शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

India vs Australia, 2nd Test : मैदान मारण्याची जिद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 23:56 IST

कर्णधार म्हणूनही चांगले निर्णय घेतले व ऐतिहासिक विजय नोंदविला.

‘पुन्हा उसळणार’ म्हणत भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी मेलबर्न कसोटीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला आणि ‘नववर्षाचा संकल्प-अजिंक्य राहणे’, असे वाक्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याला संदर्भ होता, आठच दिवसांपूर्वी मानहानीजनक पराभव स्वीकारलेल्या भारतीय संघाचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नेतृत्व करून उसळी मारणाऱ्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या लढाऊ बाण्याचा. तसाही परदेशातील क्रिकेट विजय आनंददायी असतो.

ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाचा पराभव म्हणजे तर साक्षात दिवाळीच. हा विजय ऐतिहासिक आहे. ॲडलेडमध्ये भारताचा दारुण पराभव झाला. ४६ वर्षांपूर्वीचा ४२ धावांचा नीचांक मोडून ३६ची नवी नामुष्की नोंदली गेली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया भारताला चार-शून्य असा ‘व्हॉइटवॉश’ देणार, अशी मुक्ताफळे दिग्गजांनी उधळली. भरीस भर म्हणजे कर्णधार विराट कोहली पितृत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी भारतात परतला. राेहित शर्मा वाटेवरच आहे.

मोहम्मद शमी  खेळू शकला नाही. ईशांत शर्मा नाही. फलंदाजी व गोलंदाजी अशी लंगडी असताना शुभमन गिल, मोहम्मद सिराज अशा पदार्पण करणाऱ्या नवख्यांसोबत मेलबर्नचा किल्ला अजिंक्यने नुसताच लढवला नाही तर जिंकलाही. पहिल्या डावात झुंजार शतक, दुसऱ्या डावात विजयासाठी जेमतेम ७० धावांची गरज असताना अधिक पडझड होऊ न देता खेळपट्टीवर उभे राहण्याची अजिंक्यने दाखवलेली जिद्द, संयम केवळ वाखाणण्याजोगाच. या अजरामर खेळीने त्याचे नाव क्रिकेट इतिहासात सोनेरी अक्षरांनी नोंदले जाईल.  फार देखावा न करता, ‘स्टाइल आयकॉन’ बनण्याचा मोह दूर सारून, ‘स्लेजिंग’ नावाच्या संतापाला आवर घालून, खाली मान घालून खेळावर लक्ष केंद्रित केले तरी ऐतिहासिक कामगिरी करता येते, हे अजिंक्यने दाखवून दिले. झालेच तर मुंबईच्या जिमखान्यांवर किंवा वानखेडे, ब्रेबॉर्नवर ज्याला खडूस म्हणतात अशा जुन्या शैलीत त्याने चिवट फलंदाजी केली.

कर्णधार म्हणूनही चांगले निर्णय घेतले व ऐतिहासिक विजय नोंदविला. मैदानावरील कर्तृत्वापेक्षाही मैदानाबाहेरील शो-शा मध्ये मशगूल  राहण्याचे आणि खेळापेक्षाही अन्य कारणांनी चमकत राहण्याचे वेड खेळाडूंना लावलेल्या या काळात ‘ओल्ड स्कूल’ म्हणून एरवी काहीशी हिणवली गेलेली रीत हाच अंतिम विजयाचा शाश्वत रस्ता असतो, हेही यानिमित्ताने सिद्ध झाले, ते उत्तमच ! भारतीय विजयाच्या दुधात साखर म्हणजे मेलबर्न कसोटीत विजय भारताच्या दृष्टिपथात असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने सोमवारी दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून विराट कोहली, तर खिलाडूवृत्तीसाठी महेंद्रसिंह धोनीची निवड जाहीर केली.

उद्या संपणारे एकविसाव्या शतकातील दुसरे दशक खरेच विराट कोहलीचे आहे. कसोटी, वनडे व टी-२० अशा क्रिकेटच्या सगळ्या प्रकारात त्याचा डंका जगभर गाजतो आहे. नऊ वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये इयान बेलला पंचांनी बाद दिले असूनही तो नाबाद असल्याचे माहीत असल्याने त्याला परत बोलावून खेळायला लावण्याची दुर्मीळ कृती ‘कॅप्टन कूल’ धोनीने केली होती. सामना म्हणजे एक युद्ध असल्याच्या आविर्भावात जगातले बहुतेक सगळे संघ व त्यातील खेळाडू खेळत असताना हे ‘स्पोर्ट्समॅन स्पिरीट’ खरेच अपवादात्मक आहे. कोरोना महामारीमुळे सगळीकडे निराशेचे मळभ दाटलेले असताना या दु:स्वप्नवजा वर्षाची अखेर क्रिकेटच्या मैदानावर अशी आनंददायी होत असतानाच महाराष्ट्र सरकारने सोमवारी अन्य खेळांबद्दलही कौतुकास्पद पाऊल उचलले.

कोरोना महामारीमुळे गेल्या ऑगस्टमध्ये टोकिओ येथे ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. त्यासाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, प्रवीण जाधव, अविनाश साबळे व स्वरूप उन्हाळकर या पाच खेळाडूंना स्पर्धेच्या तयारीसाठी प्रत्येकी पन्नास लाखांचा निधी सरकारने त्यांच्याकडे सोपविला. असे म्हणतात, की खेळाडू आकाशातून पडत नाहीत. त्यांना घडवावे लागते, त्यांच्यावर मेहनत घ्यावी लागते आणि ती घेण्यासाठी क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध असाव्या लागतात. दुर्दैवाने आपल्याकडे त्या दृष्टीने फार चांगली स्थिती नाही. अमेरिका, चीन, रशिया किंवा जपानशी तुलना केली तर याबाबत आपण मागासलेले आहोत. इतकेच कशाला उत्तरेकडील हरयाणा, पंजाबच्या तुलनेतही महाराष्ट्रात पुरेशा क्रीडा सुविधा नसल्याची नेहमीची तक्रार आहे. तिची दखल घेऊन राज्य सरकार काही दुरुस्ती करीत असेल, तर तिचे स्वागतच करायला हवे. या अशा घटनांनी नव्या वर्षाची सुरुवात मैदान मारण्याच्या उमेदीने, जिद्दीने, झाली, हे अधिक महत्त्वाचे.

टॅग्स :Ajinkya Rahaneअजिंक्य रहाणेIndia vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया