शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

नेतृत्वाची आयात सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 04:22 IST

कोणत्याही प्रदेशाचा विकास सक्षम नेतृत्वावरच अवलंबून असतो. जेव्हा एखादा प्रदेश नेतृत्वविहीन होतो, तेव्हा त्या प्रदेशाची सर्वच बाबतीत अधोगती होते

कोणत्याही प्रदेशाचा विकास सक्षम नेतृत्वावरच अवलंबून असतो. जेव्हा एखादा प्रदेश नेतृत्वविहीन होतो, तेव्हा त्या प्रदेशाची सर्वच बाबतीत अधोगती होते. पश्चिम विदर्भाला ही बाब तंतोतंत लागू पडते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक ही काका-पुतण्यांची जोडी वगळली, तर खऱ्या अर्थाने राज्यव्यापी म्हणता येईल, असे नेतृत्व पश्चिम विदर्भात बहरलेच नाही. प्रतिभाताई पाटील यांनी थेट राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली खरी; पण त्या रुढार्थाने लोकनेत्या नव्हत्या, हेदेखील तेवढेच खरे! गत काही वर्षात तर पश्चिम विदर्भातील नेतृत्व खुरटतच गेले, असे खेदाने म्हणावे लागते. आज सर्वच राजकीय पक्षांमधील पश्चिम विदर्भातील नेते आपापल्या जिल्ह्यांपुरते, मतदारसंघांपुरतेच मर्यादित आहेत, ही वस्तुस्थिती आहे. राजकीय नेतृत्वाच्या अधोगतीसोबतच, विकासाच्या बाबतीतही पश्चिम विदर्भाची अधोगती होत गेली. आज विकासाच्या कोणत्याही निकषावर पश्चिम विदर्भ राज्याच्या इतर कोणत्याही भागाच्या तुलनेत प्रचंड माघारला आहे. सक्षम व दमदार नेतृत्वाअभावी पश्चिम विदर्भाचा आवाज राज्याच्या आणि देशाच्या राजधानीत उमटत नाही, हेच त्यामागचे कारण आहे. नेतृत्वाची ही पोकळी भरून काढण्यासाठी हल्ली पश्चिम विदर्भात नेतृत्वाचीही आयात सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे झारखंडमधील नेते यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात येऊन शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांच्या आंदोलनाचे फलित काय, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात घर करून असतानाच, कालपरवा गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांनीही अकोल्यात पायधूळ झाडली. यशवंत सिन्हा आणि हार्दिक पटेल हे दोघेही राष्ट्रीय चेहरे आहेत. दोघांचीही गृह राज्ये पश्चिम विदर्भापासून दूर आहेत. या प्रदेशाशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते या भागात राजकीय अवकाश शोधत आहेत, असेही नाही. असे असतानाही महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही भागात न जाता, ते पश्चिम विदर्भातच का पायधूळ झाडतात? या भागात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळीच त्यासाठी कारणीभूत म्हणावी लागेल. स्थानिक नेतृत्वाच्या क्षमतेवरील विश्वास उडाल्याने, काही स्थानिक मंडळीच बाहेरील नेत्यांना निमंत्रण देत आहे. आपल्या भागातील मुद्दे चव्हाट्यावर आणण्यासाठी, आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी जर बाहेरून नेतृत्वाची आयात करावी लागत असेल, तर सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाºया विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही आत्मपरीक्षण करायला हवे!