शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

हे नेहमीचंच झालं

By admin | Updated: October 21, 2016 02:46 IST

एखादी दुर्घटना घडून गेली की, साऱ्यांनी एका सुरात हळहळ व्यक्त करायची, सरकारने संबंधितांना आर्थिक मदत जाहीर करतानाच चौकशी समिती नियुक्त करायची,

एखादी दुर्घटना घडून गेली की, साऱ्यांनी एका सुरात हळहळ व्यक्त करायची, सरकारने संबंधितांना आर्थिक मदत जाहीर करतानाच चौकशी समिती नियुक्त करायची, समस्त राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दुर्घटनास्थळी रांग लावायची आणि हळूचकन मग सगळ्यांनीच झाले गेले विसरुन जायचे. आजवर हेच आणि असेच होत आले आहे आणि त्यामुळे गेल्या सोमवारी सायंकाळी ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे जी भीषण दुर्घटना घडली तिच्याबाबतीत यापेक्षा फार काही वेगळे होईल असे नाही. तेथील एका खासगी विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात भीषण आग लागली आणि आगीत २१ जण मरण पावले तर शंभरहून अधिक जखमी झाले. यातील अधिक गंभीर बाब म्हणजे ही आग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागली. अशा विभागात जे रुग्ण दाखल केले जातात त्यांची अवस्था आधीच बिकट असल्याने स्वत:चा जीव वाचविणे त्यांच्या दृष्टीने अशक्यच असते. रितीप्रमाणे प्रस्तुत विद्यापीठाचे मालक मनोज नायक लगबगीने फरार झाले आणि चार दिवस उलटून गेल्यानंतर पोलिसांसमोर हजर झाले. दुर्घटनेचे वृत्त समजताक्षणी त्या राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हजर झाले आणि त्यांनी नेहमीचे सोपस्कार पूर्ण केले. केन्द्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनीही दुर्घटना रुग्णालयास भेट दिली आणि इतकेच नव्हे तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या गंभीर प्रकाराची आपणहून दखल घेतली. त्यानंतर जे काही सोपस्कार सुरु झाले त्यातून जे जळजळीत वास्तव समोर आले, ते म्हणजे ओडिशा राज्यातील तब्बल ५६८ रुग्णालयांपैकी अवघ्या तीन रुग्णालयांनी अग्नीप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित केली आहे आणि त्यांच्याकडे तसा दाखलाही उपलब्ध आहे. मानवाधिकार आयोगानेच ही बाब जगासमोर मांडली आहे. आरोग्यमंत्री नड्डा यांनीदेखील आता सर्वच राज्यांमधील रुग्णालयांना नव्याने आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यन्वित करण्याच्या सूचना दिल्या जातील असे जाहीर केले आहे. मुळात त्याची गरजच काय? इमारतीत रुग्णालय असो की एखादे कार्यालय, जिथे एकाचवेळी अनेक लोकांचा राबता असतो तिथे आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित असणे आणि तरीही आग लागलीच तर बचाव यंत्रणा सक्षम असणे या अगदी सामान्य बाबी झाल्या. त्या सर्वांनी पाळणे अपेक्षित असते. पण तसे होते आहे अथवा नाही हे पाहाण्याची ज्यांची जबाबदारी असते त्यांचा कामचुकारपणा वा भ्रष्टाचारच दुर्घटनांना आमंत्रण देत असतो. ओडिशा हे महाराष्ट्राच्या तुलनेत एक अविकसित राज्य आहे म्हणून तिथे असे होऊ शकते हा युक्तिवाददेखील अत्यंत फोल असून उद्या संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर मुंबई-नागपूर वा पुणे शहरातील रुग्णालयांची अचानक तपासणी केली गेली तर भुवनेश्वर शहरात जे आढळून आले, त्यापेक्षा वेगळे काही आढळून येईल असे नाही. एरवी सारे लोक सरकारी रुग्णालयांच्या गलथानपणावर टीका करीत असतात व ती रास्तदेखील असते पण खासगी रुग्णालयेदेखील फार काही वेगळी नसतात हेच यातून दिसून आले आहे. राजधानी दिल्लीतील उपहार चित्रपटगृहात भीषण आग लागली होती त्यानंतरही सरकारने आगीपासून बचाव करण्याच्या काटेकोर आणि कठोर सूचना दिल्याच होत्या म्हणतात!