शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

बारामती वाड्यावरचं बौद्धिक

By राजा माने | Updated: December 25, 2017 02:35 IST

रेशीमबागच्या बौद्धिकाला इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर आमचा यमके (एम.के. अर्थात मनकवडे) ला देखील प्रवेश मिळाला नव्हता... त्यात आता बारामती वाड्यावरचं बौद्धिक त्याच्या नशिबी रिपोर्टिंगसाठी आलं!

रेशीमबागच्या बौद्धिकाला इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर आमचा यमके (एम.के. अर्थात मनकवडे) ला देखील प्रवेश मिळाला नव्हता... त्यात आता बारामती वाड्यावरचं बौद्धिक त्याच्या नशिबी रिपोर्टिंगसाठी आलं! या बौद्धिकाला पवारसाहेबांनी मराठीभूमीतील निवडक प्रस्थापितांनाच निमंत्रण धाडलेलं होतं... यमकेनं थेट पवारसाहेबांनाच गळ घालून प्रवेश मिळविला. ‘रिझल्ट ओरिएंटेड’ रिपोर्टिंग इंद्र दरबारी पोहोचविण्याच्या अटींवर साहेबांनी त्याला बौद्धिकाला प्रवेश दिला. बौद्धिक सभास्थानी अजितदादांपासून जितेंद्रभाऊपर्यंतचा नेहमीचा यशस्वी एकही चेहरा दिसत नव्हता. उपस्थित समस्त प्रस्थापितांचे बौद्धिक घेण्यासाठी पूजनीय अडवाणी, राळेगणचे अण्णा, खान्देशचे नाथाभाऊ आणि सुरेशदादा, विदर्भातून पटोल्यांचे नाना यासारखी दिग्गज मंडळी येणार असल्याचे निमंत्रितांना सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात बौद्धिकाची प्रार्थना झाली आणि स्टेजवर फक्त पवारसाहेबच अवतरले! हे पाहून उपस्थित प्रस्थापित विचलित झाले व कुजबूज करू लागले. साहेबांनी माईकचा ताबा घेतला आणि बोलते झाले...पवारसाहेब : प्रस्थापित मित्रांनो, देशाच्या आणि राज्याच्या भविष्याबद्दल मंथन व्हावे या उद्देशाने तुम्हाला या ठिकाणी बोलावले आहे. (भविष्य हा शब्द ऐकताच पुण्यातून आलेला एक गट चवताळून उठला आणि त्यातील हर्षवर्धन बोलू लागले...)हर्षवर्धन : साहेब, आपल्या पुण्याचे खा. काकडे महाराज भविष्यवाले असताना भविष्याची चर्चा आपण कशाला करायची?पवारसाहेब : हर्षवर्धन भाऊ, त्यांच्या भविष्याचा फायदा नरेंद्रभाऊ आणि देवेंद्रपंतांना होईल. पण, पुण्याचे म्हणून तुम्ही-आम्ही काकडे महाराजांना हात दाखवूनच घेऊ!हा संवाद चालू असतानाच नाथाभाऊंची एन्ट्री झाली. त्यांच्यासोबतच्या पाच-सहा जणांनी ‘प्रस्थापित नाथाभाऊंचा विजय असो’, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. एवढ्यात निमंत्रण नसताना घुसलेले आ. नितेशही घोषणा देऊ लागले, ‘कुंपणावरील ढेगू-पाटील विखेंचा विजय असो’, ही घोषणाबाजी सुरू असतानाच रावतांच्या संजयची नवजुद्दीन सिद्धीकीसह एन्ट्री झाली. हे चाललेले असतानाच छगनरावांचा विशेष निरोप आल्याने आजचे बौद्धिक उद्यावर ढकलल्याची घोषणा पवारसाहेबांनी केली.