शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

कोरोना विषाणूचा धोका भारताला सर्वात मोठा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 12:38 IST

भारत देश ज्वालामुखीच्या तोंडावर बसला आहे, या त्यांच्या इशाऱ्यामुळे तर आपणा सर्वांना या रोगाबाबत अत्यंत काटेकोर राहण्याची वेळ आली आहे. त्यांचे म्हणणे आहे, भारतात या रोगाचा सर्वात मोठा उद्रेक होऊ शकतो.

- राजू नायककोरोना विषाणू हा अत्यंत घातक रोग असून तो झपाट्याने पसरेल. त्यामुळे त्याच्या फैलावाबाबत निष्काळजी राहून चालणार नाही. त्याची लागण लोकसंख्येवर होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो, त्यामुळे निवडणुका व इतर प्रकारचे मेळावे, लोकांचा सहभाग असलेले कार्यक्रम पुढचे तीन महिने संपूर्णत: टाळले पाहिजेत, असा इशारा आता जगातील एकूण एक तज्ज्ञ देऊ लागले आहेत. जगविख्यात आरोग्यतज्ज्ञ अमेरिकास्थित रामानन लक्ष्मीनारायण यांची एक मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली असून भारत देश ज्वालामुखीच्या तोंडावर बसला आहे, या त्यांच्या इशाऱ्यामुळे तर आपणा सर्वांना या रोगाबाबत अत्यंत काटेकोर राहण्याची वेळ आली आहे. त्यांचे म्हणणे आहे, भारतात या रोगाचा सर्वात मोठा उद्रेक होऊ शकतो.अमेरिकेचा हवाला देऊन डॉक्टरांनी म्हटले आहे की तेथील २० ते ६० टक्के लोकांना या रोगाची लागण झालेली असू शकते. तोच निकष लावला तर भारतातील ६० टक्के लोकांना या रोगाने ग्रासले असू शकते. त्यांची ही आकडेवारी पाहिली तर आमचा थरकाप उडू शकतो. परंतु ही गोष्ट अगदीच नाकारली जाऊही शकत नाही. अजून तरी भारत सरकार किंवा आमच्या राज्य सरकारांनी इतक्या गांभीर्याने या रोगाकडे किंवा परिस्थितीकडे पाहिलेले नाही. डॉ. लक्ष्मीनारायण म्हणतात की ७०० ते ८०० दशलक्ष लोकांना या रोगाची लागण झाली असू शकते. परंतु त्यातील बहुसंख्य लोकांना रोगाची सूक्ष्म लागण झालेली असू शकते, त्याहूनही कमी लोकसंख्या गंभीर आजारी असू शकते व आणखी कमी लोकसंख्या प्राण गमावू शकते.

डॉ. लक्ष्मीनारायण यांनी भारतात केवळ १३० लोकांना या रोगाची लागण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. ते म्हणाले, युरोपातील ब्रिटनसारखे देश- त्यांनी तेथील आकडेवारी ही संपूर्ण सत्य नसल्याचे मान्य केले आहे. भारतीय वैद्यकीय संस्थेचेही म्हणणे आहे की भारतही या रोगाच्या दुस-या टप्प्यावरच उभा आहे आणि सा-या समाजात त्याचा फैलाव होण्याच्या पातळीवर गेलेला नाही. डॉ. लक्ष्मीनारायण यांचा दावा आहे की भारत कदाचित तिस-या टप्प्यावर दोन ते तीन आठवड्यांपूर्वीच पोहोचलेला असू शकतो. भारतातील परिस्थितीचे वैद्यकीय नीतीचा वापर करून अवलोकन करूनच ते या निष्कर्षावर येऊन पोचले आहेत. ज्या प्रमाणात केंद्र सरकारने शाळा, कॉलेज व थिएटर्स, सिनेमा बंद केले आहेत, त्यावरून हा अंदाज केला जाऊ शकतो.भारताने घेतलेल्या उपायांबाबत डॉ. लक्ष्मीनारायण यांनी समाधान व्यक्त केले असले तरी आपल्या देशाने या रोगाशी मुकाबला करण्यासाठी बरीच वैद्यकीय सामग्री आयात करायला हवी, असे ते म्हणाले. म्हणजे भारताची तयारी अजून अपुरीच आहे! आपण जरी या विषाणूबद्दल सरकारी पातळीवर उपाय योजत असलो तरी अजून आपली लोकसंख्या त्याबाबत किती गंभीर आहे? अजून उत्सव चालू आहेत. लोक आपापसांत मिसळत आहेत. बाजारात गर्दी आहे. साहित्य खरेदी करून त्याचा साठा करण्यासाठी अलोट गर्दी उसळत आहे. गोव्यात जि.पं. निवडणुका होणार होत्या, त्यासाठी भाजपच्या जोरदार सभा चालू होत्या. किंबहुना शुक्रवारी निवडणूक रद्द झाली, त्या दिवशीही ग्रामीण भागात लोकांची गर्दी जमवून भाषणे चालू होती! लोकांना मिसळू न देणे हे खरे म्हणजे सरकारांचे काम होते. त्यात सरकारच कमी पडले!

लक्षात घेतले पाहिजे, हा विषाणू गंभीर आहे. भारत जर या रोगाच्या चौथ्या टप्प्यात गेला व साºया समाजाला या विषाणूने विळख्यात घेतले तर संपूर्ण देश संकटात सापडेल व त्याविरुद्ध लढण्याची आपणाकडे साधनसामग्रीही असेल नसेल! तेव्हा आता लोकपातळीवर मोहीम सुरू व्हायला हवी. विलगतेची ही मोहीम प्रत्येक घरामधून, वाड्यावाड्यांतून, विभाग पातळीवरून चालली पाहिजे. केवळ रविवारी नव्हे, लोकांनी आपणहून या संकटाला चार हात दूर ठेवण्याची काळजी स्वत:हून घेतली पाहिजे! डॉ. लक्ष्मीनारायण यांनी भारताबद्दल केलेले भाकीत खोटे ठरविणे हेसुद्धा आपल्याच हाती आहे!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या