शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

बुद्धीचं वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:57 IST

विश्वाच्या पसा-यात मानवाला महत्त्व कशामुळे आहे? हा प्रश्न मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. अन्य योनीमध्ये जे नाही ना ते मानवामध्ये आहे. इतर जीव आहार, निद्रा, भय आणि मैथून या चारच स्तरावर जगतात. मानव यापेक्षा वेगळा आहे. त्याला ‘बुद्धीचं वरदान’ भगवंतानं प्रदान केलेलं आहे. त्यासमवेत ‘मन’देखील दिलं!

- कौमुदी गोडबोलेविश्वाच्या पसा-यात मानवाला महत्त्व कशामुळे आहे? हा प्रश्न मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. अन्य योनीमध्ये जे नाही ना ते मानवामध्ये आहे. इतर जीव आहार, निद्रा, भय आणि मैथून या चारच स्तरावर जगतात. मानव यापेक्षा वेगळा आहे. त्याला ‘बुद्धीचं वरदान’ भगवंतानं प्रदान केलेलं आहे. त्यासमवेत ‘मन’देखील दिलं! मनामुळे माणूस विशेषपणानं ओळखला जातो. त्याचप्रमाणे बुद्धीमुळे तो प्रगतीपथावर आहे. त्याने संशोधन करून अनेक क्षेत्रामध्ये शोध लावले आहेत.बुद्धीच्या देणगीमुळे तो इतर प्राण्यांपेक्षा उच्च दर्जाचं जीवन जगू शकतो आहे. स्वत:ची नैसर्गिक, सामाजिक, उन्नती करून घेऊ शकतो आहे. संरक्षण, संवर्धन करून सुसंस्कारित समाज घडवू शकतो आहे. तो आकाशात उंच भरारी घेऊन आकाशाला स्पर्श करतो. देहाला आराम मिळण्यासाठी विविध वस्तूंची निर्मिती करतो. बुद्धीच्या जोरावर जगावर अधिराज्य गाजविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतो. निसर्गाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्यांमध्ये भगवंतानं दिलेल्या बुद्धीचा सुयोग्य उपयोग करण्याची विस्मृती होते.कुबुद्धी-दुर्बुद्धी प्रबळ होते. सुमती कुमती होऊन जाते. संपत्ती, सत्तेची लालसा त्याला पथभ्रष्ट करते. यामुळे द्वेष, मद, मत्सर प्रबळ होतात. यामधूनच लोभ, क्रोध अनावर होतात. वासना, विकार, विकृतीच्या विळख्यात स्वत:समवेत अनेकांना अडकवतो. ‘काम’ इतका बळावतो की माणूस माणुसकी विसरून जातो. श्वापदाप्रमाणे वर्तन करतो. प्रगती, उन्नती दूर राहते. अधोगतीचा वेग वाढत जातो. अशा ढाळसलेल्या, कोसळलेल्या मानवाला पुनश्च सुयोग्य मार्गावर आणण्यासाठी ‘संत’ ‘विभूती’ अवतार घेतात. सद्बुद्धी प्राप्त होऊन सन्मार्गावर राहण्यासाठी भगवंताच्या भक्तीचा सुंदर मार्ग दाखवतात. स्वआचरणातून समाजाला घडवण्यासाठी सदैव झटतात. सुंदर, सात्विक विचारांचा सुगंध दरवळण्यासाठी कुबुद्धीला भगवंताकडे वळवतात. मग बुद्धीमध्ये अनुकूल बदल घडून येतो. प्रत्येक माणसानं भगवंतानं दिलेल्या बुद्धीचा सुयोग्य पद्धतीनं उपयोग करण्याची आवश्यकता आहे. आपल्या बुद्धीला सदैव सतेज, सात्विक ठेवण्यासाठी भगवंताच्या नित्य स्मरणाची सवय लावणं गरजेचं आहे. भगवंताच्या प्रति ‘कृतज्ञ भाव’ ठेवला की बुद्धीमध्ये बिघाड होण्याचं भय उरत नाही.संत सर्वश्रेष्ठ असून देखील ते भगवंताकडे ‘सद्बुद्धीचं दान’ मागतात. मग आपल्यासारख्या सामान्य माणसांनी कळवळून भगवंताला ‘सुयोग्य बुद्धीचं मागणं’ नको का मागायला?

टॅग्स :newsबातम्या