शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महानगर वाचवायचे असेल तर मिठागरे हवीतच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 07:49 IST

salt pans : मुंबई महानगरातील मिठागरांच्या जमिनी या संतुलनाचे काम करत आहेत. त्या सिमेंट-काँक्रीटच्या इमल्यांनी भरणे म्हणजे हे शहर बुडायला हातभार लावण्यासारखे आहे.

- रवींद्र मांजरेकर(शहर संपादक, मुंबई)

हवामान बदलाचे फटके सर्व बाजूंनी बसू लागले असले तरी त्यापासून आपण काहीही शिकायचे नाही, असे शहरांचे व्यवस्थापन करणाऱ्या नियोजन संस्थांनी मनापासून ठरवलेले आहे. निसर्गाच्या या फटकाऱ्यांची त्यांनी जरा जरी दखल घेतली असती तर पुन्हा मिठागरांच्या जागेवर परवडणारी घरे बांधण्याचा बृहत आराखडा तयार करण्याचा घाट घातला नसता. मुंबई महानगर प्रदेश नियामक प्राधिकरण ही मुंबई आणि महानगरालगतच्या परिसराचे नियोजन करण्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेतील नोकरशहा, बांधकाम व्यावसायिक यांना मिठागरांची मोकळी जागा सतत खुपत असते.

या जागेवर निरनिराळे उद्याेग करण्याचे यापूर्वीचे प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळलेले आहेत. आता पंतप्रधान आवास योजनेत घरे बांधण्यासाठी मिठागरांच्या जागेचा पर्याय योग्य असल्याचा शोध एमएमआरडीएला लागला. त्यात या जागेचा विकास करण्यासाठी २०१४ मध्ये सरकारने एमएमआरडीएचीच नियुक्ती केली. एमएमआरडीएने परवडणाऱ्या घरांसाठी या जागेवर बृहत आराखडा तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिठागरांच्या जागा किती, कुठे आहेत, सीआरझेडखाली किती जमीन जाते, बांधकामासाठी किती जागा उपलब्ध होईल, याचा अभ्यास केला जाणार आहे.

ही मिठागरे ताब्यात घ्यायची आणि त्यावर शहरातील सगळ्या झोपडपट्टीवासीयांना परवडणारी घरे बांधून द्यायची. म्हणजे शहरातील झोपड्यांच्या जागा मोकळ्या होतील, असा मनसुबा २००० सालापासून संबंधितांचा आहे. अधिकाऱ्यांच्या रीतसर बदल्या झाल्या, तरी या गोष्टीवर मात्र येणाऱ्या सर्व नवीन अधिकाऱ्यांचेही एकमत होते, हे विशेष. यूपीए सरकारच्या काळात राज्याने असा एक प्रस्ताव केंद्राला पाठवला होता. त्यावर पर्यावरणमंत्र्यांनी अजिबात दाद लागू दिली नाही. मग निर्णय घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची एक समिती नेमण्यात आली. त्यांच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहिले असते; परंतु २००५च्या पावसाने याच भागात हाहाकार उडवून दिल्याने, मिठागरे आणि तिवरे यांचे महत्त्व लक्षात आले. त्यातून तो प्रस्ताव मागे पडला.

वास्तविक, एमएमआरडीएने राबवलेल्या रेंटल हाऊसिंग, स्कायवॉक, ग्रोथ सेंटर यांसारख्या पुरत्या फसलेल्या योजनांचा बोजा या महानगराला वागवावा लागत आहे. त्या सगळ्याची एकदा झाडाझडती झाली पाहिजे. तसे होण्याची शक्यता कमी आहे; पण एक मात्र नक्की की, मुलुंड ते आणिक-वडाळा, मालवणी ते वसई-विरार या पट्ट्यातील मिठागरांना नख लावण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. मुंबई, ठाणे, पालघर या तिन्ही जिल्ह्यांना एकाच वेळी फटका बसू शकेल असा हा पायावर कुऱ्हाड मारून घेणारा प्रस्ताव आहे. मिठागरांची मालकी यावरून त्यांचे मालक आणि सरकार यांच्यात बरीच न्यायालयीन लढाई सुरू आहे. ती तशीच सुरू राहू दे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. सुदैवाने, हवामान बदल आणि त्याचे परिणाम याची जाण असलेले पर्यावरणमंत्री आपल्याकडे आहेत. आरेमधील वनक्षेत्र वाढवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. म्हणूनच, महाविकास आघाडी सरकारने मिठागरांच्या जागेवरील परवडणारी घरे या मृगजळाच्या मागे लागू नये, यातच शहाणपणा आहे, हे त्यांना सहज समजू शकेल.

टॅग्स :Mumbaiमुंबई