शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

प्रतिके संपवू पाहण्याचा असहिष्णू वारसा

By गजानन जानभोर | Updated: November 14, 2017 13:48 IST

एखाद्या व्यक्तीचा नामफलक पुसून काढणे एवढ्यापुरती ही घटना मर्यादित नाही. ती आपल्या मनातील संवेदनशून्यता आणि एखाद्या कृतीचे अतिरेकीपण दर्शविणारी आहे.

एखाद्या व्यक्तीचा नामफलक पुसून काढणे एवढ्यापुरती ही घटना मर्यादित नाही. ती आपल्या मनातील संवेदनशून्यता आणि एखाद्या कृतीचे अतिरेकीपण दर्शविणारी आहे. आपल्याला न आवडणारी प्रतिके संपविण्याच्या हिंसक प्रवृत्तीची ती द्योतक आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, महाराष्ट्रभूषण रा. कृ. पाटील यांचे नागपुरातील एका मार्गाला दिलेले नाव पुसून काढण्याचे काही मंडळींचे कारस्थान ‘लोकमत’मुळे उघडकीस आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खडसावल्यानंतर संबंधितांचे मनसुबे उधळले गेले असले तरी हा विषय इथेच संपलेला नाही. या घटनेच्या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.रा. कृ. पाटलांचे नाव पुसून काढण्याचा प्रस्ताव देणारे लोकप्रतिनिधी सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांच्या या कृतीला अनवधान किंवा अज्ञान संबोधणे हेही त्यांच्या विकृत मानसिकतेची पाठराखण केल्यासारखे आहे. हे भंयकर प्रकरण जनतेसमोर आल्यानंतरही नागपूरच्या महापौरांनी साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य दाखविलेले नाही, याचा अर्थ काय घ्यावा? ज्या महापुरुषांनी देशासाठी सर्वस्व दिले त्यांच्या त्यागाचा वर्तमानाला विसर पडला हे कटूसत्य सांगणारी ही घटना आहे. दुसरे असे की, रा. कृ. पाटील यांचा त्याग ठाऊक असूनही हे लोकप्रतिनिधी असे का वागले? बालपणापासून त्यांच्या मनावर झालेल्या उलट्या धाटणीच्या सामाजिक, सांस्कृतिक संस्काराचा हा परिणाम तर नसावा ना? एखाद्या व्यक्तीचा नामफलक पुसून काढणे एवढ्यापुरती ही घटना मर्यादित नाही. ती आपल्या मनातील संवेदनशून्यता आणि एखाद्या कृतीचे अतिरेकीपण दर्शविणारी आहे. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी भगवान बुद्धाच्या मूर्ती तोडल्या, अयोध्येतील बाबरी मशिद पाडली गेली, या घटना काय दर्शवितात? आपल्याला न आवडणारी प्रतिके संपविण्याच्या हिंसक प्रवृत्तीचे त्या द्योतक आहेत. सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक असलेले ताजमहल हे कब्रस्थान आहे, असे घाणेरडे विधान हरियाणाचा एखादा मंत्री करतो तेव्हा त्याला ती वास्तू तिथे नकोशी असते आणि भविष्यात ती नष्ट व्हावी, अशी चिथावणीही त्याला त्या माध्यमातून द्यायची असते. रा. कृ. पाटलांसारख्या गांधीवाद्यांचे नाव पुसून काढण्याची मानसिकता अशाच संस्काराचा परिपाक आहे. हे संस्कार असे प्रत्यक्ष केले जात नाहीत. ते जन्मापासूनच धर्माच्या, जातीच्या, कुटुंबातील वातावरणातून पद्धतशीरपणे बिंबवले जात असतात. लहान मुलांसमोर या महापुरुषांबद्दल मुद्दाम अपशब्द वापरणे, घरात त्यांच्याबद्दल नकारात्मक चर्चा घडवून आणणे, त्यांच्या विचारांची टवाळी करणे...या विचारसरणीतूनच पुढे ते मूल कट्टर, अतिरेकी विचारांचे निपजत असते. समाजात वावरू लागल्यानंतर त्या महापुरुषाबद्दल, त्याच्या प्रतिकांबद्दल त्याच्या मनात द्वेषाची भावना सळसळत असते. मग त्यातूनच नामफलक, पुतळे, वास्तू या प्रतिकांची विटंबना करण्याचा विचार त्याच्या मनात बळावतो. द्वेषाची प्रतिके जशी त्याच्या मनात बिंबवली जातात अगदी तसेच श्रद्धेचे विषयदेखील मनावर खोलवर कोरले जातात. या श्रद्धास्थानांबद्दल कुणी चिकित्सक टीका केली की तो चवताळतो. असे चवताळलेले तरुण अलीकडे समाजमाध्यमांवर आकम्रक असतात. त्यांची जडणघडण अशीच झालेली असते. ही अतिरेकी प्रवृत्ती सर्वच सामाजिक चळवळींत दिसून येते. ती साºया धर्मांत आणि जातींतही आहे. आपल्याला श्रद्धेय असलेल्या महापुरुषांचे मोठेपण सांगताना दुसºया महापुरुषाला शिव्या घालणे हाही त्यातीलच एक असहिष्णू प्रकार. जी माणसे समाजात प्रतिष्ठित म्हणून गणली जातात त्यांना सार्वजनिक जीवनात असे अविवेकी वागता येत नाही. पण बालपणी मन आणि मेंदूची अशी अचेतन मशागत झाली असल्याने कधीतरी तो विचार उफाळून येतो आणि मग रा.कृ. पाटलांचे नाव पुसून काढण्याचा प्रस्ताव त्यातूनच जन्मास येतो. ही कृती योग्य की अयोग्य? त्याचे समाजमनावर काय परिणाम होतील? याबद्दलचा सारासार विचार करण्याची आवश्यकता त्यांना वाटत नाही. या कृतीबद्दल त्यांच्या सचेतन मनालासुद्धा काहीच कल्पना नसते. त्या कृतीचे समाजात पडसाद उमटू लागल्यानंतरही त्यांना पश्चाताप होत नाही. रा. कृ. पाटलांच्या नामफलकाच्या निमित्ताने समोर आलेली ही घटना काहींना एक क्षुल्लक बाब वाटत असली तरी या अविवेकी वर्तनातून आपण पुढच्या पिढीला असहिष्णुतेचा वारसा देत आहोत, याचे भान या मंडळींना राहिलेले नाही.