शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘खांदेरी’मुळे वाढणार सामरिक ताकद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 04:27 IST

नौदलाच्या ताफ्यात रुजू होत असलेल्या खांदेरी पाणबुडीमुळे भारतीय नौदलाच्या शक्तीमध्ये मोठी वाढ होणार आहे.

- कॅप्टन डी.के. शर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी, नौदल (निवृत्त)नौदलाच्या ताफ्यात रुजू होत असलेल्या खांदेरी पाणबुडीमुळे भारतीय नौदलाच्या शक्तीमध्ये मोठी वाढ होणार आहे. खांदेरी पाणबुडी पूर्वी रशियाकडून भारताकडे आली होती. सन १९६७ मध्ये कलवरी, त्यानंतर ६८ मध्ये ६९ मध्ये व ७० मध्ये अशा प्रकारे सलग चार पाणबुड्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात रुजू करण्यात आल्या होत्या. खांदेरी भारतीय नौदलात ६ डिसेंबर १९६८ ला रुजू झाली होती. नौदलात रुजू झालेली ती दुसरी पाणबुडी होती. दिवंगत कमांडर एम.एन. वासुदेवा यांच्या नेतृत्वात सोव्हिएत बंदर रिगा येथे त्याचे हस्तांतरण झाले होते. नौदलामध्ये खांदेरी पाणबुडीने तब्बल २१ वर्षे सेवा बजावली होती. भारतीय नौदलाची ३० वर्षांची पाणबुडी निर्मितीची योजना आहे. त्या अंतर्गत प्रोजेक्ट ७५ मध्ये ६ पाणबुड्या बनवण्यात येत आहेत. मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये या पाणबुड्यांची निर्मिती केली जात आहे.

१७ डिसेंबर २०१७ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलवरी नौदलाच्या ताफ्यात रुजू केली होती. नऊ महिन्यांनंतर खांदेरी ही पाणबुडी नौदलाच्या सेवेत येण्याची गरज होती. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे विलंब झाल्याने २८ सप्टेंबर २०१९ ला ही पाणबुडी सेवेत रुजू होत आहे. ही पाणबुडी अगदी तयार स्थितीत असून कोणत्याही क्षणी कोणत्याही मोहिमेवर जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. ही अत्यंत सायलेंट प्रकारची पाणबुडी आहे. याची बांधणी अत्याधुनिक आहे. माझगाव डॉक शिपमध्ये फ्रान्सच्या नौदल गटासोबत याची निर्मिती केली गेली. देशाच्या नौदलात गरजेपेक्षा पाणबुड्या कमी होत्या. सध्या १४ पाणबुड्या कार्यरत आहेत. कलवरी, खांदेरी या पाणबुड्यांची ताफ्यात भर पडली आहे.
पाण्याखालील युद्धामध्ये पाणबुडी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. सागरी किनाऱ्याचे मोठे संरक्षण याद्वारे केले जाते. कोणतेही नौदल, कोणत्याही बंदरावर हल्ला करू शकत नाही, पाणबुडी पाण्याखाली नेमक्या कोणत्या भागात आहे ही माहिती नसल्याने विरोधक शत्रूंची अडचण होते व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ती चांगली बाब होते. देशाचे नौदल अत्यंत सशक्त आहे. इंडियन ओशिएन विभागात सर्वात ताकदवान भारतीय नौदल आहे. नौदलाच्या पाणबुडी क्षमतेत आणखी वाढ केली जात आहे. अशा प्रकारच्या आणखी एकूण ६ पाणबुड्या ताफ्यात येणार आहेत. ही पाणबुडी जुन्या पाणबुडीच्या तुलनेत अत्याधुनिक आहे. यात वापरण्यात आलेल्या सामग्रीचा दर्जा अत्युत्तम आहे. ही पाणबुडी सेवेत येण्यासाठी काही काळ विलंब झाला. मात्र याच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ही पाणबुडी थेट संरक्षणासाठी तैनात करता येईल.
सुरुवातीला ही पाणबुडी मुंबईत तैनात करण्यात येणार आहे. त्यानंतर नौदल त्याला कारवार किंवा अन्यत्र पाठवू शकेल. मुंबईत तैनात असतानादेखील पूर्ण अरबी समुद्रातील सुरक्षेसाठी या पाणबुडीवर अवलंबून राहता येणे शक्य होणार आहे. एकदा पाण्यात गेल्यानंतर एक महिनाभर ही पाणबुडी पाण्यात राहून आपले काम करू शकेल. या पाणबुडीवर सुमारे ५० जणांचा ताफा कार्यरत राहू शकतो. या पाणबुडीत कार्यरत असलेल्या जवान, अधिकाऱ्यांचा शिधा संपल्यावर त्यांना परत मागे किनाऱ्याकडे यावे लागते. अन्यथा आणखी काही काळदेखील ही पाणबुडी समुद्रात पाण्याखाली राहून सक्षमपणे काम करू शकते.
या प्रकारच्या पाणबुड्यांमध्ये ऊर्जेसाठी बॅटऱ्या लावलेल्या असतात. सुमारे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांनंतर या पाणबुडीतून पाइप बाहेर काढून त्याद्वारे ऑक्सिजन आत घेऊन बॅटऱ्या चार्ज केल्या जातात. शक्यतो ही कार्यवाही रात्रीच्या वेळी गडद अंधारात केली जाते. कोणालाही पाणबुडी नेमकी कुठे आहे हे कळू नये यासाठी ही काळजी घेतली जाते. तर दिवसाउजेडी ही पाणबुडी खोल पाण्यामध्ये असते. २०० ते ३०० मीटर पाण्याखाली जाऊन कार्यरत राहण्याची क्षमता या पाणबुडीची आहे. अत्यंत सक्षम अशा या पाणबुडीचे चांगले डिझाइन तयार करण्यात आले आहे.
खांदेरीला देदीप्यमान इतिहासाचा वारसा असल्याने खांदेरीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे व खांदेरीकडून ही अपेक्षा नक्कीच पूर्ण होईल यात कोणतीही शंका नाही. १९७१ च्या युद्धामध्ये खांदेरीने पूर्व किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी मोठी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. रशियन बनावटीच्या या फॉक्सट्रोट गटातील या पाणबुडीने देशाच्या सेवेत सुमारे २१ वर्षे उत्तम कामगिरी केली. नौदलाच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर विशाखापट्टणम येथील आयएनएस वीरबाहूच्या संचालन मैदानात पुढील पिढ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या स्मृती जतन करण्यात आल्या.
नवीन खांदेरी माझगाव डॉक येथील ११८७६ यार्डमध्ये तयार करण्यात आली आहे. ७ एप्रिल २००९ रोजी तिच्या निर्मितीस प्रारंभ झाला होता. पाच भागांत ही निर्मितीची प्रक्रिया करण्यात आली व हे पाच भाग नोव्हेंबर २०१६ मध्ये एकत्र करण्यात आले व तिला खांदेरीचे आजचे रूप देण्यात आले. ६७.५ मीटर लांब व १२.३ मीेटर उंच अशा बलाढ्य आकारमानाची ही खांदेरी पुढील काही वर्षे देशाच्या सेवेत कार्यरत राहून विरोधकांना धडकी भरवेल यात शंका नाही.

टॅग्स :indian navyभारतीय नौदल