शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

घुसमटणारे शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 05:05 IST

वाहनांची बेसुुमार संख्या, सतत सुरू असलेली बांधकामे यातून वाढलेल्या वायुप्रदूषणामुळे मुंबईत दोन वर्षांपूर्वी १०,५०० जणांचा अकाली मृत्यू झाल्याचा निष्कर्ष सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटने काढला आहे़

वाहनांची बेसुुमार संख्या, सतत सुरू असलेली बांधकामे यातून वाढलेल्या वायुप्रदूषणामुळे मुंबईत दोन वर्षांपूर्वी १०,५०० जणांचा अकाली मृत्यू झाल्याचा निष्कर्ष सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटने काढला आहे़ गेल्या आठवड्यात राज्य शासनानेही मुंबई व नवी मुंबईतील प्रदूषण वाढल्याचे जाहीर केले आणि ते रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले़ मुंबईभोवतीचा प्रदूषणाचा विळखा किती घट्ट होतो आहे आणि ते किती जीवघेणे ठरू शकते, याचा अंदाज या दोन्ही वृत्तांतून येतो़ मुंबईचे प्रदूषण काही काल-परवा वाढलेले नाही़ वाढती वाहने, वेगवेगळ्या कारणांनी होणारी वृक्षतोड, सततची बांधकामे अशी अनेक कारणे त्यासाठी कारणीभूत आहेत. पण ते रोखण्याच्या उपाययोजना तोकड्या असल्याने मुंबईची परिस्थिती दिल्लीसारखी होईल, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. प्रदूषण आणि वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून ‘एक कुटुंब एक वाहन’ असा पर्याय न्यायालयाने सुचवला़, त्याला तीन वर्षे झाली़ पण सरकार त्यावर विचारच करते आहे़ ध्वनिप्रदूषणाचा मुद्दाही अशाच प्रकारे हाताबाहेर गेला. अखेर रात्री १० नंतर लाऊडस्पीकरच्या वापरावर न्यायालयाने बंदी घातल्याने, आदेश पाळले नाहीत तर पोलिसांवर कारवाई होईल, असा दम दिल्याने हळूहळू का होईना ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आले. याच धर्तीवर हवेच्या प्रदूषणावरही ठोस उपाययोजनांची गरज आहे. तोच प्रकार प्लॅस्टिकबंदीचा. सध्या मुंबईत इमारतींचीच नव्हे, तर वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यातून हवा सतत प्रदूषित होत राहते. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उड्डाणपुलांशेजारी भिंत उभारण्याचा पर्याय समोर आला़ अशाच प्रकारे मोठ्या प्रकल्पांशेजारी कापडी भिंतीसह अडथळे उभारले तर किती प्रदूषण रोखता येईल, याची चाचपणी व्हायला हवी़ राज्य शासनाने प्रदूषण रोखण्याचा उपाय म्हणून प्लॅस्टिकबंदी केली़ हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी अशी काही सक्ती करता येईल का, याचा विचार व्हायला हवा़ ध्वनिप्रदूषणाचे आदेश देताना न्यायालयाने मुंबईतील प्रत्येक विभागाचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन नियम तयार करण्याचे आदेश दिले होते़ त्याच पद्धतीने हवेचे प्रदूषण कोणत्या विभागात अधिक आहे, याचा अभ्यास करून त्यावर तोडगा शोधला; तर धोक्याची ठिकाणे सहजगत्या लक्षात येतील आणि तेथे उपाययोजना करून जलदगतीने प्रदूषण रोखता येऊ शकते़ दिल्लीतील वाहनांचे प्रदूषण रोखण्यासाठी विजेवर चालणाऱ्या एक लाख वाहनांना परवानगी देण्यात आली. मुंबई परिसरातही सार्वजनिक, खासगी वाहतुकीत विजेच्या वाहनांचा वापर वाढावा म्हणून धोरणात बदल करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हवेची गुणवत्ता मोजण्यासोबतच अशा वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करून मुंबईतील हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण आणायला हवे, तरच या महानगरीची घुसमट कमी होऊ शकेल.