शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकांमध्ये तिसऱ्या आघाडीतही बिघाडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 13:03 IST

भाजपला धोबीपछाड देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी आपल्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन भाजपला एकास एक अशी लढत द्यावी, अशी काॅंग्रेसची इच्छा आहे. त्यासाठीची पावलं टाकण्यास काँग्रेसनं सुरुवात केली आहे.

लोकसभा निवडणुकीला जेमतेम वर्षभराचा अवकाश असताना, देशात विरोधी ऐक्याचा प्रवास एकास एक लढतीपासून तिसऱ्या आघाडीच्या दिशेने सुरू झाला आहे आणि तो तिथेच न थांबता चौथ्या आघाडीपर्यंतही जाऊन ठेपण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भारतीय जनता पक्षाने २०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर बहुमत मिळविल्याच्या पार्श्वभूमीवर, सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची चर्चा काही काळापूर्वी जोरात सुरू झाली होती; परंतु ती फारच लवकर विरली. आता भाजप व काॅंग्रेस या दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांपासून अंतर राखणाऱ्या तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे; पण त्या संदर्भातही एकवाक्यता नाही. भाजपला धोबीपछाड देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी आपल्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन भाजपला एकास एक अशी लढत द्यावी, अशी काॅंग्रेसची इच्छा आहे. त्यासाठीची पावलं टाकण्यास काँग्रेसनं सुरुवात केली आहे.

काँग्रेसच्या छत्राखालील या आघाडीला द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल इत्यादी प्रादेशिक पक्षांची काही हरकत नाही; पण ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल इत्यादी प्रादेशिक नेत्यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांमुळे काॅंग्रेसची ती इच्छा फलद्रुप होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांची कोलकात्यात बैठक झाली आणि काॅंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांपासून समान अंतर राखण्यावर त्यांचे एकमत झाले. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी नवीन पटनायक यांची भेट घेतली, तर शुक्रवारी त्या एच. डी. कुमारस्वामी यांना भेटणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अरविंद केजरीवाल यांनीही गैर भाजप, गैर काॅंग्रेस विरोधी ऐक्य घडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी सात मुख्यमंत्र्यांना १८ मार्चला दिल्लीत आमंत्रित केले होते; परंतु, त्यांना अपेक्षेपेक्षा अतिशय थंड प्रतिसाद मिळाला. केजरीवाल यांच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेले के. चंद्रशेखर राव हे स्वत:च गत काही काळापासून विरोधी ऐक्यासाठी प्रयत्नशील आहेत.

विशेष म्हणजे राव यांनी जानेवारीत विरोधी नेत्यांना हैदराबादेत आमंत्रित केले होते, तेव्हा केजरीवाल उपस्थित राहिले होते. त्यावेळीही बऱ्याच नेत्यांनी राव यांच्यापासून अंतर राखले होते. थोडक्यात काय, तर भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी विरोधी पक्षांचे ऐक्य गरजेचे आहे, यावर सर्व विरोधी नेत्यांचे एकमत आहे; पण कुणाच्या नेतृत्वाखाली एकत्र यायचे हा मुद्दा आला की, सगळ्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना फिरतात. त्यामुळेच आघाडीच्या या प्रयत्नांना अजून तरी ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. काॅंग्रेसशिवाय विरोधी ऐक्याला अर्थ नाही आणि भाजपसोबतच काॅंग्रेसपासूनही अंतर राखायला हवे, असे दोन मतप्रवाह तर आहेतच; परंतु भाजप व काॅंग्रेस दोघांनाही वेगळे ठेवण्यावर एकमत असलेल्या नेत्यांमध्येही एकवाक्यता नाही! ही सगळी परिस्थिती विचारात घेता, लोकसभा निवडणुकीत दुरंगी तर सोडाच, तिरंगी लढती होण्याची शक्यताही किमान सध्याच्या घडीला तरी धूसर वाटू लागली आहे. तसाही देशातील विरोधी ऐक्याचा इतिहास फारसा उत्साहवर्धक नाही.

सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एकास एक लढत हा प्रयोग तर केवळ एकदाच १९७७ मध्ये जनता पक्षाच्या रूपाने झाला आणि त्याला प्रचंड यश लाभूनही वैयक्तिक महत्त्वाकांक्षांपोटी अडीच वर्षांतच संपुष्टातही आला. पुढे १९८९च्या निवडणुकीत ‘नॅशनल फ्रंट’ नावाने तिसऱ्या आघाडीचा प्रयोग झाला आणि त्यातून सत्तेची वाट सुकर होऊनही दोन वर्षांतच फसला. त्यानंतर १९९६मध्ये पुन्हा ‘युनायटेड फ्रंट’ नावाने तिसऱ्या आघाडीचा प्रयोग झाला आणि दोनच वर्षांत देशाला दोन पंतप्रधान देऊन संपला! पुढे २००७ ते २००९ या कालावधीत युनायटेड नॅशनल प्रोग्रेसिव्ह अलायन्स आणि २००९च्या लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील तिसरी आघाडी असे आणखी दोन प्रयोग झाले; परंतु त्यांना फारसे यश मिळू शकले नाही. आतापर्यंत तिसऱ्या आघाडीचे दोन प्रयोग यशस्वी झाले आणि त्यापैकी एकदा भाजपच्या, तर एकदा काॅंग्रेसच्या पाठिंब्यावर आघाडीला सत्तेपर्यंत पोहोचता आले; परंतु एकदाही आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. बहुधा त्यामुळेच की काय, जनतेने गत दोन लोकसभा निवडणुकीत एकाच पक्षाला पूर्ण बहुमत दिले. आता पुन्हा एकदा तिसऱ्या अन् चौथ्याही आघाडीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यांचे काय होते, हे लवकरच कळेल!

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूक