शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अर्थकारणाची घसरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 02:34 IST

देशाचे औद्योगिक उत्पादन दोन टक्क्यांच्या खाली आले, तर शेतीच्या उत्पादनात जराही वाढ झाली नाही. देशाचे व नेत्यांचे लक्ष लोकप्रियता व सत्ताप्राप्तीवर केंद्रित असल्याने त्यातील कुणी या विषयाची चर्चा करीत नाहीत.

देशात जातीय व धार्मिक उन्माद जसजसा वाढत आहे, तसतशी अर्थव्यवस्था खचत आहे. नेते बोलत नाहीत, मंत्री गप्प आहेत, माध्यमे गळाठली आहेत, विरोधक दुबळे आहेत आणि विचारवंतांना सत्य सांगण्याचे धाडस होत नाही. देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर आली आहे. बेकारीचा दर सहा टक्क्यांच्या पुढे, म्हणजे ७ कोटी ६० लाखांवर गेला आहे. गेल्या एकाच वर्षात, २०१८-१९ मध्ये १ कोटी १० लाख लोकांनी त्यांचा रोजगार गमावला आहे. बीएसएनएल या सरकारी कंपनीजवळ आपल्या दीड लक्ष लोकांना वेतन द्यायला पैसे नाहीत. सरकारी बँकांचे थकीत कर्ज १२ लक्ष कोटींच्या पुढे गेले आहे.

देशात वाहनांचा उद्योग मोठा आहे आणि त्यात दरवर्षी नवनव्या वाहनांची भर पडत आहे. मात्र, सध्या दुचाकी वाहनांची विक्री १७ टक्क्यांनी, तर चारचाकींची २९ टक्क्यांनी कमी झाली आहे. या क्षेत्रातील पाच लक्ष लोकांना कामावरून कमी करण्यातही आले आहे. देशातील न विकलेल्या घरांची व फ्लॅट्सची संख्या साडेचार लाखांवर गेली आहे. ओएनजीसी या बड्या कंपनीचा राखीव निधी ३६ हजार कोटींनी कमी झाला आहे. यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच विदेशी कंपन्यांनी त्यांची देशातील दीड लक्ष कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे. देशातील ५०० बड्या कंपन्यांपैकी साडेतीनशेवर कंपन्या तोट्यात चालणाऱ्या आहेत आणि त्यातील काहींनी दिवाळखोरीसाठी सरकारकडे अर्ज दाखल केले आहेत. याचा परिणाम बाजारावर व बाजारभावांवर होत असून तो बसत चालला, तर त्याचे भाव मात्र उंचावर जायला लागले आहेत.

देशाचे औद्योगिक उत्पादन दोन टक्क्यांच्या खाली आले, तर शेतीच्या उत्पादनात जराही वाढ झाली नाही. देशाचे व नेत्यांचे लक्ष लोकप्रियता व सत्ताप्राप्तीवर केंद्रित असल्याने, त्यातील कुणी या विषयाची चर्चा करीत नाहीत. काश्मीर, तीन तलाक, मंदिर, मशिद, गंगा शुद्धी, मेट्रो आणि बुलेट ट्रेन या अनुत्पादक पण लोकांचे लक्ष खºया प्रश्नांकडून अन्यत्र वेधून घेणाºया गोष्टींकडे ते अधिक ध्यान देत आहेत. त्यांच्या पाठीशी असलेल्या संघटनाही अशाच न-प्रश्नांची चर्चा करण्यात गुंतल्या आहेत. कोणत्याही सत्तेला सत्य मानवत नाही. जे ते सांगतात, त्यांना लगेच देशविरोधी व प्रसंगी पाकधार्जिणे ठरवून मोकळे होण्याचा मार्ग त्यांचा सोईचा व पसंत पडणारा आहे. त्यातून त्यांच्या तशा विषारी प्रचाराला टाळ्यांनी साथ देणारे गणंगही समाजात फार आहेत.

शेजारच्या घरातील मुले बेकार आहेत, याहूनही त्यांना सत्तेच्या मजबुतीची चिंता अधिक आहे. त्यातल्या अनेकांना तर आपल्याही बेकारीची जाणीव नाही. अर्थकारणाच्या घसरगुंडीची चिंता धनवंतांना नाही. आताशा मध्यमवर्ग व नवश्रीमंतांचे वर्गही या घसरगुंडीमुळे व तिने आणलेल्या भाववाढीमुळे चिंतित होताना दिसत नाहीत. त्यांच्या गरजा भागविण्याएवढा पैसा त्यांना मिळतो. त्यातले जे सरकार पक्षाला अनुकूल आहे, त्यांना बोलताही येत नाही व तसे बोलणे हाच त्यांना धर्मद्रोह वाटतो. महागाईची खरी झळ बसते ती गरिबांना, कमी उत्पन्न असणाऱ्यांना आणि गृहिणींना, पण त्यांना वाचा नाही आणि असली, तरी ती प्रकट करायला लागणारी व्यासपीठे वा माध्यमे नाहीत. चरफडत व कुढत दिवस काढणे, प्रसंगी त्याचा वैताग घरच्यांवर काढणे एवढेच त्यांना जमते. आता कामगारांच्या लढाऊ संघटनाही राहिल्या नाहीत. एके काळी त्या मोर्चे काढत, मागण्यांची निवेदने देत व महागाईविरुद्ध बोलत.

आता त्या संघटना राजकारणात अधिक रमतात आणि त्यांचे पुढारी फोटो मिरविण्यात दंग दिसतात. परिणामी, अर्थकारणाला आलेल्या ओहोटीविषयी फारसे कुणी बोलताना वा लिहिताना दिसत नाहीत. प्रगत देशात अर्थव्यवस्था एक टक्क्याने खाली गेली, तरी माध्यमे ओरडून उठतात. राजकीय पक्ष त्यांची व्यासपीठे गाजवितात. भारत हा देशच आर्थिक व औद्योगिक विचारांना प्राधान्य देणारा नाही. धार्मिक, जातीय व पक्षीय स्वार्थात त्याला अधिक रस आहे. गावात काय घडले, यापेक्षा पाकिस्तानात काय होते, याची चिंता त्याला अधिक आहे. ही स्थिती चांगली नाही. अर्थकारण बिघडायला वेळ लागत नाही. मात्र, ते उचलून उभे करायला फार काळ जावा लागतो.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था