शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

Independence Day 2021 : राजे आपण आहात, म्हणून लोकशाही सुरक्षित

By वसंत भोसले | Updated: August 15, 2021 09:28 IST

Celebrating Happy Independence Day 2021: भारताने पावणे तीन वर्षांच्या अथक अभ्यासू, विचारमंथन आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचारधारेच्या जोरावर २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना स्वीकारली.

- वसंत भोसले

भारतीय मतदारांनी नेहमी देशाची अखंडता, कणखर नेतृत्व आदींची पाठराखण केली. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करताच प्रचंड मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहिले. त्याच्या रेट्यामुळे इंदिराजींना आणीबाणी मागे घेऊन निवडणुका जाहीर कराव्या लागल्या. मार्च १९७७ मध्ये झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसचा पराभव केला आणि जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. सरकारातील मतभेदांमुळे केवळ पावणे तीन वर्षांत देशात प्रथमच मध्यावधी निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी, तसेच काँग्रेसला नाकारणाऱ्या मतदारांनीच त्यांना पुन्हा सत्तेवर बसविले. मतदारांनी केंद्रात बहुमतासह सरकार स्थापन करून सद‌्सद‌्विवेकबुद्धीचा पुरेपूर प्रत्यय दाखविला. भारतीय जनता मोठ्या प्रमाणात अशिक्षित आणि अर्धपोटी असली तरी तिने देशाच्या राष्ट्रहितासाठी जागृतपणे मतदान करून भारतीय लोकशाहीला बळकट केले आहे. १९७७ ते १९८० च्या दरम्यानचा हा मतदारांनी घडविलेला हा चमत्कार म्हणजे त्यांचा जाणतेपणा, परिपक्वपणा होता.

भारताने पावणे तीन वर्षांच्या अथक अभ्यासू, विचारमंथन आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचारधारेच्या जोरावर २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना स्वीकारली. राज्यघटनेतील तरतुदीनुसार लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींमधून आकाराला आलेल्या लोकसभागृहातून सरकार स्थापन करण्याची रचना निश्चित झाली. या राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्याने डिसेंबर १९५१ ते मार्च १९५२ दरम्यान साडेतीन महिन्यांत लोकसभेची पहिली निवडणूक झाली. लोकसभेच्या आजवर झालेल्या १७ निवडणुकांपैकी चार मुदतपूर्व झाल्या. पहिल्या निवडणुकीत १० कोटी मतदार होते. २०१९च्या निवडणुकीत ९१ कोटी २० लाख ५० हजार ५७८ मतदार होते. 

७ निवडणुकांमध्ये एकाही पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि आघाड्यांचे सरकार स्थापन झाले. त्यापैकी काँग्रेसने तीन, जनता दलाने दोन, तर भाजपने दोनवेळा आघाडी सरकार स्थापन केले.

आतापर्यंत १७ निवडणुका १० वेळा भारतीय मतदारांनी एका पक्षाला बहुमताने निवडून दिले. 

एकाच पक्षाला बहुमत कितीवेळा७ वेळा काँग्रेस१ वेळा जनता पक्ष२ वेळा भाजप 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन