शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकांमध्ये तिसऱ्या आघाडीतही बिघाडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 13:03 IST

भाजपला धोबीपछाड देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी आपल्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन भाजपला एकास एक अशी लढत द्यावी, अशी काॅंग्रेसची इच्छा आहे. त्यासाठीची पावलं टाकण्यास काँग्रेसनं सुरुवात केली आहे.

लोकसभा निवडणुकीला जेमतेम वर्षभराचा अवकाश असताना, देशात विरोधी ऐक्याचा प्रवास एकास एक लढतीपासून तिसऱ्या आघाडीच्या दिशेने सुरू झाला आहे आणि तो तिथेच न थांबता चौथ्या आघाडीपर्यंतही जाऊन ठेपण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भारतीय जनता पक्षाने २०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर बहुमत मिळविल्याच्या पार्श्वभूमीवर, सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची चर्चा काही काळापूर्वी जोरात सुरू झाली होती; परंतु ती फारच लवकर विरली. आता भाजप व काॅंग्रेस या दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांपासून अंतर राखणाऱ्या तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे; पण त्या संदर्भातही एकवाक्यता नाही. भाजपला धोबीपछाड देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी आपल्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन भाजपला एकास एक अशी लढत द्यावी, अशी काॅंग्रेसची इच्छा आहे. त्यासाठीची पावलं टाकण्यास काँग्रेसनं सुरुवात केली आहे.

काँग्रेसच्या छत्राखालील या आघाडीला द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल इत्यादी प्रादेशिक पक्षांची काही हरकत नाही; पण ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल इत्यादी प्रादेशिक नेत्यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांमुळे काॅंग्रेसची ती इच्छा फलद्रुप होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांची कोलकात्यात बैठक झाली आणि काॅंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांपासून समान अंतर राखण्यावर त्यांचे एकमत झाले. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी नवीन पटनायक यांची भेट घेतली, तर शुक्रवारी त्या एच. डी. कुमारस्वामी यांना भेटणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अरविंद केजरीवाल यांनीही गैर भाजप, गैर काॅंग्रेस विरोधी ऐक्य घडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी सात मुख्यमंत्र्यांना १८ मार्चला दिल्लीत आमंत्रित केले होते; परंतु, त्यांना अपेक्षेपेक्षा अतिशय थंड प्रतिसाद मिळाला. केजरीवाल यांच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेले के. चंद्रशेखर राव हे स्वत:च गत काही काळापासून विरोधी ऐक्यासाठी प्रयत्नशील आहेत.

विशेष म्हणजे राव यांनी जानेवारीत विरोधी नेत्यांना हैदराबादेत आमंत्रित केले होते, तेव्हा केजरीवाल उपस्थित राहिले होते. त्यावेळीही बऱ्याच नेत्यांनी राव यांच्यापासून अंतर राखले होते. थोडक्यात काय, तर भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी विरोधी पक्षांचे ऐक्य गरजेचे आहे, यावर सर्व विरोधी नेत्यांचे एकमत आहे; पण कुणाच्या नेतृत्वाखाली एकत्र यायचे हा मुद्दा आला की, सगळ्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना फिरतात. त्यामुळेच आघाडीच्या या प्रयत्नांना अजून तरी ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. काॅंग्रेसशिवाय विरोधी ऐक्याला अर्थ नाही आणि भाजपसोबतच काॅंग्रेसपासूनही अंतर राखायला हवे, असे दोन मतप्रवाह तर आहेतच; परंतु भाजप व काॅंग्रेस दोघांनाही वेगळे ठेवण्यावर एकमत असलेल्या नेत्यांमध्येही एकवाक्यता नाही! ही सगळी परिस्थिती विचारात घेता, लोकसभा निवडणुकीत दुरंगी तर सोडाच, तिरंगी लढती होण्याची शक्यताही किमान सध्याच्या घडीला तरी धूसर वाटू लागली आहे. तसाही देशातील विरोधी ऐक्याचा इतिहास फारसा उत्साहवर्धक नाही.

सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एकास एक लढत हा प्रयोग तर केवळ एकदाच १९७७ मध्ये जनता पक्षाच्या रूपाने झाला आणि त्याला प्रचंड यश लाभूनही वैयक्तिक महत्त्वाकांक्षांपोटी अडीच वर्षांतच संपुष्टातही आला. पुढे १९८९च्या निवडणुकीत ‘नॅशनल फ्रंट’ नावाने तिसऱ्या आघाडीचा प्रयोग झाला आणि त्यातून सत्तेची वाट सुकर होऊनही दोन वर्षांतच फसला. त्यानंतर १९९६मध्ये पुन्हा ‘युनायटेड फ्रंट’ नावाने तिसऱ्या आघाडीचा प्रयोग झाला आणि दोनच वर्षांत देशाला दोन पंतप्रधान देऊन संपला! पुढे २००७ ते २००९ या कालावधीत युनायटेड नॅशनल प्रोग्रेसिव्ह अलायन्स आणि २००९च्या लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील तिसरी आघाडी असे आणखी दोन प्रयोग झाले; परंतु त्यांना फारसे यश मिळू शकले नाही. आतापर्यंत तिसऱ्या आघाडीचे दोन प्रयोग यशस्वी झाले आणि त्यापैकी एकदा भाजपच्या, तर एकदा काॅंग्रेसच्या पाठिंब्यावर आघाडीला सत्तेपर्यंत पोहोचता आले; परंतु एकदाही आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. बहुधा त्यामुळेच की काय, जनतेने गत दोन लोकसभा निवडणुकीत एकाच पक्षाला पूर्ण बहुमत दिले. आता पुन्हा एकदा तिसऱ्या अन् चौथ्याही आघाडीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यांचे काय होते, हे लवकरच कळेल!

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूक