शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

घटनाबाह्य आरक्षण

By admin | Updated: December 9, 2015 23:41 IST

कोणे एकेकाळी ‘जातीसाठी माती खाऊ’ असे म्हणणारे आणि आपल्या तथाकथित उच्चवर्णीय जातीचा वृथा अभिमान बाळगणारे समाजघटकही अलीकडच्या काळात स्वत:स मागास म्हणवून घेऊ लागले

कोणे एकेकाळी ‘जातीसाठी माती खाऊ’ असे म्हणणारे आणि आपल्या तथाकथित उच्चवर्णीय जातीचा वृथा अभिमान बाळगणारे समाजघटकही अलीकडच्या काळात स्वत:स मागास म्हणवून घेऊ लागले आहेत आणि मागासवर्गीयांसाठी असलेल्या सवलती आणि विशेषत: आरक्षणाच्या सवलतीत वाटा मागू लागले आहेत. अर्थात लोकशाहीने साऱ्यांनाच अभिव्यक्त होण्याचा अधिकार दिलेला असल्याने त्यांच्या अशा मागणी करण्याला कोणी आक्षेप घेऊ शकत नाही व आक्षेप घेण्याचे कारणही नाही. राज्यघटनेने समाजातील मागास वर्गाची स्पष्ट विगतवारीच दिली असून जातीनिहाय मागासलेपण हा या विगतवारीचा आधार आहे. त्यामुळे राज्यघटनेत ज्या जाती वा वर्गाला आरक्षण देण्याची मुभा आहे त्यांना ते जरुर मिळेल. परंतु मूळ घटनेमध्येच मागासलेपण ठरविण्याचा निकष हा जन्मावर आधारलेला असून आर्थिक निकषाला वा विद्यमान व्यवसायाला तिथे थारा नाही. असे असताना राष्ट्रीय अन्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व्ही. ईश्वरय्या यांनी तथाकथित पुढारलेल्या जातींमध्ये जन्मास आलेल्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या परंतु परंपरागतरीत्या जो व्यवसाय अन्य मागास जाती करीत होत्या, तो करणाऱ्यांना अन्य मागासांच्या सवलती देण्याचे म्हणे मान्य केले आहे. मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर पुढारलेल्या जातींमधील युवकांमध्ये जे नैराश्य आणि वैफल्य आले आहे त्यांना दिलासा म्हणून आपण हे करु इच्छितो असेही त्यांनी म्हटले आहे. मुळात अन्य मागासवर्गीय आयोगाला आणि त्याच्या अध्यक्षाला असा जाती विस्तार करण्याचा अधिकारच नाही. त्यातून आरक्षणासाठी आर्थिक मागासलेपण या निकषाला राज्यघटनेची मान्यता नाही. तसेच धार्मिक आधारवरदेखील आरक्षणाची तरतूद नाही. त्यामुळे मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याची मागणी मान्य केली जाऊ शकत नाही. घटनेने ज्या जातींचा मागास या श्रेणीत समावेश केला आहे त्यांनाच केवळ आरक्षण मिळू शकत असल्याने महाराष्ट्रातील मराठा समाज व गुजरातेतील पाटीदार समाज यांची मागास वर्गात जाण्याची आणि मुळात मागास असताना त्या मागासलेपणाची श्रेणी बदलून घेण्याची (धनगर, जाट आदि) काही वर्गांची मागणी मान्य करण्यात सरकारला अडचणी येत आहेत.