शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

देशात राहुल गांधींएवढा ‘राष्ट्रीय’ प्रतिमा असणारा दुसरा नेता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 04:54 IST

परवाच्या निवडणुकीत एकटे राहुल गांधीच मोदींना तोंड देताना दिसले.

परवाच्या निवडणुकीत एकटे राहुल गांधीच मोदींना तोंड देताना दिसले. बाकीचे सारे आपापल्या गल्लीतील हाणामाऱ्यांतच तोंड वाजविताना दिसले. स्थानिक पक्षांनी त्यांची कोंडी केली नसती तर या जागा दुपटीने वाढल्या असत्या. पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय त्यांच्या पक्षाएवढाच देशालाही मान्य होणारा नाही. पक्षाच्या पराभवाची जबाबदारी शिरावर घेणे हा त्यांचा विचार नैतिक असला तरी राजकारणाची आजची स्थिती पाहता तो चुकीचा ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. नरेंद्र मोदींचा अपवाद वगळला तर आज देशात राहुल गांधींएवढा ‘राष्ट्रीय’ प्रतिमा असणारा दुसरा नेता नाही. प्रादेशिक पुढाऱ्यांना असलेली त्यांच्या पर्यायांची कल्पना सा-या देशाला या निवडणुकीत आली आहे. त्यांच्यातील कोणताही पुढारी ‘राष्ट्रीय’ मुकुट धारण करू शकत नाही, हे स्पष्ट झाले. परवाच्या निवडणुकीत एकटे राहुल गांधीच मोदींना तोंड देताना दिसले. राहुल गांधींचा पक्ष देशातील सात राज्यांत सत्तेवर आहे. त्यांच्या पक्षाचे ५२ उमेदवार लोकसभेत निवडून आले आहेत. स्थानिक पक्षांनी त्यांची कोंडी केली नसती तर या जागा दुपटीने वाढल्या असत्या. राष्ट्रीय पक्षाबाबत त्या बारक्या पक्षांनीही अंतर्मुख होऊन विचार करणे आता गरजेचे आहे. आपसात लढून मोदींना सत्ता द्यायची की, एकत्र येऊन आपण सत्ता मिळवायची हा त्यांच्यापुढचा आताचा प्रश्न आहे. (नावे मोठी असली तरी जनता सोबत असल्याखेरीज विजय मिळत नाही हे त्यांनाही आता कळले असावे) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांची राहुल गांधींना असलेली जाण जशी या निवडणुकीत दिसली तशी शेतकरी, कामगार, दलित व बेरोजगार, महिलांचे प्रश्नही त्यांनी कमालीच्या अभ्यासपूर्णरीतीने मांडले. राफेल घोटाळा, नोटाबंदी, जीएसटी या गोष्टींनी समाजात निर्माण केलेला असंतोषही त्यांनीच मांडला. ते ममतांनीही केले नाही. शरद पवारांनी केले नाही. अखिलेश आणि मायावतींना तर त्या प्रश्नाशी काही कर्तव्य आहे की नाही असेच जनतेला अखेरपर्यंत वाटत राहिले. राष्टÑीय प्रश्न, राष्टÑीय पक्ष, राष्टÑीय प्रतिमा व राष्टÑीय नेतृत्व या स्तरावरील गोष्टी राहुल गांधींना अनुकूल आहेत. शिवाय त्यांच्यामागे शंभर वर्षांचा त्याग व देशभक्तीची प्रतिमा उभी असल्याने त्यांना मानणाºयांचा वर्ग साºया देशात आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी तीन राज्यांत भाजपचा पराभव केला.

तर पंजाब व कर्नाटक ही राज्ये ताब्यात ठेवली. निवडणूक म्हटले की, त्यात जय-पराजय येणारच. त्यामुळे हा पराभव त्यांनी व चाहत्यांनी एवढा मनावर घेण्याचे कारण नाही. गांधी व नेहरू या दोन नावांना असलेली राष्टÑीय मान्यता देशातील तिसºया नावाला नाही आणि राहुल गांधी हे साºयांचे प्रतिनिधी वाटत आहेत. त्यांच्या सुदैवाने ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यांच्यासारखे राष्टÑीय प्रतिमा असलेले युवा नेते त्यांच्या सोबतीला आहेत. जुनी माणसे पक्षाला प्रतिष्ठा देतात तर नवीन माणसे त्याला गतिमान करून पुढे नेतात. राहुल गांधींना त्यांचा चांगला वापर करता येईल. शिवाय मोदींची प्रतिमा अजून स्वच्छ नाही. अमित शहांच्या मागे खटल्यांचे गुºहाळ आहे. समाजातील मोठे पण सामान्य व गरिबांचे वर्ग त्यांच्यावर नाखूश आहेत. ही स्थिती व्यवस्थित हाताळणे, इतर पक्षांची समजूत घालून त्यांना संघटित करणे व पक्षाचा सामान्य जनतेशी असलेला संबंध आणखी मजबूत करणे त्यांना व त्यांच्या वरिष्ठ सहकाºयांना जमणारे आहे.
राज्याराज्यातील हट्टी व हेकेखोर पुढारी त्यांचे वजन गमावून बसले आहेत आणि त्यांच्या मागे जाऊन आपण विजयापर्यंत पोहोचू शकत नाही, हे त्यांच्या अनुयायांनाही समजले आहे. पक्षांतर करून व भाजपचे तिकीट मिळवून निवडून आलेल्या काही जणांची जनमानसातील प्रतिमा खुजी आहे. या स्थितीत आपले अध्यक्षपद कायम राखून जुन्या व नव्यांना सोबत घेऊन आणि प्रादेशिकांना जवळ करीत राहुल गांधींना पुढे जाता येणार आहे. वय त्यांना अनुकूल आहे आणि देशातील ग्रामीण भाग, अल्पसंख्य, दलित, गरीब व कनिष्ठ मध्यमवर्ग हेही त्यांच्या सोबत आहेत. म्हणून राजीनाम्याची भाषा न वापरता लोकमान्य टिळकांनी म्हटल्याप्रमाणे ‘पुनश्च हरिओम’ म्हणून पुढे जाणे राहुल गांधींचे कर्तव्य आहे. ही त्यांची राष्टÑीय जबाबदारीही आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९