शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

अर्थकारणाची घसरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 02:34 IST

देशाचे औद्योगिक उत्पादन दोन टक्क्यांच्या खाली आले, तर शेतीच्या उत्पादनात जराही वाढ झाली नाही. देशाचे व नेत्यांचे लक्ष लोकप्रियता व सत्ताप्राप्तीवर केंद्रित असल्याने त्यातील कुणी या विषयाची चर्चा करीत नाहीत.

देशात जातीय व धार्मिक उन्माद जसजसा वाढत आहे, तसतशी अर्थव्यवस्था खचत आहे. नेते बोलत नाहीत, मंत्री गप्प आहेत, माध्यमे गळाठली आहेत, विरोधक दुबळे आहेत आणि विचारवंतांना सत्य सांगण्याचे धाडस होत नाही. देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर आली आहे. बेकारीचा दर सहा टक्क्यांच्या पुढे, म्हणजे ७ कोटी ६० लाखांवर गेला आहे. गेल्या एकाच वर्षात, २०१८-१९ मध्ये १ कोटी १० लाख लोकांनी त्यांचा रोजगार गमावला आहे. बीएसएनएल या सरकारी कंपनीजवळ आपल्या दीड लक्ष लोकांना वेतन द्यायला पैसे नाहीत. सरकारी बँकांचे थकीत कर्ज १२ लक्ष कोटींच्या पुढे गेले आहे.

देशात वाहनांचा उद्योग मोठा आहे आणि त्यात दरवर्षी नवनव्या वाहनांची भर पडत आहे. मात्र, सध्या दुचाकी वाहनांची विक्री १७ टक्क्यांनी, तर चारचाकींची २९ टक्क्यांनी कमी झाली आहे. या क्षेत्रातील पाच लक्ष लोकांना कामावरून कमी करण्यातही आले आहे. देशातील न विकलेल्या घरांची व फ्लॅट्सची संख्या साडेचार लाखांवर गेली आहे. ओएनजीसी या बड्या कंपनीचा राखीव निधी ३६ हजार कोटींनी कमी झाला आहे. यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच विदेशी कंपन्यांनी त्यांची देशातील दीड लक्ष कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे. देशातील ५०० बड्या कंपन्यांपैकी साडेतीनशेवर कंपन्या तोट्यात चालणाऱ्या आहेत आणि त्यातील काहींनी दिवाळखोरीसाठी सरकारकडे अर्ज दाखल केले आहेत. याचा परिणाम बाजारावर व बाजारभावांवर होत असून तो बसत चालला, तर त्याचे भाव मात्र उंचावर जायला लागले आहेत.

देशाचे औद्योगिक उत्पादन दोन टक्क्यांच्या खाली आले, तर शेतीच्या उत्पादनात जराही वाढ झाली नाही. देशाचे व नेत्यांचे लक्ष लोकप्रियता व सत्ताप्राप्तीवर केंद्रित असल्याने, त्यातील कुणी या विषयाची चर्चा करीत नाहीत. काश्मीर, तीन तलाक, मंदिर, मशिद, गंगा शुद्धी, मेट्रो आणि बुलेट ट्रेन या अनुत्पादक पण लोकांचे लक्ष खºया प्रश्नांकडून अन्यत्र वेधून घेणाºया गोष्टींकडे ते अधिक ध्यान देत आहेत. त्यांच्या पाठीशी असलेल्या संघटनाही अशाच न-प्रश्नांची चर्चा करण्यात गुंतल्या आहेत. कोणत्याही सत्तेला सत्य मानवत नाही. जे ते सांगतात, त्यांना लगेच देशविरोधी व प्रसंगी पाकधार्जिणे ठरवून मोकळे होण्याचा मार्ग त्यांचा सोईचा व पसंत पडणारा आहे. त्यातून त्यांच्या तशा विषारी प्रचाराला टाळ्यांनी साथ देणारे गणंगही समाजात फार आहेत.

शेजारच्या घरातील मुले बेकार आहेत, याहूनही त्यांना सत्तेच्या मजबुतीची चिंता अधिक आहे. त्यातल्या अनेकांना तर आपल्याही बेकारीची जाणीव नाही. अर्थकारणाच्या घसरगुंडीची चिंता धनवंतांना नाही. आताशा मध्यमवर्ग व नवश्रीमंतांचे वर्गही या घसरगुंडीमुळे व तिने आणलेल्या भाववाढीमुळे चिंतित होताना दिसत नाहीत. त्यांच्या गरजा भागविण्याएवढा पैसा त्यांना मिळतो. त्यातले जे सरकार पक्षाला अनुकूल आहे, त्यांना बोलताही येत नाही व तसे बोलणे हाच त्यांना धर्मद्रोह वाटतो. महागाईची खरी झळ बसते ती गरिबांना, कमी उत्पन्न असणाऱ्यांना आणि गृहिणींना, पण त्यांना वाचा नाही आणि असली, तरी ती प्रकट करायला लागणारी व्यासपीठे वा माध्यमे नाहीत. चरफडत व कुढत दिवस काढणे, प्रसंगी त्याचा वैताग घरच्यांवर काढणे एवढेच त्यांना जमते. आता कामगारांच्या लढाऊ संघटनाही राहिल्या नाहीत. एके काळी त्या मोर्चे काढत, मागण्यांची निवेदने देत व महागाईविरुद्ध बोलत.

आता त्या संघटना राजकारणात अधिक रमतात आणि त्यांचे पुढारी फोटो मिरविण्यात दंग दिसतात. परिणामी, अर्थकारणाला आलेल्या ओहोटीविषयी फारसे कुणी बोलताना वा लिहिताना दिसत नाहीत. प्रगत देशात अर्थव्यवस्था एक टक्क्याने खाली गेली, तरी माध्यमे ओरडून उठतात. राजकीय पक्ष त्यांची व्यासपीठे गाजवितात. भारत हा देशच आर्थिक व औद्योगिक विचारांना प्राधान्य देणारा नाही. धार्मिक, जातीय व पक्षीय स्वार्थात त्याला अधिक रस आहे. गावात काय घडले, यापेक्षा पाकिस्तानात काय होते, याची चिंता त्याला अधिक आहे. ही स्थिती चांगली नाही. अर्थकारण बिघडायला वेळ लागत नाही. मात्र, ते उचलून उभे करायला फार काळ जावा लागतो.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था