शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

IPL 2020 : विराट आणि रोहितमधून विस्तव जात नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 06:27 IST

IPL 2020 : भले त्याने धावा नसतील केल्या. भले मिडऑफच्या सेफ जागेवर त्याने क्षेत्ररक्षण केलं असेल. पण संशयाचं धुकं  गडद झालं. त्यातून निर्माण झालेला महत्त्वाचा प्रश्न असा की, विराट आणि रोहितमधून विस्तव जात नाही का? गेल्या वर्ल्डकपपासून त्यावर चर्चा आहे. 

- द्वारकानाथ संझगिरी(चित्रपट-क्रीडा समालोचक)

फार काहीही न करता सध्या रोहित शर्मा हा बातमीतला माणूस आहे.  तो अनफिट होऊन मुंबई संघाबाहेर  बसला. त्याला राष्ट्रीय निवड समितीने ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी वगळलं. उपकर्णधारपदाची त्याची वस्र काढून बँगलोरच्या कन्नूर लोकेश राहुलवर चढवली.  रोहित अनफिट आहे हे कळतंच होतं. पण त्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? - वगैरे कळवायची तसदी नियामक मंडळाने घेतलीच नाही. त्यामुळे मग संशयाचं धुकं पसरलं. तो संशय वाढला कारण अनफिट रोहित शर्मा पुन्हा आयपीएलमध्ये खेळला. 

भले त्याने धावा नसतील केल्या. भले मिडऑफच्या सेफ जागेवर त्याने क्षेत्ररक्षण केलं असेल. पण संशयाचं धुकं  गडद झालं. त्यातून निर्माण झालेला महत्त्वाचा प्रश्न असा की, विराट आणि रोहितमधून विस्तव जात नाही का? गेल्या वर्ल्डकपपासून त्यावर चर्चा आहे. मंडळाने त्याला वगळण्याची नीट कारणं दिली नाहीत. संघाबाहेर कुणी सोम्या-गोम्या जात नव्हता, विश्वचषक २०१९ मध्ये पाच शतकं ठोकणारा फलंदाज जात होता. ज्याला  जग वनडेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज  मानतं, त्याच्या फॅन्सना, क्रिकेट रसिकांना त्याला  नेमकं का वगळलं हे  कळण्याचा हक्क आहे की नाही? सुनील गावस्करने बाॅम्ब ठोकल्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला. मग मंडळाला काही गोष्टी स्पष्ट कराव्या लागल्या.  म्हणजे प्रश्न विचारले गेले नसते तर रोहित नावाची ‘ब्याद’ तिथून थेट भारतात पाठवायचा विचार होता का? असा संशय येऊ शकतो. आता मंडळाने म्हटलंय की रोहितच्या फिटनेसकडे लक्ष ठेवणार. म्हणजे त्याला ऑस्ट्रेलियाला घेऊन जायलाच हवं, कारण तो बायो बबलमध्ये आहे. 

टॉपवर असलेल्या एकाच संघाच्या दोन खेळाडूंमध्ये काहीना काही तरी स्पर्धा असतेच. विराट - रोहित हे तसे पॉपिंग क्रिजचे राजपुत्र आहेत. एक टी-ट्वेन्टी, वनडेचा राजा आहे. दुसरा तिन्ही फॉरमॅटचा बादशहा आहे. संघात  विराट किंवा रोहितपैकी एकाला घायचं असेल तर मी विराटला घेईन.  पैसे देऊन बॅटिंग पहायची असेल तर मी रोहितला पाहीन. टायमिंग, फटक्यातली सहजता, शैली यात रोहित विराटपेक्षा वर आहे. पण फलंदाजी इथेच संपत नाही. त्यात सातत्य, टेम्परामेंट, बचाव अशा आणखी कितीतरी गोष्टी  अंतर्भूत असतात. त्या विराटला रोहितपेक्षा वरच्या मजल्यावर घेऊन जातात. म्हणून विराट कर्णधार झाला आणि रोहित झाला नाही. रोहितने फिटनेस ही गोष्ट विराट इतकी कधीच गंभीरपणे घेतली नाही. कोविडनंतर विराटला मैदानावर पाहताना कोविड  ‘मानवल्या’सारखं वाटलं नाही. तो तसाच होता जसा तो सहा महिन्यांपूर्वी होता. रोहितला कोविडनंतरची शांतता  ‘मानवलेली’ वाटली.रोहितची फलंदाजी ही आळसावलेली फलंदाजी असते. आणि म्हणूनच ती   पहायला मला प्रचंड  आवडते.  ज्याचं वर्णन इंग्लिशमध्ये

 ‘रिलैक्सड सिल्कीनेस’ असं होऊ शकतं. पण क्षेत्ररक्षण करताना रोहित विराटप्रमाणे मैदानावर ‘लाइव वायर’ वाटत नाही. त्याचा शॉक फलंदाजाला बसत नाही. रोहित सध्या त्याच्या करिअरच्या टॉपवर आहे. विशेषत: वनडेमधल्या वर्ल्डकपनंतर ! किमान चार वर्ष आधी रोहितने आपली कसोटी क्रिकेटमधली जागा भक्कम करायला हवी होती. तो ती तशी करू शकला नाही,  कारण कसोटी क्रिकेटमध्ये लागणारा पेशन्स आणि बचाव हा त्याच्याकडे नसावा, असं वाटतं. कसोटी क्रिकेटमध्ये पाय रोवून फलंदाजी करावीच लागते. आणि ती करण्याची कुवत अजून त्याने दाखवलेली नाही. दोन खेळाडूमधली  स्पर्धा ही  कुरूप रूप घेऊ शकते.  तुम्ही ठरवलंत की ज्या माणसाबरोबर माझी स्पर्धा आहे त्या माणसापेक्षा जास्त चांगला मी परफॉर्मन्स देईन, तर ती स्पर्धा सशक्त असू शकते. ती जेव्हा सशक्त स्पर्धा होईल त्यावेळी हे दोघेही एकाच स्तरावरचे पॉपिंग क्रिजचे राजपुत्र असतील. रोहितने विराटच्या मजल्यावर रहायला जायचा प्रयत्न करावा. त्याला शक्य आहे. पण वर जायचा जिना सोपा नाही.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीRohit Sharmaरोहित शर्माIPL 2020IPL 2020