शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

जातच नाही म्हटले, तर ‘जात’ कशी जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 05:48 IST

उत्तर प्रदेशात प्रत्येक वीसपैकी एका वाहनावर जातीचे नाव लिहिलेला स्टिकर असतो, हे कशाचे चिन्ह आहे? या गोष्टी कधी थांबणार? 

- धनाजी कांबळे, उपसंपादक, लोकमत, पुणे

उत्तर प्रदेशमध्ये धावणाऱ्या वाहनांवरील जातीयवाद समाजासाठी घातक आहे, तो थांबला पाहिजे, या प्रामाणिक हेतूने मुंबईतील एका शिक्षकाने पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. पंतप्रधान कार्यालयानेदेखील या पत्राची गंभीरपणे दखल घेऊन परिवहन विभागाला आदेश देऊन सत्यता पडताळायला सांगितले. त्यात उत्तर प्रदेशातील वीस वाहनांमागे एका वाहनावर जातीचा उल्लेख असल्याचे समोर आले. ही आकडेवारी समोर आल्यावर परिवहन आयुक्तांनी जातीय स्टिकर्स असलेली वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. वाहनांवरील जातीय स्टिकर्स ही बाब वरकरणी किरकोळ वाटत असली तरी जातिव्यवस्था किती खोलपर्यंत रुजली आहे, याचा अंदाज येण्यास पुरेशी आहे. एकीकडे देशाची महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना त्या वाटेतील मोठा अडथळा असलेली जात कधी संपणार? की ‘जात नाही ती जात’ एवढं बोलून आपण मोकळे होणार, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

भारत असा एकमेव देश आहे, जिथे जातिव्यवस्थेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. ती जशी वाहनांवरील स्टिकर्समधून उफाळून येतात, तशीच ती शोषण आणि छळवणुकीतून दिसून येतात. ‘आता जात कुठे आहे?’- असे काही लोक म्हणत असतीलही. मात्र, २१ व्या शतकात जातिव्यवस्थेने आपल्या स्वरूपात बदल करवून घेतल्याने जातिव्यवस्थेचे अवशेष उघडपणे दिसणे कमी झाले आहे, इतकेच. दृश्य- अदृश्य स्वरूपात जातिव्यवस्था तीव्र स्वरूप धारण करत आहे. 

भारतातील जातिव्यवस्थेची सैद्धान्तिक मांडणी पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. जातीपद्धती केवळ श्रमाचे विभाजन नाही, तर ते श्रमिकांचेही विभाजन आहे, असे सांगून बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेवर हल्ला चढविला. इथले लोक जिथे जातील, तिथे जातिव्यवस्था घेऊन जातील आणि ते अधिक धोकादायक असल्याचे बाबासाहेबांनी म्हटले होते. जातिप्रथेचे निर्मूलन (ॲनहिलेशन ऑफ कास्ट) हे पुस्तक लिहून बाबासाहेबांनी या विषयाची मूलभूत आणि सविस्तर मांडणी केलेली आहे. जाती मोडण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाचा कार्यक्रम दिला. मात्र, आजही मिश्र पद्धतीने, खुल्या पद्धतीने रोटी-बेटी व्यवहार होताना दिसत नाहीत. एखाद्याने हिंमत केलीच तर ‘सैराट’ घडविले जाते. कुणी मिशा ठेवल्या म्हणून तर कुणी घोड्यावर बसला म्हणून जिवंत माणसं मारली जात आहेत. आता तर जातीच्या सेना तयार झाल्या आहेत. त्याला पायबंद घालण्याची कोणती व्यवस्था आपल्याकडे आहे? सोशल मीडिया नावाच्या नव्या माध्यमातूनही जाती-धर्माचे ग्रुप करून सलोखा बिघडविण्याचे प्रकार वाढले आहेत. एखाद्याला त्याची जात कोणती हे विचारणे हादेखील गुन्हा ठरवायला हवा. जाती-धर्माचा अभिमान ज्याने त्याने मनात, घरात ठेवावा. त्याला सार्वजनिक करू नये. जातीलढा सर्वच राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील नेत्यांनी अजेंड्यावर अग्रस्थानी घ्यायला हवा. मात्र, तसे दिसत नाही.

जात नाही ती जात म्हणून हे लोक जबाबदारी टाळतात. ज्यांनी प्रबोधनात पुढाकार घ्यायला हवा, त्या वरिष्ठ जातींनाच जात घालवायची नसावी, अशी आजची परिस्थिती आहे. शेजारी राहणारे परधर्माचे, परजातीचे लोक शत्रू वाटू लागले आहेत. परस्पर प्रेमाचे, आपुलकीचे सारे धागे एका क्षणात तुटताहेत. हे धागे आणखी मजबूत करण्यासाठी जातीय विषमता नष्ट करणे ही सामूहिक जबाबदारी मानली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा सकारात्मक निर्णय नुकताच घेतला आहे. वाहनांवरील जातीय स्टिकर्स ही बाब गंभीरच आहे. उत्तर प्रदेश परिवहन विभागाचा हा आदेश सर्वच राज्यांमध्ये लागू करावा असा आहे. सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी आणि समताधिष्ठित सुदृढ समाज निर्माण होण्यासाठी माणसांच्या मनातून जाती पुसल्या जाणे महत्त्वाचे आहे. अन्यथा ही केवळ मलमपट्टीच ठरेल. 

टॅग्स :Caste Certificateजात वैधता प्रमाणपत्र