शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सेल्फीद्वारे मृत्यूमध्ये भारत आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 03:02 IST

आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. एकविसाव्या शतकात संगणक व मोबाइल क्रांतीने जीवन पद्धतीचे सर्व संदर्भ बदलले आहेत.

- डॉ. दीपक शिकारपूर आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. एकविसाव्या शतकात संगणक व मोबाइल क्रांतीने जीवन पद्धतीचे सर्व संदर्भ बदलले आहेत. प्रत्येक वस्तू, उपकरण हे ‘स्मार्ट’ असणे आज चैन नसून गरज होत चालली आहे़ सध्या नव्या पिढीच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे आणि या फोनवर चांगले फोटो काढणे सोपे असल्याने स्मार्ट तरुणांना पदोपदी फोटो काढण्याचे वेड जडलेले आहे. स्मार्टफोनमध्ये असलेल्या सेल्फीच्या सोयीमुळे स्वत:चाच फोटो काढणे सोयीचे झाले आहे. हा अतिरेक काही जणांच्या बाबतीत व्यसानकडे झुकू लागला आहे. संगणक व इतर उपकरणे आपले जीवन सुसह्य करण्यासाठी निर्माण केली आहेत. पण दुर्दैवाने अनेक त्याच्या अधीन झाले आहेत. सेल्फीचे भूत आजकाल प्रत्येकाच्याच डोक्यावर चढलेले आहे. स्मार्टफोन मिळताच जो तो सेल्फी काढत फिरत आहे. सेल्फीचा अतिरेक हा मूर्खपणा नक्कीच आहे़ हा मानसिक आजारपण असू शकतो़अनेक तरुण (मुले /मुली) अगदी कपडे बदलले की त्या बदलाची सेल्फी काढतात. क्षणोक्षणी सेल्फी काढण्याचे प्रकार नित्य आढळत आहेत. त्यांच्या हातात फोन आहे आणि सेल्फी त्यांची त्यांनाच काढायची आह़े़ त्यामुळे त्यांना ती काढण्यास कोणी अटकाव करू शकत नाही. परंतु त्यासाठीसुद्धा काही तारतम्य पाळले पाहिजे की नाही? आपला जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्यात काय अर्थ आहे?सध्या लहान मुले, अबालवृद्ध आणि समस्त युवा वर्गाला पर्यटनस्थळी गेल्यावर तेथील ठिकाणाची छबी, दृश्य टिपण्याची नवी क्रेझ रूढ झाली आहे. आपापल्या मोबाइलद्वारे (सेल्फी) काढण्याची क्रेझ रूढ झाली आहे. फाजील आत्मविश्वास, अतिउत्साह, स्टंटगिरी करत अनेक जण अत्यंत धोकादायक ठिकाणी जाऊन मोबाइलद्वारे सेल्फी काढतात. गड, किल्ले, उंच डोंगर, सुळके, खोल दर्या, धबधबे, कडेकपारी, गुहा, वेगवान जलप्रवाह, खोल जलाशये अशा विविध ठिकाणी पर्यटनाला गेल्यावर तेथील परिसरातील धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याची क्रेझ केवळ युवकांमध्येच नाही, तर सर्वांमध्ये वाढल्याचे वास्तव आहे. धोकादायक ठिकाणाच्या सेल्फीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका मुलाने सापाबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला़ हत्तीबरोबर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात एक तरुण हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला. सेल्फी म्हणजे असे काय आहे की ज्याच्यासाठी आपल्या प्राणाचीही पर्वा करू नये? ती प्राणाच्या पलीकडे आहे का? दुर्दैवाने आपला देश ह्या प्रकारच्या सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये आघाडीवर आहे़ कमी वयात हातात येणारा पैसा. त्याच्या विनियोगाकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष यासाठी कारणीभूत आहे. शाळा, महाविद्यालये इथेही संगणक, स्मार्टफोनचे दुष्परिणाम यावर प्रबोधन होणे बंधनकारक व्हावे. नागरिक शास्त्र विषयात याचा समावेश व्हायची हीच वेळ आहे.कुठलीही गोष्ट मर्यादित प्रमाणात मूल्य देते. मोबाइल तंत्रज्ञानाचेपण असेच आहे. गरज असेल तरच ते वापरा. वेळ जात नसेल तर मैदानी खेळ, कला, बाह्यक्रिया, योगा, फिरणे, संगीत असे अनेक पर्याय आहेत. मोबाइल न वापरायची सवयपण झाली पाहिजे. माझा एक मित्र रविवारी मोबाइल, नेट अजिबात वापरत नाही. स्वत:वर बंधन व शिस्त या बाबतीतही आवश्यक आहे. माफक प्रमाणात हवे तेव्हाच जर आपण हे तंत्रज्ञान वापरले तर त्याचे अनेक फायदेही आहेत़(संगणक साक्षरता प्रसारक)