शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेससह देशातल्या २0 राजकीय पक्षांनी पुकारलेल्या 'भारत बंद'नं अहंकारी सरकारला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 23:44 IST

पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीविरुद्ध काँग्रेससह देशातल्या २0 राजकीय पक्षांनी सोमवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले होते.

पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीविरुद्ध काँग्रेससह देशातल्या २0 राजकीय पक्षांनी सोमवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले होते. देशातल्या विविध राज्यांत ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला, तर भाजपाशासित राज्यांसह प.बंगालसारख्या काही राज्यांत बंदला अंशत: प्रतिसाद मिळाला. राजधानी दिल्लीत बऱ्याचशा व्यापारी संघटनांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवले होते, तर काही राज्यात ‘बंद’ला संमिश्र स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला. सकाळी ९ ते दुपारी ३ असा अवघ्या सहा तासांचा ‘भारत बंद’ तसा प्रतीकात्मकच होता. कोणत्या गावात किती टक्के बंद पाळला गेला, अशा टक्केवारीच्या स्वरूपात त्याचे मूल्यमापन करणे उचित ठरणार नाही. ‘बंद’मध्ये जे सहभागी नव्हते, त्यांचा इंधनाच्या भाववाढीला अथवा सरकारच्या क्रियाशून्यतेला पाठिंबा होता, असेही कोणी म्हणणार नाही. इंधनाची भाववाढ अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाची घसरण या दोन विषयांबाबत जनतेच्या तीव्र संवेदना सोमवारच्या ‘भारत बंद’द्वारे सरकारपर्यंत पोहोचल्या. विरोधक त्यात बºयापैकी यशस्वी झाले, हे निश्चितच मान्य करावे लागेल. पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज वाढणाºया किमतींनी आजवरच्या इतिहासात नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, प्रत्येकाच्या खिशाला आग लावणाºया या ज्वालाग्रही विषयाबाबत मोदी सरकार अन् सत्तारूढ भाजपा कमालीचे निश्चिंत आहे. भाजपाचे प्रवक्ते अन् नेते इंधन भाववाढीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली भाववाढ कशी जबाबदार आहे, जागतिक स्तरावरील चढउतारांमुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरणेदेखील या भाववाढीला कसे कारणीभूत आहे, याचे ज्ञान जनतेला ऊठसूट ऐकवत असतात. तथापि, या भाववाढीबद्दल देशभर असंतोषाच्या ठिणग्या प्रज्वलित होत असताना, मोदी सरकारची काही जबाबदारी आहे की नाही, याविषयी कोणीही खुलासा करताना दिसत नाही. गेल्या ४ वर्षांत इंधनावरील करांच्या स्वरूपात सुमारे ११ लाख कोटींची कमाई सरकार अन् तेल कंपन्यांना झाली. या रकमेतला किंचितही लाभ केंद्र सरकारने आजवर सामान्य जनतेला मिळू दिलेला नाही. देशातल्या कोणत्याही पेट्रोल पंपावर जा, आपल्या वाहनात इंधन भरताना पंतप्रधान मोदींच्या सुहास्य मुद्रेतल्या प्रतिमेचे दर्शन प्रत्येकाला घडते. देशात असा एकही पेट्रोल पंप नाही की, जिथे जनतेला खिजविणारे हे होर्डिंग लटकलेले नाही. ज्या उज्ज्वला योजनेचे श्रेय घेण्यासाठी सक्तीने ही जाहिरातबाजी सुरू आहे, त्या योजनेच्या महिला लाभार्थींच्या चेहºयांवरचे स्मित पहिल्या मोफत सिलिंडर नंतरच कोमेजले आहे. दुसºया सिलिंडरसाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे उज्ज्वला योजनेचे आरंभशूर सिलिंडर्स घरोघरी शोभेची वस्तू बनून पडून आहेत. गॅसचीदेखील भाववाढ झाली असून, एका सिलिंडरची किंमत आज सरासरी ८३३ रुपये आहे. ‘भारत बंद’ कितपत यशस्वी झाला? लोकांचा त्याला खरोखर किती प्रतिसाद मिळाला, याचे सोइस्कर मूल्यमापन करीत मोदी सरकार व सत्ताधारी भाजपाने जरी स्वत:चे समाधान करून घेतले, तरी महागाईसह विविध प्रकारची संकटे झेलणारी जनता दीर्घकाळ शांतपणे सारे काही सहन करील, अशा भ्रमात कोणालाही राहता येणार नाही. शहरात राहणाºया मध्यम वर्गापुरती ही समस्या मर्यादित नाही. डिझेलची भाववाढ शेतीची अडचण करते व मालवाहतुकीच्या ट्रक्सची संकटे अधिक वाढविते. परिणामी, सर्वच वस्तूंचे भाव वाढतात. रेल्वेचे बजेटही त्यामुळे बिघडणारच आहे. अशा वेळी दररोज वाढणारे इंधनाचे भाव सरकार नव्हे, तर तेल कंपन्या ठरवितात, असा सोइस्कर युक्तिवाद ऐकवून सरकारला पळ काढता येणार नाही. याचे महत्त्वाचे कारण सामान्यजन इंधनासाठी जी रक्कम सध्या मोजतात, त्यातला मोठा हिस्सा केंद्र व राज्य सरकारांच्या तिजोरीत जमा होतो. केंद्र सरकारचे ऊठसूट गोडवे गाणाºयांना ‘भारत बंद’ने एका गोष्टीची नक्कीच जाणीव करून दिली की, लोकरंजनाच्या घोषणांनी जनतेला अल्पकाळ फसविता येते. मात्र, सर्वांना सर्वकाळ फसविता येत नाही.>गेल्या ४ वर्षांत इंधनावरील करांच्या स्वरूपात सुमारे ११ लाख कोटींची कमाई सरकार अन् तेल कंपन्यांना झाली. या रकमेतला किंचितही लाभ केंद्र सरकारने सामान्य जनतेला मिळू दिलेला नाही. पेट्रोल पंपावर मात्र पंतप्रधानांच्या सुहास्य मुद्रेच्या प्रतिमेचे दर्शन घडते.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद