शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

‘मत’ फक्त व्यक्त करणे पुरेसे नाही; ते ‘द्यावे’ही लागेलच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2024 07:50 IST

मोजकेच मतदान धोकादायकच. त्यातून आवश्यक मतपेढी तयार करण्याचा, तीच जोपासली जाण्याचा धोका वाढतो! - आज ‘राष्ट्रीय मतदार दिवस’, त्यानिमित्ताने!

- रविकिरण देशमुख

आपल्याकडे बहुमताने आलेले सरकार नसते. आपल्याकडे सरकार निवडण्याच्या प्रक्रियेत जे सहभागी होतात त्यांच्या बहुमताने आलेले सरकार असते, हे आजच्या अमेरिकेची पायाभरणी करणारे दिवंगत राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचे विधान सर्वश्रुत आहे. ते त्रिकालाबाधित सत्यही आहे. 

भारत प्रजासत्ताक झाला त्या २६ जानेवारीच्या आधीचा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस असणे हाही एक उत्तम योगायोगच. लोकांनी डोळसपणे लोकप्रतिनिधी निवडून देणे हीच प्रजासत्ताकाची खरी ओळख आहे. ज्या संविधानातून हे प्रजासत्ताक बनले त्याचा मूलाधार आहे- ‘एक व्यक्ती, एक मत आणि त्याचे एक मूल्य.’ शतकानुशतके राजेशाहीत काढणाऱ्या खंडप्राय भूप्रदेशाचे एका लोकशाहीवादी देशात रूपांतर होत असताना हे सूत्र क्रांतिकारक ठरले. कारण मी मी म्हणणाऱ्यांना मतदारांनी नाकारले आणि चर्चेतही नसलेल्या चेहऱ्यांना निवडले, असे अनेकदा झाले आहे.

अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचे पवित्र कार्य करावे, असे आवाहन केले जाते; पण मतदानाच्या आकडेवारीतून उदासीनता स्पष्ट जाणवते; पण यामागील कारणे शोधून त्यावर चिंतन होत नाही. आपली व्यवस्था सर्वसामान्यांच्या मनातील सर्व प्रश्नांना सामोरे जाते का, काही पर्याय देते का, हा विचार केला तरच याची उत्तरे मिळतील. मतदाराला ‘राजा’ म्हटले जाते; पण तो मतदानादिवशीच फक्त ‘राजा’ असतो. उर्वरित काळ तो ‘प्रजा’ म्हणजेच ‘प्रेक्षक’ असतो.

निवडणुकीत मते मागताना उमेदवारांकडून “तुमचा आवाज बुलंद करण्यासाठी मला अमुकतमुक सभागृहात पाठवा,” असे आवाहन केले जाते; पण त्यानंतर उमेदवारी दिलेल्या पक्षाचाच आवाज बुलंद होतो आणि ‘अमुक विषयावर माझ्या पक्षाची भूमिका तमुक आहे’, असे सांगून आवड-निवड सुरू होते, हे लोक पाहत असतात. लोकांना भेडसावणारे विषय मांडण्याचा, तडीस नेण्याचा ध्यास असता तर जनहिताचे अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेले दिसले नसते.

देशाला आगामी निवडणुकांची चाहूल लागली आहे आणि अंतिम मतदार याद्या जाहीर होत आहेत. याआधी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ९१.१९ कोटी मतदारांपैकी ६१.४६ कोटी (६७.४०%) लोकांनी मतदानाचा हक्क बजावला जो आजवरचा उच्चांक आहे; पण याची दुसरी बाजू अशी की, ३० कोटी नागरिक या मतदानात सहभागी झालेच नव्हते. यावर चर्चा होत नाही.

याच निवडणुकीत महाराष्ट्रात ६७ टक्के मतदान झाले. उदाहरणादाखल, ठाणे लोकसभेसाठी ते जेमतेम ४९.३७ टक्के होते. कल्याणमध्ये तर ४५.२९ टक्केच होते जिथे १९.६५ लाखांपैकी फक्त ८.८७ लाख मतदारांनी मतदान केले आणि त्यापैकी विजयी उमेदवाराला ५.५९ लाख मते मिळाली. म्हणजेच फक्त एवढ्याच मतदारांनी आपले प्रतिनिधित्व कोणी करावे, याचा कौल दिला. त्यामानाने आदिवासीबहुल गडचिरोली आणि नंदुरबार या लोकसभा मतदारसंघांत अनुक्रमे ७२.२६ आणि ६८.५ टक्के मतदान झाले. तेथे साक्षरता बेताचीच; पण मतदानाची जाणीव जास्त दिसते.

महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काय दिसते? - तर झालेल्या एकूण मतदानापैकी ८३ टक्के मते मिळवून अजित पवार (बारामती) हे आमदार होतात, तर दुसऱ्या बाजूला अवघी २५.१९ टक्के मते मिळवून राजेश पाटील (चंदगड), २६.५६ टक्के मिळवून प्रकाश भारसाखळे (अकोट), २५.६८ टक्के मते मिळवून मोहन हंबर्डे (नांदेड-दक्षिण) व २६.७९ टक्के मिळवून सुभाष धोटे (राजुरा) हेही आमदार होतात. अवघ्या काही टक्क्यांनी उमेदवार विजयी करताना मतदारांपुढे संभ्रम तर नव्हता? 

एक खासदार सुमारे २० लाख आणि आमदार सुमारे ४-५ लाख लोकांचा भाग्यविधाता असतो. सरकारी तिजोरीतून येणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चातून उभ्या राहणाऱ्या विकासकामांची दिशा काय असावी, हे ठरविण्याचा त्यांना अधिकार मिळतो. मग लोकांनी यात सहभागी होऊन आपला हक्क, वचक अबाधित का ठेवू नये? अधिकाधिक नागरिकांनी मतदान करून लोकप्रतिनिधींना एक जाणीव निर्माण करून देणे आवश्यक आहे ती म्हणजे आम्ही आमचा निर्णय कधीही बदलू शकतो. मोजकेच मतदान होणे हे धोकादायकच. कारण त्यातून आवश्यक तेवढी मतपेढी तयार करण्याचा आणि तीच जोपासली जाण्याचा धोका वाढतो. आजवर नेमके तेच घडत आले आहे. विशिष्ट वर्ग, उपवर्ग यांची मतपेढी जोपासा आणि इतर मते विभागली जावीत, अशा खेळी खेळत राहा व मतदारसंघावर कब्जा करा... यामुळे लोकशाही प्रगल्भ होत नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक