शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

काँग्रेससह देशातल्या २0 राजकीय पक्षांनी पुकारलेल्या 'भारत बंद'नं अहंकारी सरकारला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 23:44 IST

पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीविरुद्ध काँग्रेससह देशातल्या २0 राजकीय पक्षांनी सोमवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले होते.

पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीविरुद्ध काँग्रेससह देशातल्या २0 राजकीय पक्षांनी सोमवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले होते. देशातल्या विविध राज्यांत ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला, तर भाजपाशासित राज्यांसह प.बंगालसारख्या काही राज्यांत बंदला अंशत: प्रतिसाद मिळाला. राजधानी दिल्लीत बऱ्याचशा व्यापारी संघटनांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवले होते, तर काही राज्यात ‘बंद’ला संमिश्र स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला. सकाळी ९ ते दुपारी ३ असा अवघ्या सहा तासांचा ‘भारत बंद’ तसा प्रतीकात्मकच होता. कोणत्या गावात किती टक्के बंद पाळला गेला, अशा टक्केवारीच्या स्वरूपात त्याचे मूल्यमापन करणे उचित ठरणार नाही. ‘बंद’मध्ये जे सहभागी नव्हते, त्यांचा इंधनाच्या भाववाढीला अथवा सरकारच्या क्रियाशून्यतेला पाठिंबा होता, असेही कोणी म्हणणार नाही. इंधनाची भाववाढ अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाची घसरण या दोन विषयांबाबत जनतेच्या तीव्र संवेदना सोमवारच्या ‘भारत बंद’द्वारे सरकारपर्यंत पोहोचल्या. विरोधक त्यात बºयापैकी यशस्वी झाले, हे निश्चितच मान्य करावे लागेल. पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज वाढणाºया किमतींनी आजवरच्या इतिहासात नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, प्रत्येकाच्या खिशाला आग लावणाºया या ज्वालाग्रही विषयाबाबत मोदी सरकार अन् सत्तारूढ भाजपा कमालीचे निश्चिंत आहे. भाजपाचे प्रवक्ते अन् नेते इंधन भाववाढीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली भाववाढ कशी जबाबदार आहे, जागतिक स्तरावरील चढउतारांमुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरणेदेखील या भाववाढीला कसे कारणीभूत आहे, याचे ज्ञान जनतेला ऊठसूट ऐकवत असतात. तथापि, या भाववाढीबद्दल देशभर असंतोषाच्या ठिणग्या प्रज्वलित होत असताना, मोदी सरकारची काही जबाबदारी आहे की नाही, याविषयी कोणीही खुलासा करताना दिसत नाही. गेल्या ४ वर्षांत इंधनावरील करांच्या स्वरूपात सुमारे ११ लाख कोटींची कमाई सरकार अन् तेल कंपन्यांना झाली. या रकमेतला किंचितही लाभ केंद्र सरकारने आजवर सामान्य जनतेला मिळू दिलेला नाही. देशातल्या कोणत्याही पेट्रोल पंपावर जा, आपल्या वाहनात इंधन भरताना पंतप्रधान मोदींच्या सुहास्य मुद्रेतल्या प्रतिमेचे दर्शन प्रत्येकाला घडते. देशात असा एकही पेट्रोल पंप नाही की, जिथे जनतेला खिजविणारे हे होर्डिंग लटकलेले नाही. ज्या उज्ज्वला योजनेचे श्रेय घेण्यासाठी सक्तीने ही जाहिरातबाजी सुरू आहे, त्या योजनेच्या महिला लाभार्थींच्या चेहºयांवरचे स्मित पहिल्या मोफत सिलिंडर नंतरच कोमेजले आहे. दुसºया सिलिंडरसाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे उज्ज्वला योजनेचे आरंभशूर सिलिंडर्स घरोघरी शोभेची वस्तू बनून पडून आहेत. गॅसचीदेखील भाववाढ झाली असून, एका सिलिंडरची किंमत आज सरासरी ८३३ रुपये आहे. ‘भारत बंद’ कितपत यशस्वी झाला? लोकांचा त्याला खरोखर किती प्रतिसाद मिळाला, याचे सोइस्कर मूल्यमापन करीत मोदी सरकार व सत्ताधारी भाजपाने जरी स्वत:चे समाधान करून घेतले, तरी महागाईसह विविध प्रकारची संकटे झेलणारी जनता दीर्घकाळ शांतपणे सारे काही सहन करील, अशा भ्रमात कोणालाही राहता येणार नाही. शहरात राहणाºया मध्यम वर्गापुरती ही समस्या मर्यादित नाही. डिझेलची भाववाढ शेतीची अडचण करते व मालवाहतुकीच्या ट्रक्सची संकटे अधिक वाढविते. परिणामी, सर्वच वस्तूंचे भाव वाढतात. रेल्वेचे बजेटही त्यामुळे बिघडणारच आहे. अशा वेळी दररोज वाढणारे इंधनाचे भाव सरकार नव्हे, तर तेल कंपन्या ठरवितात, असा सोइस्कर युक्तिवाद ऐकवून सरकारला पळ काढता येणार नाही. याचे महत्त्वाचे कारण सामान्यजन इंधनासाठी जी रक्कम सध्या मोजतात, त्यातला मोठा हिस्सा केंद्र व राज्य सरकारांच्या तिजोरीत जमा होतो. केंद्र सरकारचे ऊठसूट गोडवे गाणाºयांना ‘भारत बंद’ने एका गोष्टीची नक्कीच जाणीव करून दिली की, लोकरंजनाच्या घोषणांनी जनतेला अल्पकाळ फसविता येते. मात्र, सर्वांना सर्वकाळ फसविता येत नाही.>गेल्या ४ वर्षांत इंधनावरील करांच्या स्वरूपात सुमारे ११ लाख कोटींची कमाई सरकार अन् तेल कंपन्यांना झाली. या रकमेतला किंचितही लाभ केंद्र सरकारने सामान्य जनतेला मिळू दिलेला नाही. पेट्रोल पंपावर मात्र पंतप्रधानांच्या सुहास्य मुद्रेच्या प्रतिमेचे दर्शन घडते.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद