शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

पण लक्षात कोण घेतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:00 IST

डॉ. मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कारकिर्दीचे अखेरचे दिवस जेवढ्या आर्थिक व राजकीय गोंधळाचे होते आणि त्यावरचा सरकारचा ताबाच हरवल्यागत झाला होता तेवढीच किंवा त्याहून अधिक वाईट स्थिती या निवडणूकपूर्व वर्षात देश अनुभवत आहे.

मध्यंतरी बडोदा, विजया आणि देना या तीन बँकांचे सरकारने विलीनीकरण करून त्यांची क्षमता व विस्तार वाढविण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण त्यामुळे विस्तारच तेवढा झाला. त्यातली गुंतवणूक तशीच राहिली आणि ग्राहकांची संख्याही त्यामुळे वाढली नाही.रुपयाची किंमत मातीमोल होणे, तेलाच्या किमती आभाळाला भिडणे, निर्यात व आयात यातील तफावत वाढत जाणे, बँकांची बुडालेली कर्जे वसूल न होणे आणि त्यांनी कर्जांच्या पुढील वाटपावर नियंत्रण आणणे यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेने थेट समुद्राचा तळ गाठला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कारकिर्दीचे अखेरचे दिवस जेवढ्या आर्थिक व राजकीय गोंधळाचे होते आणि त्यावरचा सरकारचा ताबाच हरवल्यागत झाला होता तेवढीच किंवा त्याहून अधिक वाईट स्थिती या निवडणूकपूर्व वर्षात देश अनुभवत आहे. तेलाच्या किमतीने आणि आयात-निर्यातीच्या तफावतीने जगाच्या बाजारात रुपयाची किंमत चौदा टक्क्यांनी कमी केली आहे. याच काळात विदेशी गुंतवणूकदारांनी भारताच्या अर्थकारणातून त्यांचा पैसा मोठ्या प्रमाणावर काढून घेतला आहे. आॅक्टोबरच्या अखेरपर्यंत त्यांनी असे ९० हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत आणि जाणकारांच्या मते हा आकडा २००२ नंतरचा सर्वांत मोठा आहे. त्याआधी सप्टेंबरच्या आरंभी सेन्सेक्समधील घसरण व बाजारातील उलथापालथीने स्वदेशी गुंतवणूकदारांनी ८ लक्ष ४७ हजार कोटी गमावले आहेत. नंतरच्या तशाच घडामोडीने अवघ्या पाच मिनिटांत मुंबईच्या शेअर बाजाराने ४ लक्ष कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे जाहीर केले आहे. या घटनांमुळे गुंतवणूकदारांत निराशेचे वातावरण पसरले असून होता होईल तेवढ्या लवकर आपली गुंतवणूक सोडवून घेण्याच्या प्रयत्नात ते आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला सध्या तीन मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. जगाच्या बाजारातील भाववाढ, अमेरिकेने वाढविलेले व्याजाचे दर आणि सगळ्या प्रगत देशांनी अवलंबिलेले स्वदेशीचे संरक्षक धोरण. शक्यतो आयातीवर निर्बंध आणि निर्यातीवर भर द्यायचा आणि स्वदेशाची श्रीमंती वाढवायची हा तो प्रकार असल्याने सर्वच मध्यम व लहान उत्पन्नाचे देश त्यात मोडून निघत आहेत. त्यांना जास्तीची किंमत मोजून कच्चा माल घ्यावा लागतो आणि आपली उत्पादने कमी किमतीत इतरांना विकावी लागतात. मात्र एवढ्यावर देशाच्या अर्थव्यवस्थेतील संकटे संपणारी नाहीत. चुकीची राजकीय धोरणे, अर्थकारणातले पक्षपातीपण, अर्थकारणातील व्यवहारात असणारी मंदगती यांनीही ही संकटे आणखी मोठी केली आहेत. नोटाबंदीच्या गैरप्रकारातून देश अजून सावरला नाही. देशातले ३५ टक्क्यांहून अधिक उद्योग एकतर बंद आहेत किंवा निम्म्या उत्पन्नावर चालणारे आहेत. रोजगाराची निर्मिती नुसती थांबलीच नाही तर आहे ते रोजगारही कमी केले जात आहेत. याच काळात देशातील साºया मोठ्या बँका त्यांची विश्वसनीयता गमावून बसल्या आहेत. स्टेट बँक करवसुलीच्या खड्ड्यात खोलवर रुतली आहे. याच काळात आयसीआयसीआय सारख्या ‘पहिल्या क्रमांका’च्या म्हणून मिरविणाºया बँकांचे अधिकारी निलंबित झाले. त्यात पैशाचे घोटाळे व पक्षपात झाल्याचे उघडकीला आले. बँकांची मोठाली कर्जे घेऊन व देशाला वाकुल्या दाखवून एकेकाळी बडे म्हणून ख्यातनाम असलेले धनवंत सरकारच्याच मदतीने देश सोडून पळाले. विजय मल्ल्याने आपली विमान कंपनी बुडविली व चोरट्या मार्गाने इंग्लंड गाठले. त्याआधी ३६ हजार कोटींनी देशाला बुडविणारा नीरव मोदी जगात कुठेतरी दडून बसला तर ललित मोदी हाही हजारो कोटींनी देशाला गंडवून बेपत्ता झाला. गंमत ही की या बुडविणाºया माणसांचे लागेबांधे सरकारात वरिष्ठ जागी असणाºया लोकांशीच जुळले आहेत हेही उघड झाले. सरकार, बँका आणि लुटारू यांचे हे संगनमत साºया जनतेला बुडविणारे, त्यांना भाववाढीच्या ओझ्याखाली दडपणारे आणि बाजारातल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव अस्मानाला भिडविणारे ठरले आहेत. दुर्दैव हे की या गळतीला आळा घालायला कोणताही समर्थ नेता पुढे येत नाही. पंतप्रधान त्याविषयी बोलत नाहीत. अर्थमंत्री बचावाची भाषा बोलतात आणि इतर मंत्र्यांना या साºयांविषयी काही वाटत असेल यावर जनतेचाच विश्वास आता राहिला नाही. जाणकार सांगतात, विरोधी पक्ष बोलतात, गरीब माणसे रस्त्यावर येतात. पण त्यांचे लक्षात घेतो कोण?

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाCrude Oilखनिज तेलDemonetisationनिश्चलनीकरणBanking Sectorबँकिंग क्षेत्रNarendra Modiनरेंद्र मोदीVijay Mallyaविजय मल्ल्याNirav Modiनीरव मोदीfraudधोकेबाजी