शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

IPL 2020: ‘आयपीएल मेरी मुठ्ठी में’; मुंबई इंडियन्सचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 06:56 IST

मुंबईच्या गोलंदाजीत प्रचंड असं वैविध्य आहे.

- द्वारकानाथ संझगिरी

मुंबई इंडियन्सने अपेक्षेप्रमाणे पाचव्यांदा आयपीएल जिंकली. दिल्लीने तेजस्वी यादव व्हावं अशी किमान अपेक्षा होती. पण तसं काही घडलं नाही. मुंबई संघ जिंकला नसता तर मला प्रचंड धक्का बसला असता. कंगना शहाण्यासारखी बोलल्यावर बसेल तसा. या स्पर्धेतला तो सर्वोत्कृष्ट संघ होता. ‘आयपीएल मेरी मुठ्ठी में’ म्हणावं इतकी त्याची यंदाची हैसीयत होती. चांगल्या संघाचा कस हा कठीण परिस्थितीतच लागतो. मुंबई संघ तेल लावलेल्या पहिलवानासारखा वारंवार कठीण परिस्थितीतून निसटला.

मुंबईचा संघ हा अकराव्या मजल्यावर टेरेस फ्लॅटचा रहिवासी होता तर दिल्लीचा संघ हा सातव्या मजल्यावरचा. मधले सगळे मजले रिकामे होते. मुंबईच्या या उंचीचं कारण हा अत्यंत समतोल होता. आयपीएलमध्ये संघ कसा असावा, याचं मूर्तिमंत उदाहरण ! आधी फलंदाजी- रोहित, डीकॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, पोलार्ड, कुणाल पंड्या आणि कुल्टरनाइल. यातला प्रत्येक फलंदाज अत्यंत हुकमीपणे मोठे फटके खेळू शकतो. रोहित, सूर्यकुमार, किशन, डीकॉक यांची फलंदाजी सुसंस्कृतपणाच्या साजूक तुपात घोळलेली आहे. त्यांना टी-२०चे कपडे फिट बसतात, ही त्यांची गुणवत्ता आहे.

हार्दिक पंड्या, पोलार्ड हे  षटकार ठोकतात तेव्हा ते मला घटोत्कच वाटतात. ते मायावी युद्ध तर खेळत नाहीयेत ना, अशी शंका येते.  शेवटच्या तीन षटकांत वगैरे ५०, ६० धावा घेणं हे त्यांच्यासाठी कधीकधी हातचा मळ आहे, असं वाटतं. त्यापेक्षा  त्यांना ताडगोळा सोलणं जास्त कठीण जाईल. मुंबईच्या गोलंदाजीत प्रचंड असं वैविध्य आहे. डावखुरा आणि उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज, डावखुरा फिरकी गोलंदाज, लेग स्पिनर, ऑफ स्पिनर, मध्यमगती असे सगळ्या प्रकारचे गोलंदाज मुंबई संघात आहेत.  त्यात  मुंबईला दिल्लीने बोल्ट दिला.  एखादा संघ आपल्याला नको असलेला खेळाडू दुसऱ्या संघाला विकू शकतो. त्यावर मालक पैसे कमावतात.  दिल्लीने  बोल्टला घटस्फोट दिला. मुंबईने लग्न केलं. या बोल्टने मुंबईला वारंवार जिंकून दिलं.  आखातातल्या वातावरणात त्याने धमाल उडवून दिली. मुंबई संघ बोल्टवरच गुजराण करतो असं नाही. त्यांच्याकडे चक्क बुमराह आहे. म्हणजे द्रौपदीची थाळीच. विकेट हवीय?- ही घे. इतकं सोपं काम असतं त्याचं. त्याची चार षटकं कशीही वाटा, त्याचं ताट विकेटने भरलेलं असायचं. अंतिम सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाताना त्याला दृष्ट लागू नये म्हणून नियतीने  लावलेली तीट असावी ही. रोहित शर्मा हा चांगला कर्णधार आहे.

मुंबई त्याच्या नेतृत्वाखाली पाच वेळा जिंकली यातच प्रशस्तिपत्र लिहिलेलं आहे. तो मैदानावर शो ऑफ करत नाही. पण गरज पडेल तेव्हा आक्रमक क्षेत्ररचना, गोलंदाजीमधला एखादा अफलातून बदल यातून आपलं नेतृत्व दाखवतो. आयपीएलच्या फायनलमध्ये रोहितने आपण फिट आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याने फॉर्मात यायलासुद्धा अंतिम सामन्याचा मुहूर्त गाठला. रोहितला निवड समिती आणि विराटला दाखवून द्यायचं होतं की तो फिट तर आहेच, शिवाय धावा अजूनही त्याच्या बॅटवर प्रेम करतात. पहिल्याच षटकामध्ये त्याने अश्विनला पुढे सरसावत सरळ षटकार ठोकला.

योग्यवेळी ज्वालामुखी जागा झाला. रोहितला असा सूर लागला की तो बाद होईपर्यंत एकदाही बेसूर झाला नाही. गंमत म्हणजे फिरकी गोलंदाजांना  काही वेळेला तो फॉरवर्ड डिफेन्सिव शॉट्स खेळला. कदाचित आपला फॉरवर्ड बचाव हा आपण विसरलेलो नाही ना? याची त्याला खात्री करून घ्यायची असावी ! पण ज्याक्षणी त्याला हवेत चेंडू किंचित जास्त वेळ दिसला त्यावेळेला पुढे सरसावत त्याने थेट षटकार चढवले. अंतिम सामन्यात मुंबई कधीच अडचणीत नव्हती. तो बाद झाल्यावर तर नव्हतीच नव्हती. जी गोष्ट रोहितला जमली, ती आयआयपीएलमध्ये विराटला नाही जमली. किमान टी-२० आणि वनडेत, रोहितने नेतृत्वासाठी आव्हान उभं केलंय का?...नको, उगीच आगीत तेल कशाला टाकूया?

टॅग्स :IPL 2020IPL 2020Mumbai Indiansमुंबई इंडियन्स