शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय गायींचेच दूध गुणकारी

By admin | Updated: May 23, 2017 07:26 IST

सध्या सोशल मीडियामध्ये देशी गाई , संकरित गायी व विदेशी गायींवरती खूप चर्चा चालू आहे

सध्या सोशल मीडियामध्ये देशी गाई , संकरित गायी व विदेशी गायींवरती खूप चर्चा चालू आहे. ए-१ दूध आरोग्यास घातक असल्याचे आढळून आल्याने आपण पितो ते दूध कोणते? हाही प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. 
भारतामध्ये सुमारे ३७ प्रकारच्या विविध गायींच्या जाती आहेत. उपलब्ध चारा पाणी व विविध वातावरणामध्ये वर्षानुवर्षे सदर जाती स्थिरावल्या आहेत. गायींचे वर्र्गीकरण त्यांच्या उपयुक्तेनुसार केल्यास काही गायी दुधासाठी (उदा. साहिवाल, रेड सिंधी, गीर, राठी) प्रसिध्द आहेत. देवणी, गवळाऊ, लाल कंधारी या गायी दूध व शेतीकामासाठी, तर खिल्लार,हल्लीकार, डांगी, कृष्णापेली इत्यादी गायी फक्त शेतीसाठी प्रसिध्द आहेत. 
आपल्या संस्कृतीमध्ये देशी गाईला मातेचे स्थान आहे. पूर्र्वी घरासमोर किती गायी आहेत यावरून श्रीमंती समजली जात होती. आपण दुग्ध उत्पादनात जगात आघाडीवर आहोत. परंतु प्रती जनावर उत्पादन अत्यंत कमी आहे. दुधाची वाढती मागणी लक्षात घेता १९७० च्या नंतर भारतामध्ये संकरित गायींची पैदास मोठ्या प्रमाणात केली गेली. त्याचबरोबर आपण आपल्या देशात दुधासाठी प्रसिध्द असलेल्या सहिवाल, गीर, रेड सिंधी इत्यादी गायींच्या जातीकडे दुर्लक्ष झाले. झपाट्याने देशी गायींची संख्या कमी झाली व संकरित गायींची संख्या वाढण्यास चालना मिळाली. ज्या वेळेस आपण गायीचे संकरिकरण करत होतो, त्यावेळेस ब्राझील व इतर देशांनी भारतीय गायी आयात करुन गीर , सहिवाल, ओंंगल इत्यादी जातीवर संशोधन करुन दूध व मांस उत्पादनासाठी विविध जाती तयार केल्या. तसेच ब्राझील देशाने गीर गायीमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी उल्लेखनीय काम केले. भारतीय गायींमध्ये दूध देण्याची क्षमता किती आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिले. 
देशी व विदेशी गायींमधील मुख्य फरक म्हणजे भारतीय गायीला वशिंड असते. तर विदेशी गायींना वशिंड नसते (वशिंड म्हणजे मानेच्या वर असणारा उंचवटा). भारतीय गायीचे दूध ए-२ प्रोलिन प्रथिनयुक्त असते. प्रोलिन हे प्रथिन आरोग्यास चांगले असते. तर विदेशी गायीचे दूध ए १ हिस्टीडीन प्रथिनयुक्त असते. हिस्टिडिन या प्रथिनामुळे डायबेटिस, कॅन्सर किंवा लहान मुलांत वजन वाढण्याचे आजार होतात, असे विदेशातील काही संशोधनात आढळले आहे. विदेशात ए-१ व ए-२ दुधावरती अभ्यास केला गेला आहे. न्युझिलंडमध्ये झालेल्या अभ्यासात ए-१ दुधात असलेल्या प्रोटीनमुळे अनेक रोग होतात, असे आढळून आले आहे. ‘डेविल इन द मिल्क’ या पुस्तकातही ए १ दूध आरोग्यासाठी घातक असल्याचे म्हटले आहे. भारतात देशी व विदेशी गाईचे संशोधन करण्यात आले. त्यामध्ये जर्र्सी एचएफ गायीच्या दुधामध्ये ए १ हिस्टीडीन प्रथिन आढळले तर भारतीय देशी गाईमध्ये प्रोलिन प्रथिन आढळले आहे. परंतु भारतामधील काही जर्सी व एच एफ गायींमध्येसुध्दा काही प्रमाणात ए २ प्रोटीन आढळले आहे. तसेच भारतामध्ये ए १ दुधामुळे कोणते रोग होतात़, याबाबत अद्याप तसा निष्कर्ष निघालेला नाही. देशी गायीमध्ये ९८ ते ९९ टक्के ए-२ प्रकारचे प्रोटिन आढळते. जर्सी गायीमध्ये ए-२ प्रोटिन ४ ते ५ टक्केच आढाळते.
बाहेरच्या देशात ए-२ दूध ब्रॅण्ड म्हणून विकले जात आहे. आपल्याकडे तेवढी जागरुकता अद्याप आलेली नाही. 
भारतातील कोणत्याही जातीच्या गायी वातावरणातील बदलात चांगल्या प्रकारे तग धरत आहेत. तसे संकरित गायीमध्ये आढळून येत नाही. देशी गायींपासून मिळणाऱ्या गोमूत्र, शेण यापासून गोअर्क, गोवऱ्या, शेतीसाठी जिवामृत, सेंद्रिय खत, गांडूळ खत इत्यादी विविध पदार्थ तयार करुन जमिनीचे आरोग्य सुधारणा करण्याचे कार्यक्रम सुरु आहेत. ज्याप्रमाणे देशी गायींचे ए २ दूध विविध गुणांसाठी प्रसिध्द आहे, त्याचप्रमाणे गायी म्हणजे फक्त दूध न पाहता त्यापासून मिळणारे विविध उपपदार्थ याचा वापर आपल्या आरोग्यासाठी व जमिनीच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे. हे शेतकरी बांधवाना जाणवू लागले आहे. त्यामुळे देशीपासून मिळणारे उत्पादन हे एकप्रकारचे अमृत आहे. देशी गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर अनेक शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी होतो. त्यामुळे दिवसेंदिवस त्याचे महत्व वाढत आहे. सरकारही त्यासाठी प्रयत्न करत आहे. शहरांमध्ये देशी गायीचे दूध ८० ते १०० रुपये लीटरप्रमाणे व तूप अडीच ते तीन हजार रुपये किलोप्रमाणे विकले जाऊ लागले आहे. बदलत्या वातावरणामध्ये फक्त देशी गायीच तग धरु शकतात. त्यांना चारा कमी लागलो. औषधे व आरोग्यासाठी कमी खर्च येतो. त्यामुळे एकंदरीत विचार करता भारतीय शेतकरी पुन्हा देशी गायींकडे वळू लागला आहे. तसेच ए २ दुधाचे आरोग्याच्या दृष्टीने लोकांना महत्व पटू लागले आहे. ए-२ दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे. ती मागणी पुरविण्यासाठी देशी गायींचे संवर्धन ही काळाची गरज आहे. सध्या भारतामध्ये असलेल्या देशी गायींपैकी फक्त ३० टक्के गायी शुध्द जातीच्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे विविध भागामध्ये असलेल्या देशी गायींचे संवर्धन होणे खूप महत्वाचे आहे. 
- प्रा.सोमनाथ माने, सहाय्यक प्राध्यापक, पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे