शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

यंत्राधीनं जगत सर्वम!

By admin | Updated: November 3, 2016 04:58 IST

‘मंत्राधीनं जगत सर्वम’ असे म्हणणारे आणि तद्नुसार मंत्रसामर्थ्य जपणारे प्रज्ञावान ऋषी या देशात जन्मास आले़

‘मंत्राधीनं जगत सर्वम’ असे म्हणणारे आणि तद्नुसार मंत्रसामर्थ्य जपणारे प्रज्ञावान ऋषी या देशात जन्मास आले़ त्यांची नावे आणि कर्तृत्व अभ्यासायचे तर सिद्धेश्वरशास्त्री चित्रावांचा प्राचीन चरित्रकोश केवळ चाळला तरी कल्पना येऊ शकते़ विज्ञान उत्तरोत्तर प्रगत होत चालले आणि मंत्रांना अवकळा प्राप्त झाली असे मानव समजू लागला़ दैनंदिन जीवनात मंत्रापेक्षा यंत्र आपले जिणे सुखकर करते़ कंबर भरून येईल, हाताचे सांधे दुखतील मग रहाटाने विहिरीचे पाणी का काढावे? रहाट गेला तो कायमचा़ मोट गेली आणि मोटेवरचे गाणेही गेले़ मिक्सर आला तसे जाते गेले आणि जात्यावरची ओवी लुप्त झाली़ साप कात टाकतो हे ज्ञात होते आता तर काळानेच कात टाकली आहे़ यंत्र नावाच्या नव्या मनूने ‘कोण मला वठणीवर आणू शकतो तो मी पाहे’ असे आव्हानच दिले़ नव्या दमाचे बदल आमच्या पिढीने पाहिले आणि मनाला सावरत पचविले देखील़ कारण बदलांची तक्रार करण्यापेक्षा जमणे महत्त्वाचे होते़ आमच्या बालपणी शेती हिरवीगार होती आणि पोळा सण घरच्या मुलाचे लग्न काढावे एवढ्या थाटात शेतकरी साजरा करत होता़ त्या काळी तिन्हीसांज होत होती आणि रातकिडे किरकिरत होते़ घरची कारभारीण वाड्याच्या उंबऱ्यावर येऊन नवऱ्याची वाट पाहताना म्हणायची़,अजुनी कसे येती ना परधान्या राजा किरकिरती रातकिडेझाल्या तिन्हीसांजा प्रधान आणि राजा ही बैलांची नावे होती़ यंत्रांनी सगळं बुडीत खात्यात घातलं बघा़ शेतकरीण सांगत होती,‘पयलं काय बी रायलं नाय बघा़’ यंत्रांनी सगळंच ताब्यात घेतलंय़ चैतन्याचे दिवस संपले आणि अचेतनाचे महत्त्व वाढले़ माणूस माणसाला पारखा असा आजचा काऴ जीवाची किंमत शून्य आणि निर्जीवाला दाम मोजावा लागतो़ कुठले मन आणि कुठली बुद्धी़ मनाचे श्लोक गेले तसे मनाचे दिवसही संपले़ फ क्त यंत्राची मनमानी़ मन घेऊन जगणे फार अवघड होते़ जगणेच अवघड तर,‘मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रय:’ हे कसे आकलनात यावे़ माणसाला माणूस कळंना तर देव कसा कळावा?‘यावत् जीवं सुखं जीवेत्’ एवढंच या मनुष्यप्राण्याला कळते आहे़ चार्वाक सगळ्यांनाच आपलासा वाटतो़ ‘मनसस्तु पराबुद्धे यो बुद्धे परतस्तु स:’ मनाच्या पलीकडे बुद्धी आणि तो तर बुद्धीच्याही पलीकडे आहे़ तो समजून यायला मंत्रयुग लागते़ यंत्रयुगाचा उपयोग केवळ जगण्यासाठी़ पण ईश्वरालाच जर हे मंजूर आहे तेथे आपण काय रडणार? जय यंत्रयुग! जय यंत्र मानव!-डॉ.गोविंद काळे