शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नेतृत्वाची आयात सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 04:22 IST

कोणत्याही प्रदेशाचा विकास सक्षम नेतृत्वावरच अवलंबून असतो. जेव्हा एखादा प्रदेश नेतृत्वविहीन होतो, तेव्हा त्या प्रदेशाची सर्वच बाबतीत अधोगती होते

कोणत्याही प्रदेशाचा विकास सक्षम नेतृत्वावरच अवलंबून असतो. जेव्हा एखादा प्रदेश नेतृत्वविहीन होतो, तेव्हा त्या प्रदेशाची सर्वच बाबतीत अधोगती होते. पश्चिम विदर्भाला ही बाब तंतोतंत लागू पडते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक ही काका-पुतण्यांची जोडी वगळली, तर खऱ्या अर्थाने राज्यव्यापी म्हणता येईल, असे नेतृत्व पश्चिम विदर्भात बहरलेच नाही. प्रतिभाताई पाटील यांनी थेट राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली खरी; पण त्या रुढार्थाने लोकनेत्या नव्हत्या, हेदेखील तेवढेच खरे! गत काही वर्षात तर पश्चिम विदर्भातील नेतृत्व खुरटतच गेले, असे खेदाने म्हणावे लागते. आज सर्वच राजकीय पक्षांमधील पश्चिम विदर्भातील नेते आपापल्या जिल्ह्यांपुरते, मतदारसंघांपुरतेच मर्यादित आहेत, ही वस्तुस्थिती आहे. राजकीय नेतृत्वाच्या अधोगतीसोबतच, विकासाच्या बाबतीतही पश्चिम विदर्भाची अधोगती होत गेली. आज विकासाच्या कोणत्याही निकषावर पश्चिम विदर्भ राज्याच्या इतर कोणत्याही भागाच्या तुलनेत प्रचंड माघारला आहे. सक्षम व दमदार नेतृत्वाअभावी पश्चिम विदर्भाचा आवाज राज्याच्या आणि देशाच्या राजधानीत उमटत नाही, हेच त्यामागचे कारण आहे. नेतृत्वाची ही पोकळी भरून काढण्यासाठी हल्ली पश्चिम विदर्भात नेतृत्वाचीही आयात सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे झारखंडमधील नेते यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात येऊन शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांच्या आंदोलनाचे फलित काय, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात घर करून असतानाच, कालपरवा गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांनीही अकोल्यात पायधूळ झाडली. यशवंत सिन्हा आणि हार्दिक पटेल हे दोघेही राष्ट्रीय चेहरे आहेत. दोघांचीही गृह राज्ये पश्चिम विदर्भापासून दूर आहेत. या प्रदेशाशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते या भागात राजकीय अवकाश शोधत आहेत, असेही नाही. असे असतानाही महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही भागात न जाता, ते पश्चिम विदर्भातच का पायधूळ झाडतात? या भागात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळीच त्यासाठी कारणीभूत म्हणावी लागेल. स्थानिक नेतृत्वाच्या क्षमतेवरील विश्वास उडाल्याने, काही स्थानिक मंडळीच बाहेरील नेत्यांना निमंत्रण देत आहे. आपल्या भागातील मुद्दे चव्हाट्यावर आणण्यासाठी, आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी जर बाहेरून नेतृत्वाची आयात करावी लागत असेल, तर सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाºया विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही आत्मपरीक्षण करायला हवे!