शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Independence Day 2021 : राजे आपण आहात, म्हणून लोकशाही सुरक्षित

By वसंत भोसले | Updated: August 15, 2021 09:28 IST

Celebrating Happy Independence Day 2021: भारताने पावणे तीन वर्षांच्या अथक अभ्यासू, विचारमंथन आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचारधारेच्या जोरावर २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना स्वीकारली.

- वसंत भोसले

भारतीय मतदारांनी नेहमी देशाची अखंडता, कणखर नेतृत्व आदींची पाठराखण केली. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करताच प्रचंड मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहिले. त्याच्या रेट्यामुळे इंदिराजींना आणीबाणी मागे घेऊन निवडणुका जाहीर कराव्या लागल्या. मार्च १९७७ मध्ये झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसचा पराभव केला आणि जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. सरकारातील मतभेदांमुळे केवळ पावणे तीन वर्षांत देशात प्रथमच मध्यावधी निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी, तसेच काँग्रेसला नाकारणाऱ्या मतदारांनीच त्यांना पुन्हा सत्तेवर बसविले. मतदारांनी केंद्रात बहुमतासह सरकार स्थापन करून सद‌्सद‌्विवेकबुद्धीचा पुरेपूर प्रत्यय दाखविला. भारतीय जनता मोठ्या प्रमाणात अशिक्षित आणि अर्धपोटी असली तरी तिने देशाच्या राष्ट्रहितासाठी जागृतपणे मतदान करून भारतीय लोकशाहीला बळकट केले आहे. १९७७ ते १९८० च्या दरम्यानचा हा मतदारांनी घडविलेला हा चमत्कार म्हणजे त्यांचा जाणतेपणा, परिपक्वपणा होता.

भारताने पावणे तीन वर्षांच्या अथक अभ्यासू, विचारमंथन आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचारधारेच्या जोरावर २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना स्वीकारली. राज्यघटनेतील तरतुदीनुसार लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींमधून आकाराला आलेल्या लोकसभागृहातून सरकार स्थापन करण्याची रचना निश्चित झाली. या राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्याने डिसेंबर १९५१ ते मार्च १९५२ दरम्यान साडेतीन महिन्यांत लोकसभेची पहिली निवडणूक झाली. लोकसभेच्या आजवर झालेल्या १७ निवडणुकांपैकी चार मुदतपूर्व झाल्या. पहिल्या निवडणुकीत १० कोटी मतदार होते. २०१९च्या निवडणुकीत ९१ कोटी २० लाख ५० हजार ५७८ मतदार होते. 

७ निवडणुकांमध्ये एकाही पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि आघाड्यांचे सरकार स्थापन झाले. त्यापैकी काँग्रेसने तीन, जनता दलाने दोन, तर भाजपने दोनवेळा आघाडी सरकार स्थापन केले.

आतापर्यंत १७ निवडणुका १० वेळा भारतीय मतदारांनी एका पक्षाला बहुमताने निवडून दिले. 

एकाच पक्षाला बहुमत कितीवेळा७ वेळा काँग्रेस१ वेळा जनता पक्ष२ वेळा भाजप 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन