शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नेतृत्वाची आयात सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 04:22 IST

कोणत्याही प्रदेशाचा विकास सक्षम नेतृत्वावरच अवलंबून असतो. जेव्हा एखादा प्रदेश नेतृत्वविहीन होतो, तेव्हा त्या प्रदेशाची सर्वच बाबतीत अधोगती होते

कोणत्याही प्रदेशाचा विकास सक्षम नेतृत्वावरच अवलंबून असतो. जेव्हा एखादा प्रदेश नेतृत्वविहीन होतो, तेव्हा त्या प्रदेशाची सर्वच बाबतीत अधोगती होते. पश्चिम विदर्भाला ही बाब तंतोतंत लागू पडते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक ही काका-पुतण्यांची जोडी वगळली, तर खऱ्या अर्थाने राज्यव्यापी म्हणता येईल, असे नेतृत्व पश्चिम विदर्भात बहरलेच नाही. प्रतिभाताई पाटील यांनी थेट राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली खरी; पण त्या रुढार्थाने लोकनेत्या नव्हत्या, हेदेखील तेवढेच खरे! गत काही वर्षात तर पश्चिम विदर्भातील नेतृत्व खुरटतच गेले, असे खेदाने म्हणावे लागते. आज सर्वच राजकीय पक्षांमधील पश्चिम विदर्भातील नेते आपापल्या जिल्ह्यांपुरते, मतदारसंघांपुरतेच मर्यादित आहेत, ही वस्तुस्थिती आहे. राजकीय नेतृत्वाच्या अधोगतीसोबतच, विकासाच्या बाबतीतही पश्चिम विदर्भाची अधोगती होत गेली. आज विकासाच्या कोणत्याही निकषावर पश्चिम विदर्भ राज्याच्या इतर कोणत्याही भागाच्या तुलनेत प्रचंड माघारला आहे. सक्षम व दमदार नेतृत्वाअभावी पश्चिम विदर्भाचा आवाज राज्याच्या आणि देशाच्या राजधानीत उमटत नाही, हेच त्यामागचे कारण आहे. नेतृत्वाची ही पोकळी भरून काढण्यासाठी हल्ली पश्चिम विदर्भात नेतृत्वाचीही आयात सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे झारखंडमधील नेते यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात येऊन शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांच्या आंदोलनाचे फलित काय, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात घर करून असतानाच, कालपरवा गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांनीही अकोल्यात पायधूळ झाडली. यशवंत सिन्हा आणि हार्दिक पटेल हे दोघेही राष्ट्रीय चेहरे आहेत. दोघांचीही गृह राज्ये पश्चिम विदर्भापासून दूर आहेत. या प्रदेशाशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते या भागात राजकीय अवकाश शोधत आहेत, असेही नाही. असे असतानाही महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही भागात न जाता, ते पश्चिम विदर्भातच का पायधूळ झाडतात? या भागात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळीच त्यासाठी कारणीभूत म्हणावी लागेल. स्थानिक नेतृत्वाच्या क्षमतेवरील विश्वास उडाल्याने, काही स्थानिक मंडळीच बाहेरील नेत्यांना निमंत्रण देत आहे. आपल्या भागातील मुद्दे चव्हाट्यावर आणण्यासाठी, आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी जर बाहेरून नेतृत्वाची आयात करावी लागत असेल, तर सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाºया विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही आत्मपरीक्षण करायला हवे!