शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

मुलांसाठी विमा : नो, नाय, नेव्हर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 00:15 IST

माझा पाच वर्षांचा मुलगा आहे, त्याच्यासाठी लाइफ इन्श्युरन्स पॉलिसी? घेऊ का? - असा प्रश्न एका बाईंनी मला विचारला. मुलगा ...

माझा पाच वर्षांचा मुलगा आहे, त्याच्यासाठी लाइफ इन्श्युरन्स पॉलिसी? घेऊ का? - असा प्रश्न एका बाईंनी मला विचारला. मुलगा पाच वर्षांचा, त्याच्यासाठी कशाला हवी पॉलिसी? माझं स्पष्ट उत्तर, नो- नाय -नेव्हर-नाही!  

कशाला हवा लहान मुलांचा इन्श्युरन्स? केवळ कुणीतरी तुम्हाला फायदे सांगतं, शंभरदा फोन करतं, तुम्हाला वाटतं आपल्या मुलांना सिक्युरिटी आहे म्हणून तुम्ही घेता पॉलिसी, हप्ते भरता; पण त्याची गरज आहे का? तर याचं एका शब्दात उत्तर आहे की, नाही. आता तुम्ही विचाराल का नको?- त्याची ही काही सोपी कारणं..

१. मुलं कमवत नाहीत : जीवनविम्याचा हेतू काय की जो घरात रोजीरोटी आणतो, त्याला काही झालं तर त्याच्या मागे कुटुंबाला आधार म्हणून काही रक्कम पर्यायी यावी. सुरक्षित रहावी. छोट्या मुलांचा सर्व खर्च पालक करतात, त्यांच्या गरजा पुरवतात, ते स्वत: काही कमवत नाहीत. त्यांच्यावर कुणी आर्थिकदृष्ट्या अवलंबून नाही. तर मग उगीच कशाला हवा विमा?

२. विमा एजंट खूप कॉल्स करतात : करू देत. ते त्यांची गोष्ट विकतात. त्यात तुमचा फायदा काहीच नाही. ते तुमच्या असुरक्षिततेला हाका मारतात. तुम्ही असुरक्षित वाटून घ्यायचं काय कारण? वाटतच असेल तर तुमचा स्वत:चा मोठ्या रकमेचा विमा उतरवा. मुलाच्या विम्यापोटी पैसे खर्च करण्याचं काय कारण? जेवढे कॉल्स जास्त, तेवढी आपल्याला गरज नाही असं समजा.. 

३. युलीप : हे गुंतवणुकीचे गरीब माध्यम चाइल्ड पॉलिसीच्या नावाखाली ते विकलं जातं, पण त्याचा गुंतवणूक म्हणून काही फार फायदा नाही. उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणून अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, मग चाइल्ड पॉलिसी कशाला?

४. वाईट गिफ्ट : मूल तीन-चार वर्षांचं असताना तुम्ही विमा घेतला, मूल २२ वर्षांचे होईतो हप्ते भरले, तरी त्याचा परतावा कमी मिळतो. त्यापेक्षा त्या रकमेचे योग्य शेअर्स, एसआयपी केल्या तर अधिक लाभ होऊ शकेल. अगदी काहीच नाही तर मुलाच्या नावाने पीपीएफमध्ये पैसे ठेवले तरी त्यापेक्षा जास्त व्याज परतावा मिळू शकेल.

५. मग कुणी घ्यावा मुलांसाठी विमा? जे बालकलाकार असतात, लहान वयात जी मुलं कमावतात, खेळाडू म्हणून चमकू लागतात, त्यांच्या पालकांनी जरूर घ्यावा विमा. मात्र तसं तुमचं मूल आहे का हे पहा ! विम्यात पैसे केवळ मनातली असुरक्षितता म्हणून गुंतवू नयेत.

टॅग्स :businessव्यवसाय