शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

नव्या अर्थकोंडीचे सावट; आयएल अ‍ॅण्ड एफएस दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 04:17 IST

आयएल अ‍ॅण्ड एफएसकडे असलेल्या ९६००० कोटींपैकी २० सरकारी बँकांचे कर्ज ५८००० कोटी आहे. या बँकांचा मिळून एनपीए नऊ लाख कोटी असल्याचे जगजाहीर आहे.

बँकांचे ९६००० कोटी कर्ज थकवून गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अ‍ॅण्ड एफएस) ही सरकारी कंपनी आता दिवाळखोरीत जाणार काय, असा यक्षप्रश्न उभा झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला नॅशनल कंपनी लॉ अ‍ॅपेलेट ट्रायब्युनलने (एनसीएलएटी) बँकांना आयएल अ‍ॅण्ड एफएसकडे असलेले कर्ज एनपीए (थकीत कर्ज) म्हणून घोषित करण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे हा प्रश्न उभा झाला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने (एनसीएलटी) बँकांना आयएल अ‍ॅण्ड एफएसकडील कर्ज एनपीए घोषित करण्यास मनाई केली होती. आता ही बंदी एनसीएलएटीने उठवली आहे. पण त्याचवेळी बँकांवर आयएल अ‍ॅण्ड एफएसकडील कर्जवसुली करण्यास मनाई केली आहे.

आयएल अ‍ॅण्ड एफएसकडे असलेल्या ९६००० कोटींपैकी २० सरकारी बँकांचे कर्ज ५८००० कोटी आहे. या बँकांचा मिळून एनपीए नऊ लाख कोटी असल्याचे जगजाहीर आहे. या रकमेत अजून ५८००० कोटींची भर पडली तर सर्वच सरकारी बँका अडचणीत येतील म्हणून एनसीएलटीने बँकांना कर्ज एनपीए घोषित करण्यास मनाई केली होती. त्यावर बँकांनी अपील केले म्हणून आता एनसीएलएटीने ही बंदी उठवली आहे. त्यामुळे आता बँका एनसीएलटीमध्ये अर्ज करून आयएल अ‍ॅण्ड एफएसला दिवाळखोर घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात. या प्रक्रियेमध्ये कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त होऊन रेझोल्युशन प्रोफेशनल (सोप्या भाषेत वसुली अधिकारी किंवा अवसायक) नेमला जातो व तो १८० दिवसांत कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करतो.

यश आले तर ठीक नाहीतर, कंपनीला दिवाळखोर घोषित करून कंपनीची मालमत्ता लिलाव करून कर्जफेड केली जाते. आयएल अ‍ॅण्ड एफएसबाबत मात्र असे करणे योग्य होणार नाही. याचे कारण आयएल अ‍ॅण्ड एफएस बुडली तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थाच भूकंपग्रस्त होणार आहे व त्यामुळे लाखोंच्या नोकऱ्या रोजगार हिसकावले जाणार आहेत. आयएल अ‍ॅण्ड एफएस ही जरी एक कंपनी वरकरणी वाटत असली तरी आयएल अ‍ॅण्ड एफएसच्या जवळपास २६० उपकंपन्या आहेत व त्यामध्ये जवळपास ६०,००० कर्मचारी आणि लाखो मजूर कामावर आहेत. या उपकंपन्या देशभरात महामार्ग बांधणे, बंदरनिर्मिती, मेट्रो आणि मोनो रेल्वे प्रकल्प, रेल्वे आणि विमानतळ प्रकल्प, मालवाहतूक अशा विविध क्षेत्रांत सध्या काम करीत आहेत. या उपकंपन्यांनी स्थानिक पातळीवर अनेक छोट्या कंपन्यांना कंत्राटे दिली असून आयएल अ‍ॅण्ड एफएस बंद झाल्यानंतर अनेक छोट्या कंपन्या देशभर अडचणीत आल्या आहेत.

आयएल अ‍ॅण्ड एफएस बंद पडल्यामुळे हा धक्का बसला आहे तर आयएल अ‍ॅण्ड एफएसचे दिवाळे वाजल्यावर हजारो पायाभूत सोईसुविधा प्रकल्प अर्धवट राहतील, लाखो कर्मचारी व कामगार बेकार होतील. आयएल अ‍ॅण्ड एफएसवर अवलंबून असणा-या छोट्या कंपन्या, कंत्राटदार अक्षरश: रस्त्यावर येतील. त्यामुळे आयएल अ‍ॅण्ड एफएस बुडणे देशाला परवडणारे नाही. २०१० साली बी. रामलिंगराजू यांच्या नाकर्तेपणामुळे सत्यम् कॉम्प्युटर्स अशीच अडचणीत आली होती तेव्हा सरकारने टेक महिंद्रला तिचे अधिग्रहण करून कंपनी वाचवली होती. कंपनी अडचणीत आल्यानंतर सरकारने आॅक्टोबर २०१८ मध्ये संचालक मंडळ बरखास्त करून उदय कोटक यांच्या अध्यक्षतेत नवे संचालक मंडळ नेमले आहे.

परंतु आयएल अ‍ॅण्ड एफएसच्या दुर्दशेला माजी अध्यक्ष सुनील बिहारी माथूर, प्रबंध संचालक हरी शंकरन व उपप्रबंध संचालक अरुण के. साहा या सर्वांनी मिळून आयएल अ‍ॅण्ड एफएस अतिशय निष्काळजीपणे चालवली. त्यामुळे या सर्व मंडळीविरुद्ध सर्वप्रथम खटले दाखल करून घोटाळ्यातील त्यांची आर्थिक जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून याची वसुली होण्याची आवश्यकता आहे. उदय कोटक यांचे नवे संचालक मंडळ आयएल अ‍ॅण्ड एफएसला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. या स्थितीत त्यांच्या पाठीशी सरकारने सर्व शक्तीनिशी उभे राहण्याची गरज आहे.

टॅग्स :bankबँक