शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

मुंबई महानगर वाचवायचे असेल तर मिठागरे हवीतच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 07:49 IST

salt pans : मुंबई महानगरातील मिठागरांच्या जमिनी या संतुलनाचे काम करत आहेत. त्या सिमेंट-काँक्रीटच्या इमल्यांनी भरणे म्हणजे हे शहर बुडायला हातभार लावण्यासारखे आहे.

- रवींद्र मांजरेकर(शहर संपादक, मुंबई)

हवामान बदलाचे फटके सर्व बाजूंनी बसू लागले असले तरी त्यापासून आपण काहीही शिकायचे नाही, असे शहरांचे व्यवस्थापन करणाऱ्या नियोजन संस्थांनी मनापासून ठरवलेले आहे. निसर्गाच्या या फटकाऱ्यांची त्यांनी जरा जरी दखल घेतली असती तर पुन्हा मिठागरांच्या जागेवर परवडणारी घरे बांधण्याचा बृहत आराखडा तयार करण्याचा घाट घातला नसता. मुंबई महानगर प्रदेश नियामक प्राधिकरण ही मुंबई आणि महानगरालगतच्या परिसराचे नियोजन करण्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेतील नोकरशहा, बांधकाम व्यावसायिक यांना मिठागरांची मोकळी जागा सतत खुपत असते.

या जागेवर निरनिराळे उद्याेग करण्याचे यापूर्वीचे प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळलेले आहेत. आता पंतप्रधान आवास योजनेत घरे बांधण्यासाठी मिठागरांच्या जागेचा पर्याय योग्य असल्याचा शोध एमएमआरडीएला लागला. त्यात या जागेचा विकास करण्यासाठी २०१४ मध्ये सरकारने एमएमआरडीएचीच नियुक्ती केली. एमएमआरडीएने परवडणाऱ्या घरांसाठी या जागेवर बृहत आराखडा तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिठागरांच्या जागा किती, कुठे आहेत, सीआरझेडखाली किती जमीन जाते, बांधकामासाठी किती जागा उपलब्ध होईल, याचा अभ्यास केला जाणार आहे.

ही मिठागरे ताब्यात घ्यायची आणि त्यावर शहरातील सगळ्या झोपडपट्टीवासीयांना परवडणारी घरे बांधून द्यायची. म्हणजे शहरातील झोपड्यांच्या जागा मोकळ्या होतील, असा मनसुबा २००० सालापासून संबंधितांचा आहे. अधिकाऱ्यांच्या रीतसर बदल्या झाल्या, तरी या गोष्टीवर मात्र येणाऱ्या सर्व नवीन अधिकाऱ्यांचेही एकमत होते, हे विशेष. यूपीए सरकारच्या काळात राज्याने असा एक प्रस्ताव केंद्राला पाठवला होता. त्यावर पर्यावरणमंत्र्यांनी अजिबात दाद लागू दिली नाही. मग निर्णय घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची एक समिती नेमण्यात आली. त्यांच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहिले असते; परंतु २००५च्या पावसाने याच भागात हाहाकार उडवून दिल्याने, मिठागरे आणि तिवरे यांचे महत्त्व लक्षात आले. त्यातून तो प्रस्ताव मागे पडला.

वास्तविक, एमएमआरडीएने राबवलेल्या रेंटल हाऊसिंग, स्कायवॉक, ग्रोथ सेंटर यांसारख्या पुरत्या फसलेल्या योजनांचा बोजा या महानगराला वागवावा लागत आहे. त्या सगळ्याची एकदा झाडाझडती झाली पाहिजे. तसे होण्याची शक्यता कमी आहे; पण एक मात्र नक्की की, मुलुंड ते आणिक-वडाळा, मालवणी ते वसई-विरार या पट्ट्यातील मिठागरांना नख लावण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. मुंबई, ठाणे, पालघर या तिन्ही जिल्ह्यांना एकाच वेळी फटका बसू शकेल असा हा पायावर कुऱ्हाड मारून घेणारा प्रस्ताव आहे. मिठागरांची मालकी यावरून त्यांचे मालक आणि सरकार यांच्यात बरीच न्यायालयीन लढाई सुरू आहे. ती तशीच सुरू राहू दे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. सुदैवाने, हवामान बदल आणि त्याचे परिणाम याची जाण असलेले पर्यावरणमंत्री आपल्याकडे आहेत. आरेमधील वनक्षेत्र वाढवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. म्हणूनच, महाविकास आघाडी सरकारने मिठागरांच्या जागेवरील परवडणारी घरे या मृगजळाच्या मागे लागू नये, यातच शहाणपणा आहे, हे त्यांना सहज समजू शकेल.

टॅग्स :Mumbaiमुंबई