शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

आमची उंची तुम्ही ठरवणार तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 03:23 IST

गोंधळी सारे नागपुरात गोंधळाला गेले... मुंबईचे विधानभवन कसे शांत शांत झाले.

-दिलीप तिखिलेगोंधळी सारे नागपुरात गोंधळाला गेले... मुंबईचे विधानभवन कसे शांत शांत झाले. बऱ्याच दिवसांनंतर या संकुलाला अशी शांतता लाभली होती. या नीरव (मोदी नव्हे) शांततेत मग संकुलातील महापुरुषांच्या पुतळ्यांत संवाद सुरू झाला. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, स्वामी रामानंद तीर्थ, म. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी आठ महापुरुषांचे पुतळे विधानभवन परिसरात उभारण्यात आले आहेत. पण हे पुतळे कमी-जास्त उंचीचे का उभारण्यात आले हे आमच्या सर्वसामान्य बुद्धीसाठी अजूनही कोडेच आहे. अर्थात पुतळे उभारताना त्या-त्या वेळचा राजकीय दबाव यासाठी कारणीभूत असू शकतो हे आम्ही आताच्या घडामोडींवरून सांगू शकतो.पण या पुतळ्यांच्या संवादात मात्र या कमी-जास्त उंचीचा, उचनीचतेचा लवलेशही नव्हता. संवादाचा विषय अनायसे ताजाच होता. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवरून नागपूरच्या अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांत प्रचंड खडाजंगी झाली. या वादाने इकडे मुंबईचे पुतळे अस्वस्थ झाले.१६ फुटाचा (यात २१ फुटाची चौथºयाची उंची वेगळी) म.फुलेंचा पुतळा ७.२ फुटाच्या (१०.६ फुटाचा चौथरा वेगळा) शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला म्हणाला, शिवबा... अरबी समुद्रात उभारण्यात येणाºया तुझ्या पुतळ्याच्या उंचीवरून हा काय वाद चालवला आहे, या लोकांनी? उंची मोजायचीच तर ती कर्तृत्वाची मोजा ना! हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारा तू... प्रतापगडाजवळ अफजलखानचा वध करायला निघालास तेव्हा त्या धिप्पाड खानाच्या उंचीचा तू विचार केला होतास का? पुण्याच्या लालकिल्ल्यात दीड लाखाची सेना घेऊन डेरा टाकून बसलेल्या शाहिस्तेखानावर निधड्या छातीने वार करून त्याची बोटे छाटली तेव्हा तुझी छाती ५६ इंची होती की आणखी किती, याचे मोजमाप झाले होते का?अरे... आज तुझ्या या ९ फुटी पुतळ्यापुढे बोलताना माझ्या १६ फुटी पुतळ्याला खाली मान घालावी लागते याचा मला सार्थ अभिमान आहे. तुझ्या कर्तृत्वाला माझा हा सलाम आहे. पण आपली ही लेकरं म्हणतात, शिवबाचा पुतळा सर्वात लहान का केला. राजकारण आहे हे दुसरे काही नाही.शिवबाच्या पुतळ्याच्या चेहºयावर खिन्नतेचे भाव होते. एवढा वेळ शांत असलेल्या शिवबाने आता मौन सोडले.शिवबा : आतापर्यंत झाले ते झाले... पण, अरबी समुद्रात उभारण्यात येणाºया पुतळ्याबद्दलच माझा आक्षेप आहे. समुद्री जैवविविधतेला हानी पोहचणार असेल, पर्यावरणाचे नुकसान होत असेल तर कशाला उभारायचा पुतळा? अडीच हजार कोटी रुपये खर्च करणार आहेत म्हणे या माझ्या पुतळ्यावर! शिवाय ३०० कोटी रु. जीएसटी वेगळीच. म्हणजे आमचे पुतळे उभारून सरकार आपली तिजोरीही भरु पाहात आहे. एवढा पैसा मला त्या काळात मिळाला असता तर माझ्या रयतेच्या कल्याणासाठी मी तो खर्च केला असता? एक म्हणतो उंची कमी केली. दुसरा म्हणतो, नाही... उंचावलेल्या तलवारीच्या टोकापासून पायापर्यंत मोजा. . असं वाटते...तीच तलवार उगारून धडा शिकवावा यांना.शिवबाचा संताप सर्वच पुतळ्यांनी ग्राह्य ठरविला. इतर पुतळ्यांच्याही आपआपल्या व्यथा होत्या, त्यांनाही बरंच काही बोलायचे होतं पण मध्येच सुरक्षा रक्षक आले आणि संवाद थांबला.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज