शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
4
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
5
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
6
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
7
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
8
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
9
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
10
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
11
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
12
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
13
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
14
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
15
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
16
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
17
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
18
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
19
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
20
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

India vs Australia, 2nd Test : मैदान मारण्याची जिद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 23:56 IST

कर्णधार म्हणूनही चांगले निर्णय घेतले व ऐतिहासिक विजय नोंदविला.

‘पुन्हा उसळणार’ म्हणत भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी मेलबर्न कसोटीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला आणि ‘नववर्षाचा संकल्प-अजिंक्य राहणे’, असे वाक्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याला संदर्भ होता, आठच दिवसांपूर्वी मानहानीजनक पराभव स्वीकारलेल्या भारतीय संघाचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नेतृत्व करून उसळी मारणाऱ्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या लढाऊ बाण्याचा. तसाही परदेशातील क्रिकेट विजय आनंददायी असतो.

ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाचा पराभव म्हणजे तर साक्षात दिवाळीच. हा विजय ऐतिहासिक आहे. ॲडलेडमध्ये भारताचा दारुण पराभव झाला. ४६ वर्षांपूर्वीचा ४२ धावांचा नीचांक मोडून ३६ची नवी नामुष्की नोंदली गेली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया भारताला चार-शून्य असा ‘व्हॉइटवॉश’ देणार, अशी मुक्ताफळे दिग्गजांनी उधळली. भरीस भर म्हणजे कर्णधार विराट कोहली पितृत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी भारतात परतला. राेहित शर्मा वाटेवरच आहे.

मोहम्मद शमी  खेळू शकला नाही. ईशांत शर्मा नाही. फलंदाजी व गोलंदाजी अशी लंगडी असताना शुभमन गिल, मोहम्मद सिराज अशा पदार्पण करणाऱ्या नवख्यांसोबत मेलबर्नचा किल्ला अजिंक्यने नुसताच लढवला नाही तर जिंकलाही. पहिल्या डावात झुंजार शतक, दुसऱ्या डावात विजयासाठी जेमतेम ७० धावांची गरज असताना अधिक पडझड होऊ न देता खेळपट्टीवर उभे राहण्याची अजिंक्यने दाखवलेली जिद्द, संयम केवळ वाखाणण्याजोगाच. या अजरामर खेळीने त्याचे नाव क्रिकेट इतिहासात सोनेरी अक्षरांनी नोंदले जाईल.  फार देखावा न करता, ‘स्टाइल आयकॉन’ बनण्याचा मोह दूर सारून, ‘स्लेजिंग’ नावाच्या संतापाला आवर घालून, खाली मान घालून खेळावर लक्ष केंद्रित केले तरी ऐतिहासिक कामगिरी करता येते, हे अजिंक्यने दाखवून दिले. झालेच तर मुंबईच्या जिमखान्यांवर किंवा वानखेडे, ब्रेबॉर्नवर ज्याला खडूस म्हणतात अशा जुन्या शैलीत त्याने चिवट फलंदाजी केली.

कर्णधार म्हणूनही चांगले निर्णय घेतले व ऐतिहासिक विजय नोंदविला. मैदानावरील कर्तृत्वापेक्षाही मैदानाबाहेरील शो-शा मध्ये मशगूल  राहण्याचे आणि खेळापेक्षाही अन्य कारणांनी चमकत राहण्याचे वेड खेळाडूंना लावलेल्या या काळात ‘ओल्ड स्कूल’ म्हणून एरवी काहीशी हिणवली गेलेली रीत हाच अंतिम विजयाचा शाश्वत रस्ता असतो, हेही यानिमित्ताने सिद्ध झाले, ते उत्तमच ! भारतीय विजयाच्या दुधात साखर म्हणजे मेलबर्न कसोटीत विजय भारताच्या दृष्टिपथात असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने सोमवारी दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून विराट कोहली, तर खिलाडूवृत्तीसाठी महेंद्रसिंह धोनीची निवड जाहीर केली.

उद्या संपणारे एकविसाव्या शतकातील दुसरे दशक खरेच विराट कोहलीचे आहे. कसोटी, वनडे व टी-२० अशा क्रिकेटच्या सगळ्या प्रकारात त्याचा डंका जगभर गाजतो आहे. नऊ वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये इयान बेलला पंचांनी बाद दिले असूनही तो नाबाद असल्याचे माहीत असल्याने त्याला परत बोलावून खेळायला लावण्याची दुर्मीळ कृती ‘कॅप्टन कूल’ धोनीने केली होती. सामना म्हणजे एक युद्ध असल्याच्या आविर्भावात जगातले बहुतेक सगळे संघ व त्यातील खेळाडू खेळत असताना हे ‘स्पोर्ट्समॅन स्पिरीट’ खरेच अपवादात्मक आहे. कोरोना महामारीमुळे सगळीकडे निराशेचे मळभ दाटलेले असताना या दु:स्वप्नवजा वर्षाची अखेर क्रिकेटच्या मैदानावर अशी आनंददायी होत असतानाच महाराष्ट्र सरकारने सोमवारी अन्य खेळांबद्दलही कौतुकास्पद पाऊल उचलले.

कोरोना महामारीमुळे गेल्या ऑगस्टमध्ये टोकिओ येथे ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. त्यासाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, प्रवीण जाधव, अविनाश साबळे व स्वरूप उन्हाळकर या पाच खेळाडूंना स्पर्धेच्या तयारीसाठी प्रत्येकी पन्नास लाखांचा निधी सरकारने त्यांच्याकडे सोपविला. असे म्हणतात, की खेळाडू आकाशातून पडत नाहीत. त्यांना घडवावे लागते, त्यांच्यावर मेहनत घ्यावी लागते आणि ती घेण्यासाठी क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध असाव्या लागतात. दुर्दैवाने आपल्याकडे त्या दृष्टीने फार चांगली स्थिती नाही. अमेरिका, चीन, रशिया किंवा जपानशी तुलना केली तर याबाबत आपण मागासलेले आहोत. इतकेच कशाला उत्तरेकडील हरयाणा, पंजाबच्या तुलनेतही महाराष्ट्रात पुरेशा क्रीडा सुविधा नसल्याची नेहमीची तक्रार आहे. तिची दखल घेऊन राज्य सरकार काही दुरुस्ती करीत असेल, तर तिचे स्वागतच करायला हवे. या अशा घटनांनी नव्या वर्षाची सुरुवात मैदान मारण्याच्या उमेदीने, जिद्दीने, झाली, हे अधिक महत्त्वाचे.

टॅग्स :Ajinkya Rahaneअजिंक्य रहाणेIndia vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया