शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

एआय आयटीच्या मुळावर येतंय का? अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात!

By मनोज गडनीस | Updated: June 15, 2025 08:32 IST

तंत्रज्ञान क्षेत्राने आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय हे तंत्रज्ञान जन्माला घातले आहे, ते आयटी इंजिनीअरच्या नोकऱ्या खाताना दिसत आहे.

मनोज गडनीस , विशेष प्रतिनिधी: भारतीय घरांमध्ये मुलांना डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हायचे आहे, हे मनावर बिंबवले जाते. मात्र, त्यातही जर इंजिनीअरिंग करायचे असेल, तर ते कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच करायचे हे सूत्र पालकांनी आखून दिलेले असते. याचे कारण म्हणजे संगणक शास्त्राचे शिक्षण घेतले म्हणजे हमखास नोकरी, उत्तम पगार, परदेशात काम करण्याची संधी हे समीकरण गेल्या अडीच दशकांपासून रुजले आहे. विशेष म्हणजे, गेल्या अडीच दशकांत अन्य शाखेतील अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देखील संगणक शास्त्राचे अद्ययावत शिक्षण घेऊन त्या क्षेत्रात नोकरी स्वीकारल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. पण, आता थोडा तांत्रिक विरोधाभास असा निर्माण झालाय की, ज्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय हे तंत्रज्ञान जन्माला घातले आहे, ते आयटी इंजिनीअरच्या नोकऱ्या खाताना दिसत आहे. आयटी उद्योगाची सध्या काय परिस्थिती आहे, एआयमुळे त्याला कसा फटका बसत आहे, याची ही आकडेवारी.

- प्रत्येक वर्षी भारतामधील विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांतून १० लाख ५० हजार विद्यार्थी संगणक शास्रातील विविध प्रकारचे शिक्षण घेतात. - गेल्या ३० वर्षांत वर्षाकाठी किमान २० टक्के दराने उद्योगात वाढ झाली आहे.- देशाच्या जीडीपीमध्ये आयटी उद्योगाचे ८ टक्के योगदान - २०२४ पर्यंत आयटी उद्योगात कार्यरत भारतीयांची संख्या ५० लाख ८० हजार. 

आयटी उद्योगात वयाच्या पस्तीशीमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या - बंगळुरू या एका शहरात १५०० आयटी कंपन्या आहेत, तर हैदराबाद, पुणे, मुंबई येथील आयटी कंपन्यांची संख्याही लक्षणीय.- आयटी क्षेत्रातील स्टार्ट अप कंपन्यांचीच संख्या एक लाखाहून अधिक.- २०२३ मध्ये भारतीय आयटी कंपन्यांनी तब्बल २०० अब्ज अमेरिकी डॉलरची उलाढाल निर्यातीच्या माध्यमातून केली. - आयटी उद्योगातील एका बड्या कंपनीच्या सर्वेक्षणानुसार सॉफ्टवेअरचे बेसिक कोडींग, डेटा एन्ट्री, सॉफ्टेवअर टेस्टिंग या कामांसाठी असलेल्या नोकऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांत ३० टक्के कपात.

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबईjobनोकरी