शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

घुसमटणारे शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 5:05 AM

वाहनांची बेसुुमार संख्या, सतत सुरू असलेली बांधकामे यातून वाढलेल्या वायुप्रदूषणामुळे मुंबईत दोन वर्षांपूर्वी १०,५०० जणांचा अकाली मृत्यू झाल्याचा निष्कर्ष सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटने काढला आहे़

वाहनांची बेसुुमार संख्या, सतत सुरू असलेली बांधकामे यातून वाढलेल्या वायुप्रदूषणामुळे मुंबईत दोन वर्षांपूर्वी १०,५०० जणांचा अकाली मृत्यू झाल्याचा निष्कर्ष सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटने काढला आहे़ गेल्या आठवड्यात राज्य शासनानेही मुंबई व नवी मुंबईतील प्रदूषण वाढल्याचे जाहीर केले आणि ते रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले़ मुंबईभोवतीचा प्रदूषणाचा विळखा किती घट्ट होतो आहे आणि ते किती जीवघेणे ठरू शकते, याचा अंदाज या दोन्ही वृत्तांतून येतो़ मुंबईचे प्रदूषण काही काल-परवा वाढलेले नाही़ वाढती वाहने, वेगवेगळ्या कारणांनी होणारी वृक्षतोड, सततची बांधकामे अशी अनेक कारणे त्यासाठी कारणीभूत आहेत. पण ते रोखण्याच्या उपाययोजना तोकड्या असल्याने मुंबईची परिस्थिती दिल्लीसारखी होईल, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. प्रदूषण आणि वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून ‘एक कुटुंब एक वाहन’ असा पर्याय न्यायालयाने सुचवला़, त्याला तीन वर्षे झाली़ पण सरकार त्यावर विचारच करते आहे़ ध्वनिप्रदूषणाचा मुद्दाही अशाच प्रकारे हाताबाहेर गेला. अखेर रात्री १० नंतर लाऊडस्पीकरच्या वापरावर न्यायालयाने बंदी घातल्याने, आदेश पाळले नाहीत तर पोलिसांवर कारवाई होईल, असा दम दिल्याने हळूहळू का होईना ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आले. याच धर्तीवर हवेच्या प्रदूषणावरही ठोस उपाययोजनांची गरज आहे. तोच प्रकार प्लॅस्टिकबंदीचा. सध्या मुंबईत इमारतींचीच नव्हे, तर वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यातून हवा सतत प्रदूषित होत राहते. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उड्डाणपुलांशेजारी भिंत उभारण्याचा पर्याय समोर आला़ अशाच प्रकारे मोठ्या प्रकल्पांशेजारी कापडी भिंतीसह अडथळे उभारले तर किती प्रदूषण रोखता येईल, याची चाचपणी व्हायला हवी़ राज्य शासनाने प्रदूषण रोखण्याचा उपाय म्हणून प्लॅस्टिकबंदी केली़ हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी अशी काही सक्ती करता येईल का, याचा विचार व्हायला हवा़ ध्वनिप्रदूषणाचे आदेश देताना न्यायालयाने मुंबईतील प्रत्येक विभागाचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन नियम तयार करण्याचे आदेश दिले होते़ त्याच पद्धतीने हवेचे प्रदूषण कोणत्या विभागात अधिक आहे, याचा अभ्यास करून त्यावर तोडगा शोधला; तर धोक्याची ठिकाणे सहजगत्या लक्षात येतील आणि तेथे उपाययोजना करून जलदगतीने प्रदूषण रोखता येऊ शकते़ दिल्लीतील वाहनांचे प्रदूषण रोखण्यासाठी विजेवर चालणाऱ्या एक लाख वाहनांना परवानगी देण्यात आली. मुंबई परिसरातही सार्वजनिक, खासगी वाहतुकीत विजेच्या वाहनांचा वापर वाढावा म्हणून धोरणात बदल करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हवेची गुणवत्ता मोजण्यासोबतच अशा वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करून मुंबईतील हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण आणायला हवे, तरच या महानगरीची घुसमट कमी होऊ शकेल.