शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

उत्तरेकडच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सीमेवर लक्ष केंद्रित करणे भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:17 IST

रशिया, चीन आणि पाकिस्तान यांच्यातील घसट वाढत असतानाच चीनने नेपाळला आपल्या मुख्य भूमीशी महामार्गाने जोडून घेतल्याची बातमी येणे ही बाब धक्कादायक आहे.

रशिया, चीन आणि पाकिस्तान यांच्यातील घसट वाढत असतानाच चीनने नेपाळला आपल्या मुख्य भूमीशी महामार्गाने जोडून घेतल्याची बातमी येणे ही बाब धक्कादायक आहे. नेपाळ हे एकेकाळचे हिंदू राष्ट्र भारताशी जैविक संबंधांनी जुळले आहे. त्यातील चीनची गुंतवणूक गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे आणि त्यातील रस्त्यांचे जाळे बांधून देण्यात चीनने पुढाकार घेतला आहे. बीजिंगपासून तिबेटमार्गे नेपाळच्या उत्तर सीमेपर्यंत येणारा चीनचा सहा पदरी महामार्ग कधीचाच बांधून पूर्ण झाला आहे. त्याच्या जोडीला त्याने रेल्वेही तिथवर आणली आहे. आज नेपाळनेच आपले दरवाजे या मार्गांसाठी खुले केले आणि तेवढ्यावर न थांबता उत्तरेकडची आपली सीमा १३ जागी त्याने चीनच्या आगमनासाठी खुली केली. नेपाळच्या संरक्षण व परराष्ट्र व्यवहारावर भारताचे नियंत्रण आहे. शिवाय त्याला समुद्रकिनारा नसल्यामुळे त्याचे व्यापार व अन्य हितसंबंधही भारताशी जुळले आहेत. चीनचे भारताशी असलेले जुने वैर त्याने याच काळात उकरून काढले आहे. अरुणाचलवर हक्क सांगितला आहे, त्या राज्यातील अनेक शहरांना आपली नावे दिली आहेत. चीनबाबतचा नवा वादही याच काळात त्याने उभा केला आहे. जपानचे पंतप्रधान भारतात असताना त्यांनी उत्तरपूर्व भारतात (म्हणजे आसाम, मेघालय, अरुणाचल, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा) कोणतीही गुंतवणूक करू नये असे त्यांना चीनने बजावले आहे. त्याचवेळी जपानच्या अंगावरून उत्तर कोरियाला त्याचे शक्तिशाली क्षेपणास्त्र उडवायलाही त्याने प्रोत्साहन दिले आहे. भारताचा मोठा भूभाग १९६२ पासून चीनच्या ताब्यात आहे. मॅकमहोन ही ब्रिटिशांनी आखलेली दोन देशातली सीमा आपल्याला मंजूर नसल्याची व तिची फेरआखणी करण्याची मागणी चीनने अनेक दशकांपासून लावून धरली आहे. काश्मिरात त्याचे महामार्ग बांधून झाले आणि आता त्या प्रदेशात एका महत्त्वाकांक्षी औद्योगिक कॉरिडॉरची उभारणीही त्याने सुरू केली आहे. एकेकाळी रशिया व चीन हे देश नुसत्या धमक्या देत. आता धमकीवाचूनचे आक्रमण करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले व ते इतरांना पचवायला लावले आहे. रशियाने युक्रेनबाबत हे केले. चीनने भारताप्रमाणेच जपानच्या अनेक बेटांवर व समुद्री मालकीवर आपला हक्क सांगितला असून जपानच्या दक्षिणेला समुद्रातच आपला एक हवाईतळ त्याने उभारला आहे. या स्थितीत आपली राजनीती चीनच्या अध्यक्षाला ढोकळे खाऊ घालण्यावर आणि त्याला गांधीजींचा चरखा चालवायला लावण्यावर थांबली आहे. जपानशी बुलेट ट्रेनचा करार ही त्याच्याही संबंधांची आपली सीमा आहे. प्रत्यक्षात डोकलाम भागात आपण चीनला राजनैतिक शहच तेवढा दिला आहे. सिक्कीमवरचा त्याचा हक्क सोडायला मात्र त्याला सांगू शकलो नाही. अरुणाचलबाबत तर आपण बोलणेही थांबविले आहे आणि नेपाळ? त्याने भारताची सीमा काही महिने रोखून धरून त्याच्याकडून येणारे औद्योगिक व अन्य उत्पादनच अडवून ठेवलेले आपण पाहिले आहे. ही स्थिती भारताला उत्तरेकडे कुणी मित्र नसल्याचे सांगणारी व सभोवतीच्या देशांचे चीनसमोरील दुबळेपण उघड करणारी आहे. अमेरिका पाकिस्तानला धमक्या देते. मात्र चीनला काही सांगायचे धाडस त्याही देशाला होत नाही. या स्थितीत उत्तर कोरिया, मध्यपूर्व किंवा ब्रह्मदेश या दूरच्या विषयांवर डोकेफोड करून घेण्याऐवजी आपल्या सीमेवर लक्ष केंद्रित करणे भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्या प्रश्नावरचे लोकांचे लक्ष विचलित करून ते अन्यत्र वेधण्याचा प्रयत्न जनतेची फसवणूक करणाराच नाही, तो सरकार स्वत:ची फसवणूक करून घेत असल्याचे उघड करणाराही आहे.