शहरात जे आढळून आले, त्यापेक्षा वेगळे काही आढळून येईल असे नाही. एरवी सारे लोक सरकारी रुग्णालयांच्या गलथानपणावर टीका करीत असतात व ती रास्तदेखील असते पण खासगी रुग्णालयेदेखील फार काही वेगळी नसतात हेच यातून दिसून आले आहे. राजधानी दिल्लीतील उपहार चित्रपटगृहात भीषण आग लागली होती त्यानंतरही सरकारने आगीपासून बचाव करण्याच्या काटेकोर आणि कठोर सूचना दिल्याच होत्या म्हणतात!