शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

भारताचा वाढता दबदबा, शिखर परिषदेत मोदींचा मोठा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 09:56 IST

अफगाणिस्तानला मदत म्हणून अन्नधान्य, औषधांचा पुरवठा करण्यासाठीही भारताला आपल्या भूमीचा वापर करू देण्यास पाकिस्तान नकार देतो

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घातला. संघटनेच्या सर्व सदस्य देशांनी परस्परांना आपल्या हद्दीतून मुक्त वाहतुकीची मुभा द्यावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. भारताचा प्रस्ताव मान्य झाल्यास भारताची आर्थिक प्रगती, तसेच इंधन सुरक्षेसाठी ते खूप लाभदायक ठरेल. नकाशात भारताची सीमा अफगाणिस्तानसोबत भिडलेली दिसते; मात्र फाळणीनंतर लगेच पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य घुसवून, पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टीस्तानचा भूभाग बळकावला. त्यामुळे भारताची अफगाणिस्तानसोबतची भौगोलिक संलग्नता संपुष्टात आली. परिणामी प्राचीन काळापासून मध्य आशिया, मध्यपूर्व आशिया आणि पुढे पार रशिया, युरोपपर्यंत जमीनमार्गे सुरू असलेला भारताचा संपर्कच तुटला. त्यामुळे त्या भूभागांमधील अनेक देशांसोबतची भारताची आयात-निर्यात महागली. कझाकीस्तान, तुर्कमेनीस्तान, ताजकीस्तान, किर्गिझस्तान, इराण आदी देशांमधून खनिज तेल व नैसर्गिक वायू खुश्कीच्या मार्गाने कमी खर्चात भारतापर्यंत आणणे शक्य आहे; पण पाकिस्तान हा त्यामधील मोठा अडथळा आहे.

अफगाणिस्तानला मदत म्हणून अन्नधान्य, औषधांचा पुरवठा करण्यासाठीही भारताला आपल्या भूमीचा वापर करू देण्यास पाकिस्तान नकार देतो. नाही म्हणायला तुर्कमेनीस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत असा नैसर्गिक वायूवाहिनीचा एक प्रकल्प सुरू आहे. मात्र, तोदेखील बऱ्याच काळापासून रखडला आहे. परिणामी इंधनासाठी प्रामुख्याने आयातीवर अवलंबून असलेल्या भारताचा इंधनावरील खर्च वाढला आहे. त्याचा थेट परिणाम  भारताच्या आर्थिक विकासावर होत आहे. पंतप्रधान मोदींचा प्रस्ताव मान्य झाल्यास एससीओ सदस्य देशांदरम्यानचा व्यापार वाढीस लागून सर्वच देशांचे भले होऊ शकते; पण एससीओच्या संस्थापक देशांपैकी एक असलेला चीन आणि चीनच्या कच्छपी लागलेला पाकिस्तान सहजासहजी तो प्रस्ताव मान्य होऊ देतील, असे वाटत नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तर एससीओ शिखर परिषदेतच त्याची चुणूक दाखवलीही! चीन आणि पाकिस्तान हे भारताचे दोन्ही शेजारी भारताकडे पूर्वापार शत्रूत्वाच्या भावनेनेच बघत आले आहेत. भारताला लाभ होईल, अशा कोणत्याही गोष्टीत खोडा घालायचा, हेच त्यांचे धोरण राहिले आहे. त्यातच भारत तीन बाजूंनी समुद्राने वेढला असल्याने, चीन किंवा पाकिस्तानला भारताच्या भूमीचा वापर करून इतर देशांशी व्यापार करण्याची फारशी संधी नाही. या पार्श्वभूमीवर ते दोन्ही देश पंतप्रधान मोदींच्या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देतात, हे बघावे लागेल. या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग २०१९ नंतर प्रथमच आमनेसामने आले होते. त्यामुळे उभय नेत्यांदरम्यानच्या संवादाबाबत बरीच उत्सुकता होती; पण किमान प्रसारमाध्यमांसमोर तरी ते आमनेसामने आलेच नाहीत. मोदींनी जिनपिंग यांच्यासोबत साधे हस्तांदोलन करणेही टाळले. गत अनेक दिवसांपासून चीनने भारताला सीमाप्रश्नी दिलेला उपद्रव आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी जिनपिंग यांच्याशी संवाद टाळून चीनला संदेश दिला, असे म्हणावे लागेल.

मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचीही भेट घेतली नाही. अर्थात, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद पुरस्कृत करणे थांबवत नाही, तोपर्यंत त्या देशासोबत चर्चा नाहीच, या भारताच्या भूमिकेशी ते सुसंगतच होते. भारताचा जुना मित्र असलेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची मात्र पंतप्रधान मोदींनी आवर्जून भेट घेतली. सध्याचे युग युद्धाचे नव्हे, असे मोदींनी पुतीन यांना स्पष्टपणे सांगितले. रशिया-युक्रेन वादात भारताने रशियाची बाजू घेतली आहे, असा पाश्चात्य देशांचा आक्षेप होता. रशिया-युक्रेन युद्धास तोंड फुटल्यानंतर प्रथमच समोरासमोर झालेल्या चर्चेत मोदींनी पुतीन यांना अप्रत्यक्षरीत्या युद्ध थांबविण्यास सांगितल्यामुळे पाश्चात्य देशांना निश्चितच काहीसा दिलासा मिळाला असेल. एकंदरीत, आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताचा वाढता दबदबा एससीओ शिखर परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसला. मोदींनी जिनपिंग यांच्याशी संवाद टाळल्यानंतरही पुढील वर्षी एससीओ शिखर परिषदेचे यजमानत्व करण्यासाठी भारताला संपूर्ण सहकार्य करू, या जिनपिंग यांच्या वक्तव्यातून तेच अधोरेखित होते!

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारत