शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

Independence Day 2021 : राजे आपण आहात, म्हणून लोकशाही सुरक्षित

By वसंत भोसले | Updated: August 15, 2021 09:28 IST

Celebrating Happy Independence Day 2021: भारताने पावणे तीन वर्षांच्या अथक अभ्यासू, विचारमंथन आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचारधारेच्या जोरावर २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना स्वीकारली.

- वसंत भोसले

भारतीय मतदारांनी नेहमी देशाची अखंडता, कणखर नेतृत्व आदींची पाठराखण केली. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करताच प्रचंड मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहिले. त्याच्या रेट्यामुळे इंदिराजींना आणीबाणी मागे घेऊन निवडणुका जाहीर कराव्या लागल्या. मार्च १९७७ मध्ये झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसचा पराभव केला आणि जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. सरकारातील मतभेदांमुळे केवळ पावणे तीन वर्षांत देशात प्रथमच मध्यावधी निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी, तसेच काँग्रेसला नाकारणाऱ्या मतदारांनीच त्यांना पुन्हा सत्तेवर बसविले. मतदारांनी केंद्रात बहुमतासह सरकार स्थापन करून सद‌्सद‌्विवेकबुद्धीचा पुरेपूर प्रत्यय दाखविला. भारतीय जनता मोठ्या प्रमाणात अशिक्षित आणि अर्धपोटी असली तरी तिने देशाच्या राष्ट्रहितासाठी जागृतपणे मतदान करून भारतीय लोकशाहीला बळकट केले आहे. १९७७ ते १९८० च्या दरम्यानचा हा मतदारांनी घडविलेला हा चमत्कार म्हणजे त्यांचा जाणतेपणा, परिपक्वपणा होता.

भारताने पावणे तीन वर्षांच्या अथक अभ्यासू, विचारमंथन आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचारधारेच्या जोरावर २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना स्वीकारली. राज्यघटनेतील तरतुदीनुसार लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींमधून आकाराला आलेल्या लोकसभागृहातून सरकार स्थापन करण्याची रचना निश्चित झाली. या राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्याने डिसेंबर १९५१ ते मार्च १९५२ दरम्यान साडेतीन महिन्यांत लोकसभेची पहिली निवडणूक झाली. लोकसभेच्या आजवर झालेल्या १७ निवडणुकांपैकी चार मुदतपूर्व झाल्या. पहिल्या निवडणुकीत १० कोटी मतदार होते. २०१९च्या निवडणुकीत ९१ कोटी २० लाख ५० हजार ५७८ मतदार होते. 

७ निवडणुकांमध्ये एकाही पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि आघाड्यांचे सरकार स्थापन झाले. त्यापैकी काँग्रेसने तीन, जनता दलाने दोन, तर भाजपने दोनवेळा आघाडी सरकार स्थापन केले.

आतापर्यंत १७ निवडणुका १० वेळा भारतीय मतदारांनी एका पक्षाला बहुमताने निवडून दिले. 

एकाच पक्षाला बहुमत कितीवेळा७ वेळा काँग्रेस१ वेळा जनता पक्ष२ वेळा भाजप 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन