शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

येथे शस्त्राचार मुक्त आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 04:17 IST

हाती शस्त्रे घेऊन मिरवणुका काढणे यावर केवळ कायद्याचीच नाही तर घटनेचीही बंदी आहे. तरीही परवा झालेल्या रामनवमीच्या ‘शोभायात्रे’त कोलकात्याच्या भाजपाने शस्त्रे मिरवलेली दिसली असतील तर त्या पक्षाचा तो अपराध कायदा व संविधान या दोहोंचीही पायमल्ली करणारा आहे हे सांगितले पाहिजे. शस्त्रे हाती असली आणि डोक्यात जल्लोषाचा उन्माद असला की हिंसाचाराला ...

हाती शस्त्रे घेऊन मिरवणुका काढणे यावर केवळ कायद्याचीच नाही तर घटनेचीही बंदी आहे. तरीही परवा झालेल्या रामनवमीच्या ‘शोभायात्रे’त कोलकात्याच्या भाजपाने शस्त्रे मिरवलेली दिसली असतील तर त्या पक्षाचा तो अपराध कायदा व संविधान या दोहोंचीही पायमल्ली करणारा आहे हे सांगितले पाहिजे. शस्त्रे हाती असली आणि डोक्यात जल्लोषाचा उन्माद असला की हिंसाचाराला कोणत्याही क्षणी आरंभ होऊ शकतो. कोलकात्यात तसे झाले आणि भाजपाच्या शस्त्रधारी मिरवणुकीने तृणमूल काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना जखमीही केले. त्याची प्रतिक्रिया उमटून मग तृणमूलच्या लोकांनीही काही भागात सशस्त्र मोर्चे काढले. हा प्रकार जेवढा निंदनीय तेवढाच आपले राजकारण घेत असलेली हिंसाचाराची भयकारी दिशा दाखविणारा आहे. खून करणारे आणि खुनाचे समर्थन करणारे पक्ष व संघटना आपल्या देशात आहेत. त्या विदेशातील हिंसाचाऱ्यांचा निषेध करतात. तालिबानांना नावे ठेवतात, बोको हरामला शिवीगाळ करतात आणि इसिस व अल-कायदाच्या हिंस्त्र कारवायांवर टीकेची झोड उठवितात. कारण एकच. ते विदेशातले लोक आहेत आणि शिवाय ते मुस्लिम व अन्य धर्मांचे आहेत. हिंसा आमच्या माणसांनी केली तर क्षम्य व दुर्लक्षिण्याजोगी. इतरांनी केली तर मात्र ती निषेधार्ह असा दुटप्पी न्याय हिंसाचाराबाबत करता येत नाही. हिंसा कुणाकडूनही झाली वा शस्त्राचार कुणीही केला तरी तो सारखाच निंद्य असतो. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये त्यांच्या नागरिकांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार आहे. मात्र त्यांना शस्त्रांसह मोर्चे वा मिरवणुका काढता येत नाहीत. आता या मर्यादित अधिकाराविरुद्धही त्या देशातील स्त्रिया व विद्यार्थ्यांनी आंदोलन उभे केले आहे. शस्त्रांच्या वापराने सामूहिक हत्या करणे, शाळा-कॉलेजात किंवा बाजारात हत्याकांड घडविणे हे प्रकार तेथील अतिरेकी धर्मांधांनी, वर्णांधांनी आणि माथेफिरू वृत्तीच्या लोकांनी एवढ्यात फार केले. इंग्लंड व फ्रान्समध्येही अशी हत्याकांडे अलीकडे बरीच झाली. या सगळ्या शस्त्राचारात नेहमीच निरपराध माणसे, स्त्रिया व मुलांचे बळी पडत असतात. त्यामुळे एकूणच शस्त्र बाळगणाºयांच्या हक्काविरुद्ध तिकडे आता मोहीम उघडली गेली आहे. भारतात शस्त्र बाळगण्याचा अधिकार पोलीस व लष्कराखेरीज इतर कुणालाही नाही. ज्यांना तो हवा त्यांना त्यासाठी रीतसर परवाने मिळवावे लागतात. तरीही देशात शस्त्र बाळगणाºयांची संख्या मोठी आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान व बिहार या राज्यात लग्नांच्या वरातीतही शस्त्रे नाचविली जातात आणि बंदुकांचे बार उडविले जातात. तो प्रकार सामाजिक वा कौटुंबिक आनंदाचा म्हणून पोलीस त्याची फारशी दखल घेत नाहीत. तरीही तो बेकायदा आहे हे निश्चित. हा प्रकार उद्या राजकीय पक्ष करू लागले व आपल्या मोर्चात कोलकात्यासारखी शस्त्रे नाचवू लागले तर देशात राजकीय युद्धेच सुरू होतील. त्यामुळे या घटनांची वेळीच कठोर दखल घेणे गरजेचे आहे. ती घेताना शस्त्रे बाळगणाºया व्यक्तींएवढेच त्यांच्या पक्षांनाही जबाबदार धरणे व त्यांनाही योग्य ती जरब बसविणे आवश्यक आहे. लोकशाही हा लोकमताच्या बळावर चालणारा शांततामय राज्यव्यवहार आहे. त्यात हिंसेला थारा नाही. लोकशाहीत केवळ योग्य ते न्यायालयच अपराध्याला मृत्युदंड देऊ शकते. तो अधिकार कोणत्याही पुढाºयाला वा राजकीय पक्षाला नाही. तरीही देशातले सत्ताधारी असणारे पक्ष बंदुका आणि तलवारी घेऊन मिरवणुका काढत असतील तर तो लोकशाहीविरुद्ध जाणाराही गुन्हा आहे आणि त्याची दखलही तशीच घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Ram Navamiराम नवमी