शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धीचं वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:57 IST

विश्वाच्या पसा-यात मानवाला महत्त्व कशामुळे आहे? हा प्रश्न मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. अन्य योनीमध्ये जे नाही ना ते मानवामध्ये आहे. इतर जीव आहार, निद्रा, भय आणि मैथून या चारच स्तरावर जगतात. मानव यापेक्षा वेगळा आहे. त्याला ‘बुद्धीचं वरदान’ भगवंतानं प्रदान केलेलं आहे. त्यासमवेत ‘मन’देखील दिलं!

- कौमुदी गोडबोलेविश्वाच्या पसा-यात मानवाला महत्त्व कशामुळे आहे? हा प्रश्न मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. अन्य योनीमध्ये जे नाही ना ते मानवामध्ये आहे. इतर जीव आहार, निद्रा, भय आणि मैथून या चारच स्तरावर जगतात. मानव यापेक्षा वेगळा आहे. त्याला ‘बुद्धीचं वरदान’ भगवंतानं प्रदान केलेलं आहे. त्यासमवेत ‘मन’देखील दिलं! मनामुळे माणूस विशेषपणानं ओळखला जातो. त्याचप्रमाणे बुद्धीमुळे तो प्रगतीपथावर आहे. त्याने संशोधन करून अनेक क्षेत्रामध्ये शोध लावले आहेत.बुद्धीच्या देणगीमुळे तो इतर प्राण्यांपेक्षा उच्च दर्जाचं जीवन जगू शकतो आहे. स्वत:ची नैसर्गिक, सामाजिक, उन्नती करून घेऊ शकतो आहे. संरक्षण, संवर्धन करून सुसंस्कारित समाज घडवू शकतो आहे. तो आकाशात उंच भरारी घेऊन आकाशाला स्पर्श करतो. देहाला आराम मिळण्यासाठी विविध वस्तूंची निर्मिती करतो. बुद्धीच्या जोरावर जगावर अधिराज्य गाजविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतो. निसर्गाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्यांमध्ये भगवंतानं दिलेल्या बुद्धीचा सुयोग्य उपयोग करण्याची विस्मृती होते.कुबुद्धी-दुर्बुद्धी प्रबळ होते. सुमती कुमती होऊन जाते. संपत्ती, सत्तेची लालसा त्याला पथभ्रष्ट करते. यामुळे द्वेष, मद, मत्सर प्रबळ होतात. यामधूनच लोभ, क्रोध अनावर होतात. वासना, विकार, विकृतीच्या विळख्यात स्वत:समवेत अनेकांना अडकवतो. ‘काम’ इतका बळावतो की माणूस माणुसकी विसरून जातो. श्वापदाप्रमाणे वर्तन करतो. प्रगती, उन्नती दूर राहते. अधोगतीचा वेग वाढत जातो. अशा ढाळसलेल्या, कोसळलेल्या मानवाला पुनश्च सुयोग्य मार्गावर आणण्यासाठी ‘संत’ ‘विभूती’ अवतार घेतात. सद्बुद्धी प्राप्त होऊन सन्मार्गावर राहण्यासाठी भगवंताच्या भक्तीचा सुंदर मार्ग दाखवतात. स्वआचरणातून समाजाला घडवण्यासाठी सदैव झटतात. सुंदर, सात्विक विचारांचा सुगंध दरवळण्यासाठी कुबुद्धीला भगवंताकडे वळवतात. मग बुद्धीमध्ये अनुकूल बदल घडून येतो. प्रत्येक माणसानं भगवंतानं दिलेल्या बुद्धीचा सुयोग्य पद्धतीनं उपयोग करण्याची आवश्यकता आहे. आपल्या बुद्धीला सदैव सतेज, सात्विक ठेवण्यासाठी भगवंताच्या नित्य स्मरणाची सवय लावणं गरजेचं आहे. भगवंताच्या प्रति ‘कृतज्ञ भाव’ ठेवला की बुद्धीमध्ये बिघाड होण्याचं भय उरत नाही.संत सर्वश्रेष्ठ असून देखील ते भगवंताकडे ‘सद्बुद्धीचं दान’ मागतात. मग आपल्यासारख्या सामान्य माणसांनी कळवळून भगवंताला ‘सुयोग्य बुद्धीचं मागणं’ नको का मागायला?

टॅग्स :newsबातम्या