शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भोंगे व प्रतिभोंगे वाजतच राहणार, ध्वनिप्रदूषण कमी होण्याऐवजी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 05:24 IST

सोमवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन या मुद्द्यावर चर्चा घडवून आणली. अपेक्षेनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला नव्हते. हा मुद्दा ज्यांनी पेटविला, त्या राज ठाकरे यांनी आपले प्रतिनिधी पाठवून दिले.

महाराष्ट्रातील शेती, रोजगार, पाणी, वीज, महागाईचे वगैरे बाकी सगळे प्रश्न जणू संपले आहेत आणि सकाळी-संध्याकाळी मशिदींमधून भाेंग्यांवर पढली जाणारी नमाज, त्यामुळे लोकांची होणारी झोपमोड, ध्वनिप्रदूषण, त्यावरचे आक्षेप, प्रतिभोंगे लावून हनुमान चालिसा पठणाचा इशारा, त्यातून धार्मिक तणाव हीच एक समस्या शिल्लक आहे. गेल्या जवळपास महिनाभरातील गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती ते आठवडाभरावर आलेली रमजान ईद व अक्षय्य तृतीयेचे सण ज्या पद्धतीने साजरे होताहेत ते पाहता तरी असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पाडवा मेळाव्यात मशिदीवरच्या भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यापासून महिनाभर महाराष्ट्रात राजकीय भोंग्यांचा दणदणाट सुरू आहे.

शिवाजी पार्कवरच्या पाडवा मेळाव्यानंतरही काही प्रश्न अनुत्तरित राहिल्यामुळे राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तर सभा घेऊन भूमिका आणखी स्पष्ट व ताठर केली. पुढच्या मंगळवारी, ३ मे रोजी रमजान ईद व अक्षय्य तृतिया असल्याने तोपर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवले गेले नाहीत तर मनसैनिक मशिदींसमोर प्रतिभोंगे लावून हनुमान चालिसा पठण करतील, असा इशारा त्यांनी दिला. हे सारे वरवर धार्मिक दिसत असले तरी ते तसे नाही. हा प्रश्न धार्मिक नव्हे तर सामाजिक आहे, ध्वनिप्रदूषणाचा आहे, हे कितीही पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरीही महाविकास आघाडी सरकारमधल्या तिन्ही घटकपक्षांच्या नेत्यांनी राज ठाकरे हे सारे भाजपच्या इशाऱ्यावर करीत असल्याचा प्रत्यारोप करीत आहेत. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यामुळे तणावाचे वातावरण कमी होते की, काय म्हणून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व बडनेऱ्याचे आमदार रवी राणा या पती-पत्नींनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानापुढे हनुमान चालिसा पठण करण्याच्या स्टंटसाठी मुंबई गाठली.

या दाम्पत्याची स्टंटबाजी भाजपच्या नेत्यांना हवीच आहे, फक्त त्यांना पुढे येऊन राज ठाकरे यांचे समर्थन करायचे नाही. या पृष्ठभूमीवर, सोमवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन या मुद्द्यावर चर्चा घडवून आणली. अपेक्षेनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला नव्हते. हा मुद्दा ज्यांनी पेटविला, त्या राज ठाकरे यांनी आपले प्रतिनिधी पाठवून दिले. राणा दाम्पत्यावर राज्य सरकारने केलेले अत्याचार म्हणजे हिटलरशाही असल्याचा आरोप करीत विधानसभेचे विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप या बैठकीवर बहिष्कार घालत असल्याचे जाहीर केले. परिणामी या बैठकीत होणाऱ्या चर्चेचा व निर्णयाचा संभाव्य आंदोलनावर काहीही फरक पडणार नाही, हे स्पष्टच झाले होते. तरीदेखील गृहमंत्री वळसे पाटील व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठकीनंतर मांडलेल्या मुद्यांवर गंभीरपणे विचार व्हायला हवा. मुळात मशिदी किंवा इतर प्रार्थनास्थळांवरील ध्वनिवर्धकांचा व पोलिसांचा तसा थेट संबंध नाही.

यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व त्यावर आधारित केंद्र सरकारच्या सूचना मुख्यत्वे ध्वनिप्रदूषणाशी, पर्यावरणाशी संबंधित आहेत. रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत देशात कुठेही भोंगे वाजणार नाहीत, हा या सूचनांचा गाभा आहे. सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत वाजणाऱ्या भोंग्यांचा आवाज किती असावा हे शहरे व गावांमधील परिस्थितीवर अवलंबून आहे. इस्पितळे, शाळांच्या परिसरात तो आवाज कमी असावा, असे निर्देश आहेत. तेव्हा, सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत ध्वनिवर्धक पूर्णपणे बंद करता येणार नाहीत, हे गृहमंत्र्यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. रात्रीच्या वेळेचा आवाज केंद्र सरकारने घालून दिलेल्या मर्यादेत आहे की, नाही हे, पोलीस पाहत आहेत. याउपरही काही बंदी वगैरे आणायची असेल, काही राजकीय पक्षांना ती आणावी वाटत असेल तर केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठीच निर्णय घ्यावा, असे महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे.

थोडक्यात, राज्य सरकारने राज ठाकरे व प्रभूतींनी महाविकास आघाडीच्या दिशेने वळविलेले भोंग्याचे तोंड गृहमंत्री व पर्यावरणमंत्र्यांनी दिल्लीच्या दिशेने वळविले आहे. मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न समाधानकारक मानून राज ठाकरे त्यांचा ३ मे रोजीचा इशारा मागे घेणार नाहीत, हे मनसेच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे किंवा गेला बाजार भारतीय जनता पक्ष अथवा नवनीत राणा, रवी राणा यांच्यासारखे राज्य सरकारविरुद्ध तुटून पडलेले कुंपणावरील घटक यापुढेही सरकारचे काही ऐकण्याची शक्यता दिसत नाही. भोंगे व प्रतिभोंगे वाजतच राहणार, ध्वनिप्रदूषण कमी होण्याऐवजी वाढणार.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे