शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

ब्रह्मपुत्रेवरील नवे धरण हा चीनचा ‘वॉटर बॉम्ब’?

By विजय दर्डा | Updated: July 28, 2025 04:42 IST

जगाला सतत घाबरवत राहणे, भीती दाखवणे हा चीनचा स्वभाव आहे. या देशाच्या शब्दकोशात माणुसकी नावाचा शब्दच नाही. त्याचा सामना कसा करायचा? 

डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

दुसऱ्याला नष्ट करण्यासाठी चीन कुठल्याही थराला जाऊ शकतो, असेच त्या देशाबद्दल जगाचे मत झाल्यामुळे या देशाकडे कायम संशयानेच पाहिले जाते. गेल्या आठवड्यात चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी तिबेटमध्ये यारलुंग सांगोपा नदीवर जगातल्या सर्वात मोठ्या धरणाचे भूमिपूजन केले. त्यानंतर भारतापासून बांगलादेशपर्यंत सगळ्यांना एका चिंतेने ग्रासले आहे : या धरणाचा उपयोग नवे हत्यार म्हणून  चीन करणार नाही ना? 

त्यामागे कारण आहे. तिबेट ओलांडल्यानंतर यारलुंग सांगोपा नदी भारतात ‘ब्रह्मपुत्रा’ म्हणून ओळखली जाते. हिमालयातील कैलास पर्वतावर उगम पावलेली ही नदी सुमारे २९०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते. भारतात ब्रह्मपुत्रा ९९६ किलोमीटर इतके अंतर वाहते. गेल्या काही वर्षांत या नदीचा प्रवाह कमी झाल्याने चीन काहीतरी खोडसाळपणा करत असला पाहिजे, अशी शंका येऊ लागली. ज्या धरणाचे भूमिपूजन झाले, तो चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या स्वप्नातील प्रकल्प असल्याचे सांगितले जाते. तिबेट आणि भारताच्या सीमेजवळच्या या धरणामुळे  पर्यावरण उद्ध्वस्त होईल. जगभरातील पर्यावरण शास्त्रज्ञ या धरणाला विरोध करत आहेत. या धरणामुळे तिबेट तर नष्ट होईलच, पण भारत आणि बांगलादेशातील  खालच्या सखल भागातही त्याचा वाईट परिणाम होईल. उपग्रह प्रतिमा तज्ज्ञ डेमियन सायमन यांनी हे धरण कोठे बांधले जाणार आहे, ते सूचित केले आहे. हे स्थान अरुणाचल प्रदेशाला लागून आहे. त्यात पाच जलविद्युत केंद्रे उभारली जातील, असे चीनचे म्हणणे. हे धरण बांधण्यासाठी जवळपास १४,४७३ अब्ज रुपये खर्च होणार असून, हे धरण हरित ऊर्जेसाठी असल्याचा चीनचा दावा आहे. परंतु, भारताला मुळीच तसे वाटत नाही. 

भारतीय विशेषज्ञ चीनच्या या धरणाकडे एक नवे हत्यार म्हणून पाहतात. धरण बांधून पूर्ण झाल्यानंतर चीन आपल्या मर्जीने पाणी सोडेल. चीन जगात कुणाचे ऐकत नाही. वाटेल तेव्हा तो ब्रह्मपुत्रेच्या पट्ट्यात दुष्काळ पाडेल आणि वाटेल तेव्हा पूर आणेल.  वैज्ञानिक या धरणाकडे ‘वॉटर बॉम्ब’ म्हणून पाहतात. चीनने एकदम सगळे पाणी भारताच्या दिशेने सोडून दिले तर काय होईल? अरुणाचल प्रदेशपासून आसामपर्यंत पूर येतील. अशा परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी भारताने आतापासून तयारी सुरू केली पाहिजे, असे जाणकार म्हणत आहेत. 

चीनवर अशी शंका घेण्यास सबळ कारणे आहेत. कोविडच्या स्मृती अजून पुसलेल्या नाहीत. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगातील दीड कोटीपेक्षा  जास्त लोकांचे प्राण घेतले. कोरोनाचा विषाणू चीनमधील प्रयोगशाळेत निर्माण केला गेला, अशी शंका जगाला अजूनही येते. ली वेनलियांग या शास्त्रज्ञाने सर्वात प्रथम या विषाणूच्या  प्रकोपाची माहिती दिली. त्याला चिनी पोलिसांनी अडवले होते. नंतर तो स्वतःच कोरोना विषाणूचा शिकार झाला. 

आणखी एका घटनेची आठवण देतो. ६ ऑगस्ट २०१०. ठिकाण लेह. या भागात निळ्याशार आकाशात विहरणारे ढग मोठ्या प्रमाणावर दिसतात.  वर्षांत तेथे चार इंचापेक्षाही कमी पाऊस होतो. नोव्हेंबरपासून एप्रिल महिन्यापर्यंत या भागात बर्फाची मोठी चादर पसरली जाते. पाऊस मात्र नेहमीच कमी होतो. लडाख प्रदेशाला शीत वाळवंट म्हटले जाते. लेह हे लडाख प्रदेशातील शहर आहे. २०१० मध्ये तेथे  अचानक दोन तासात १४ इंचापेक्षा जास्त पाऊस झाला. तेथील डोंगरं ठिसूळ आहेत आणि इतका पाऊस कधी होत नाही. त्यामुळे तो पाऊस एखाद्या संकटासारखा कोसळला आणि २५० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. शेकडो जखमी झाले. आता ढगफुटीमध्ये चीनची भूमिका काय असू शकते? 

एक घटना आठवा : २००८ चे बीजिंग ऑलिम्पिक. हवामानतज्ज्ञ  सांगत होते की, उद्घाटन समारंभावेळी पाऊस होऊ शकतो. सर्वजण चिंतेत होते. परंतु, चीनने सिल्वर आयोडाईडने भरलेले  १०००  पेक्षा जास्त अग्निबाण ढगांवर डागले आणि बीजिंगपासून दूर त्यांना पाऊस पाडायला लावला. चीनमध्ये ढग त्यांच्या मर्जीने पाऊस पाडू शकत नाहीत. या देशानेच लेहमध्ये ढगांना हत्यारासारखे वापरले, अशी शंका आजही घेतली जाते, ती म्हणूनच. नदीचे पाणी ‘वॉटर बॉम्ब’सारखे वापरणे चीनला काय फारसे कठीण आहे? संकट तर भारतावर येणार आहे. हे वॉटर बॉम्ब निकामी करण्याचे मार्ग आपल्याला आतापासून शोधावे लागतील. चीन जगाची महाशक्ती होऊ इच्छितो. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमेरिका आणि रशियाने जगाला घाबरवले; चीनही त्याच मार्गाने चालला आहे. मानवतेलाच नख लावायलाही हा देश मागेपुढे पाहणार नाही. परिस्थिती खरोखरच भयावह होत चालली आहे. 

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाchinaचीनXi Jinpingशी जिनपिंगDamधरण