शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नागरीक सुज्ञ आणि सुजाण आहेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 16:54 IST

९ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट, म्हणजे क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन हा आठवडा देशप्रेमाने भारलेला काळ असतो

मिलिंद कुलकर्णी९ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट, म्हणजे क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन हा आठवडा देशप्रेमाने भारलेला काळ असतो. संपूर्ण देशभर वेगवेगळे उपक्रम साजरे होतात. स्वातंत्र्यांच्या ७२ वर्षांमधील घटना, घडामोडींविषयी चर्चा होते. व्याख्याने, परिसंवाद, नाट्य, नृत्य, चित्रपट, लेख, विशेषांक या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष, १५० वर्षांचे पारतंत्र्य उलथवून टाकण्यासाठी जहाल, मवाळ, मध्यममार्गी अशा सर्व घटकांनी केलेले प्रयत्न, एक देश म्हणून केलेली प्रगती यासंबंधी उजाळा दिला जातो.फाळणीच्या जखमा या काळात पुन्हा एकदा ताज्या होतात. हा विषय अतीशय नाजूक आणि संवेदनशील आहे. ज्यांनी फाळणीचे दु:ख भोगले आहे, ज्यांच्या अंगावर, मनावर जखमा अजूनही ताज्या आहेत, अशी मोजकी मंडळी आता हयात आहे. पण पुढील पिढ्यांपर्यंत हे दु:ख झिरपलेले आहे. सिंधी समाजबांधव १४ आॅगस्ट रोजी ‘सिंधू स्मरण दिवस’ पाळतात, तो याच भावनेतून. हिंदुत्ववादी संघटना, राष्टÑीय स्वयंसेवक संघ, हिंदुमहासभा या संघटना या दिवशी अखंड भारत दिवस साजरा करतात. ‘तमस’ पासून तर अलिकडच्या ‘गदर’ पर्यंत अनेक चित्रपट, कथा, कादंबऱ्या, लघुपट या माध्यमातून फाळणीचे दु:ख विदारकपणे मांडले आहे.केंद्र सरकारने जम्मू-काश्मिरमधून ३७० वे कलम हटविल्यानंतर यंदाच्या स्वातंत्र्य दिनी पुन्हा एकदा अखंड भारताचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आला. अखंड भारत, फाळणी, स्वातंत्र्यानंतर नव्या भारताची उभारणी आणि आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची ‘देश बदल रहा है’ ही नवी घोषणा याविषयी समाजमाध्यमे, वर्तमानपत्रातील संपादकीय पाने, दूरचित्रवाहिन्यांवरील चर्चासत्रे वादंग घडत आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्टÑीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात भाजपला बहुमत नसल्याने राम मंदीर, ३७० वे कलम आणि समान नागरी कायदा यासारखे रा.स्व.संघाचे प्रमुख मुद्दे बाजूला ठेवले गेले . ‘किमान समान कार्यक्रम’ तयार करुन वाजपेयी यांनी सरकार चालविले होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या बहुमताचे राष्टÑीय लोकशाही आघाडी सरकार २०१४ मध्ये सत्तारुढ झाले तरीही ‘तीन तलाक विधेयक’ वगळता पाच वर्षात या मुद्यांना हात लावला गेला नाही. २०१९ मध्ये दुसऱ्यांदा मोदींना बहुमत मिळाल्यानंतर भाजप व संघाचा आत्मविश्वास दुणावलेला दिसतो. तीन तलाक विधेयक राज्यसभेत पारीत झाल्यानंतर ३७० वे कलम हटविण्याचे विधेयक मांडण्यात आले. त्यासाठी संसदीय अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात आला. ३७० कलम हटविण्यात आल्यानंतर आता राम मंदीर आणि समान नागरी कायदा हे विषय देखील मार्गी लागतील, असा आशावाद तमाम हिंदुत्ववादी संघटनांना वाटत आहे. तो जाहीरपणे व्यक्त केला जात आहे.३७० वे कलम जम्मू-काश्मिरमधून हटविण्यात आले, परंतु देशात नागालँडसारखे अजून काही प्रांत आहेत, की तेथे विशेष दर्जा देणारे कलम लागू आहे. त्याविषयी केंद्र सरकार का विचार करीत नाही. जम्मू-काश्मिरचा विषय केवळ हिंदू-मुस्लिम अशा अंगाने घेतला जात असल्याबद्दल डावे विचारवंत, काँग्रेसचे नेते, समाजवादी नेते संघ आणि भाजपवर प्रखर टीका करीत आहेत. मुस्लिम अनुनयाचा मुद्दा काँग्रेसवर टीका करीत असताना हिंदुत्ववादी संघटना आवर्जून मांडत असत तसेच आता मुस्लिमांना लक्ष्य केले जात असल्याचा मुद्दा भाजप आणि केंद्र सरकारविषयी अधोरेखित केला जात आहे. भाजपचा पक्ष म्हणून अजेंडा कोणताही असू शकतो, परंतु सरकार म्हणून राज्य घटनेशी बांधील राहून काम करावे लागेल, हे प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवे. देशातील बहुसंख्य नागरीक हे कोणत्याही विचारधारेला बांधील नाहीत. तात्कालीक विषयावर ते भावनिक होतील, पण रोजीरोटी, शांतता आणि सौहार्द हे विषयदेखील तेवढेच महत्त्वाचे आहेत, हे भान जनतेने जपलेले आहे. जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन, आणीबाणी विरोधातील आंदोलन, राम मंदीर आंदोलन, अण्णा हजारे यांचे आंदोलन यात जनता सहभागी झाली होती. परंतु, याच जनतेने नंतर वेगळी भूमिका घेतलेली आपण बघीतलेली आहे. त्यामुळे तात्कालीकतेपेक्षा शाश्वत विकासाच्यादृष्टीने विचार व्हायला हवा. तो देश आणि जनतेच्या हिताचा राहील.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरJalgaonजळगाव