शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

बुद्धीचं वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:57 IST

विश्वाच्या पसा-यात मानवाला महत्त्व कशामुळे आहे? हा प्रश्न मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. अन्य योनीमध्ये जे नाही ना ते मानवामध्ये आहे. इतर जीव आहार, निद्रा, भय आणि मैथून या चारच स्तरावर जगतात. मानव यापेक्षा वेगळा आहे. त्याला ‘बुद्धीचं वरदान’ भगवंतानं प्रदान केलेलं आहे. त्यासमवेत ‘मन’देखील दिलं!

- कौमुदी गोडबोलेविश्वाच्या पसा-यात मानवाला महत्त्व कशामुळे आहे? हा प्रश्न मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. अन्य योनीमध्ये जे नाही ना ते मानवामध्ये आहे. इतर जीव आहार, निद्रा, भय आणि मैथून या चारच स्तरावर जगतात. मानव यापेक्षा वेगळा आहे. त्याला ‘बुद्धीचं वरदान’ भगवंतानं प्रदान केलेलं आहे. त्यासमवेत ‘मन’देखील दिलं! मनामुळे माणूस विशेषपणानं ओळखला जातो. त्याचप्रमाणे बुद्धीमुळे तो प्रगतीपथावर आहे. त्याने संशोधन करून अनेक क्षेत्रामध्ये शोध लावले आहेत.बुद्धीच्या देणगीमुळे तो इतर प्राण्यांपेक्षा उच्च दर्जाचं जीवन जगू शकतो आहे. स्वत:ची नैसर्गिक, सामाजिक, उन्नती करून घेऊ शकतो आहे. संरक्षण, संवर्धन करून सुसंस्कारित समाज घडवू शकतो आहे. तो आकाशात उंच भरारी घेऊन आकाशाला स्पर्श करतो. देहाला आराम मिळण्यासाठी विविध वस्तूंची निर्मिती करतो. बुद्धीच्या जोरावर जगावर अधिराज्य गाजविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतो. निसर्गाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्यांमध्ये भगवंतानं दिलेल्या बुद्धीचा सुयोग्य उपयोग करण्याची विस्मृती होते.कुबुद्धी-दुर्बुद्धी प्रबळ होते. सुमती कुमती होऊन जाते. संपत्ती, सत्तेची लालसा त्याला पथभ्रष्ट करते. यामुळे द्वेष, मद, मत्सर प्रबळ होतात. यामधूनच लोभ, क्रोध अनावर होतात. वासना, विकार, विकृतीच्या विळख्यात स्वत:समवेत अनेकांना अडकवतो. ‘काम’ इतका बळावतो की माणूस माणुसकी विसरून जातो. श्वापदाप्रमाणे वर्तन करतो. प्रगती, उन्नती दूर राहते. अधोगतीचा वेग वाढत जातो. अशा ढाळसलेल्या, कोसळलेल्या मानवाला पुनश्च सुयोग्य मार्गावर आणण्यासाठी ‘संत’ ‘विभूती’ अवतार घेतात. सद्बुद्धी प्राप्त होऊन सन्मार्गावर राहण्यासाठी भगवंताच्या भक्तीचा सुंदर मार्ग दाखवतात. स्वआचरणातून समाजाला घडवण्यासाठी सदैव झटतात. सुंदर, सात्विक विचारांचा सुगंध दरवळण्यासाठी कुबुद्धीला भगवंताकडे वळवतात. मग बुद्धीमध्ये अनुकूल बदल घडून येतो. प्रत्येक माणसानं भगवंतानं दिलेल्या बुद्धीचा सुयोग्य पद्धतीनं उपयोग करण्याची आवश्यकता आहे. आपल्या बुद्धीला सदैव सतेज, सात्विक ठेवण्यासाठी भगवंताच्या नित्य स्मरणाची सवय लावणं गरजेचं आहे. भगवंताच्या प्रति ‘कृतज्ञ भाव’ ठेवला की बुद्धीमध्ये बिघाड होण्याचं भय उरत नाही.संत सर्वश्रेष्ठ असून देखील ते भगवंताकडे ‘सद्बुद्धीचं दान’ मागतात. मग आपल्यासारख्या सामान्य माणसांनी कळवळून भगवंताला ‘सुयोग्य बुद्धीचं मागणं’ नको का मागायला?

टॅग्स :newsबातम्या