शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अर्थकारणाची घसरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 02:34 IST

देशाचे औद्योगिक उत्पादन दोन टक्क्यांच्या खाली आले, तर शेतीच्या उत्पादनात जराही वाढ झाली नाही. देशाचे व नेत्यांचे लक्ष लोकप्रियता व सत्ताप्राप्तीवर केंद्रित असल्याने त्यातील कुणी या विषयाची चर्चा करीत नाहीत.

देशात जातीय व धार्मिक उन्माद जसजसा वाढत आहे, तसतशी अर्थव्यवस्था खचत आहे. नेते बोलत नाहीत, मंत्री गप्प आहेत, माध्यमे गळाठली आहेत, विरोधक दुबळे आहेत आणि विचारवंतांना सत्य सांगण्याचे धाडस होत नाही. देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर आली आहे. बेकारीचा दर सहा टक्क्यांच्या पुढे, म्हणजे ७ कोटी ६० लाखांवर गेला आहे. गेल्या एकाच वर्षात, २०१८-१९ मध्ये १ कोटी १० लाख लोकांनी त्यांचा रोजगार गमावला आहे. बीएसएनएल या सरकारी कंपनीजवळ आपल्या दीड लक्ष लोकांना वेतन द्यायला पैसे नाहीत. सरकारी बँकांचे थकीत कर्ज १२ लक्ष कोटींच्या पुढे गेले आहे.

देशात वाहनांचा उद्योग मोठा आहे आणि त्यात दरवर्षी नवनव्या वाहनांची भर पडत आहे. मात्र, सध्या दुचाकी वाहनांची विक्री १७ टक्क्यांनी, तर चारचाकींची २९ टक्क्यांनी कमी झाली आहे. या क्षेत्रातील पाच लक्ष लोकांना कामावरून कमी करण्यातही आले आहे. देशातील न विकलेल्या घरांची व फ्लॅट्सची संख्या साडेचार लाखांवर गेली आहे. ओएनजीसी या बड्या कंपनीचा राखीव निधी ३६ हजार कोटींनी कमी झाला आहे. यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच विदेशी कंपन्यांनी त्यांची देशातील दीड लक्ष कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे. देशातील ५०० बड्या कंपन्यांपैकी साडेतीनशेवर कंपन्या तोट्यात चालणाऱ्या आहेत आणि त्यातील काहींनी दिवाळखोरीसाठी सरकारकडे अर्ज दाखल केले आहेत. याचा परिणाम बाजारावर व बाजारभावांवर होत असून तो बसत चालला, तर त्याचे भाव मात्र उंचावर जायला लागले आहेत.

देशाचे औद्योगिक उत्पादन दोन टक्क्यांच्या खाली आले, तर शेतीच्या उत्पादनात जराही वाढ झाली नाही. देशाचे व नेत्यांचे लक्ष लोकप्रियता व सत्ताप्राप्तीवर केंद्रित असल्याने, त्यातील कुणी या विषयाची चर्चा करीत नाहीत. काश्मीर, तीन तलाक, मंदिर, मशिद, गंगा शुद्धी, मेट्रो आणि बुलेट ट्रेन या अनुत्पादक पण लोकांचे लक्ष खºया प्रश्नांकडून अन्यत्र वेधून घेणाºया गोष्टींकडे ते अधिक ध्यान देत आहेत. त्यांच्या पाठीशी असलेल्या संघटनाही अशाच न-प्रश्नांची चर्चा करण्यात गुंतल्या आहेत. कोणत्याही सत्तेला सत्य मानवत नाही. जे ते सांगतात, त्यांना लगेच देशविरोधी व प्रसंगी पाकधार्जिणे ठरवून मोकळे होण्याचा मार्ग त्यांचा सोईचा व पसंत पडणारा आहे. त्यातून त्यांच्या तशा विषारी प्रचाराला टाळ्यांनी साथ देणारे गणंगही समाजात फार आहेत.

शेजारच्या घरातील मुले बेकार आहेत, याहूनही त्यांना सत्तेच्या मजबुतीची चिंता अधिक आहे. त्यातल्या अनेकांना तर आपल्याही बेकारीची जाणीव नाही. अर्थकारणाच्या घसरगुंडीची चिंता धनवंतांना नाही. आताशा मध्यमवर्ग व नवश्रीमंतांचे वर्गही या घसरगुंडीमुळे व तिने आणलेल्या भाववाढीमुळे चिंतित होताना दिसत नाहीत. त्यांच्या गरजा भागविण्याएवढा पैसा त्यांना मिळतो. त्यातले जे सरकार पक्षाला अनुकूल आहे, त्यांना बोलताही येत नाही व तसे बोलणे हाच त्यांना धर्मद्रोह वाटतो. महागाईची खरी झळ बसते ती गरिबांना, कमी उत्पन्न असणाऱ्यांना आणि गृहिणींना, पण त्यांना वाचा नाही आणि असली, तरी ती प्रकट करायला लागणारी व्यासपीठे वा माध्यमे नाहीत. चरफडत व कुढत दिवस काढणे, प्रसंगी त्याचा वैताग घरच्यांवर काढणे एवढेच त्यांना जमते. आता कामगारांच्या लढाऊ संघटनाही राहिल्या नाहीत. एके काळी त्या मोर्चे काढत, मागण्यांची निवेदने देत व महागाईविरुद्ध बोलत.

आता त्या संघटना राजकारणात अधिक रमतात आणि त्यांचे पुढारी फोटो मिरविण्यात दंग दिसतात. परिणामी, अर्थकारणाला आलेल्या ओहोटीविषयी फारसे कुणी बोलताना वा लिहिताना दिसत नाहीत. प्रगत देशात अर्थव्यवस्था एक टक्क्याने खाली गेली, तरी माध्यमे ओरडून उठतात. राजकीय पक्ष त्यांची व्यासपीठे गाजवितात. भारत हा देशच आर्थिक व औद्योगिक विचारांना प्राधान्य देणारा नाही. धार्मिक, जातीय व पक्षीय स्वार्थात त्याला अधिक रस आहे. गावात काय घडले, यापेक्षा पाकिस्तानात काय होते, याची चिंता त्याला अधिक आहे. ही स्थिती चांगली नाही. अर्थकारण बिघडायला वेळ लागत नाही. मात्र, ते उचलून उभे करायला फार काळ जावा लागतो.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था