शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

घुसमटणारे शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 05:05 IST

वाहनांची बेसुुमार संख्या, सतत सुरू असलेली बांधकामे यातून वाढलेल्या वायुप्रदूषणामुळे मुंबईत दोन वर्षांपूर्वी १०,५०० जणांचा अकाली मृत्यू झाल्याचा निष्कर्ष सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटने काढला आहे़

वाहनांची बेसुुमार संख्या, सतत सुरू असलेली बांधकामे यातून वाढलेल्या वायुप्रदूषणामुळे मुंबईत दोन वर्षांपूर्वी १०,५०० जणांचा अकाली मृत्यू झाल्याचा निष्कर्ष सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटने काढला आहे़ गेल्या आठवड्यात राज्य शासनानेही मुंबई व नवी मुंबईतील प्रदूषण वाढल्याचे जाहीर केले आणि ते रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले़ मुंबईभोवतीचा प्रदूषणाचा विळखा किती घट्ट होतो आहे आणि ते किती जीवघेणे ठरू शकते, याचा अंदाज या दोन्ही वृत्तांतून येतो़ मुंबईचे प्रदूषण काही काल-परवा वाढलेले नाही़ वाढती वाहने, वेगवेगळ्या कारणांनी होणारी वृक्षतोड, सततची बांधकामे अशी अनेक कारणे त्यासाठी कारणीभूत आहेत. पण ते रोखण्याच्या उपाययोजना तोकड्या असल्याने मुंबईची परिस्थिती दिल्लीसारखी होईल, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. प्रदूषण आणि वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून ‘एक कुटुंब एक वाहन’ असा पर्याय न्यायालयाने सुचवला़, त्याला तीन वर्षे झाली़ पण सरकार त्यावर विचारच करते आहे़ ध्वनिप्रदूषणाचा मुद्दाही अशाच प्रकारे हाताबाहेर गेला. अखेर रात्री १० नंतर लाऊडस्पीकरच्या वापरावर न्यायालयाने बंदी घातल्याने, आदेश पाळले नाहीत तर पोलिसांवर कारवाई होईल, असा दम दिल्याने हळूहळू का होईना ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आले. याच धर्तीवर हवेच्या प्रदूषणावरही ठोस उपाययोजनांची गरज आहे. तोच प्रकार प्लॅस्टिकबंदीचा. सध्या मुंबईत इमारतींचीच नव्हे, तर वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यातून हवा सतत प्रदूषित होत राहते. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उड्डाणपुलांशेजारी भिंत उभारण्याचा पर्याय समोर आला़ अशाच प्रकारे मोठ्या प्रकल्पांशेजारी कापडी भिंतीसह अडथळे उभारले तर किती प्रदूषण रोखता येईल, याची चाचपणी व्हायला हवी़ राज्य शासनाने प्रदूषण रोखण्याचा उपाय म्हणून प्लॅस्टिकबंदी केली़ हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी अशी काही सक्ती करता येईल का, याचा विचार व्हायला हवा़ ध्वनिप्रदूषणाचे आदेश देताना न्यायालयाने मुंबईतील प्रत्येक विभागाचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन नियम तयार करण्याचे आदेश दिले होते़ त्याच पद्धतीने हवेचे प्रदूषण कोणत्या विभागात अधिक आहे, याचा अभ्यास करून त्यावर तोडगा शोधला; तर धोक्याची ठिकाणे सहजगत्या लक्षात येतील आणि तेथे उपाययोजना करून जलदगतीने प्रदूषण रोखता येऊ शकते़ दिल्लीतील वाहनांचे प्रदूषण रोखण्यासाठी विजेवर चालणाऱ्या एक लाख वाहनांना परवानगी देण्यात आली. मुंबई परिसरातही सार्वजनिक, खासगी वाहतुकीत विजेच्या वाहनांचा वापर वाढावा म्हणून धोरणात बदल करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हवेची गुणवत्ता मोजण्यासोबतच अशा वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करून मुंबईतील हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण आणायला हवे, तरच या महानगरीची घुसमट कमी होऊ शकेल.