शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आमची उंची तुम्ही ठरवणार तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 03:23 IST

गोंधळी सारे नागपुरात गोंधळाला गेले... मुंबईचे विधानभवन कसे शांत शांत झाले.

-दिलीप तिखिलेगोंधळी सारे नागपुरात गोंधळाला गेले... मुंबईचे विधानभवन कसे शांत शांत झाले. बऱ्याच दिवसांनंतर या संकुलाला अशी शांतता लाभली होती. या नीरव (मोदी नव्हे) शांततेत मग संकुलातील महापुरुषांच्या पुतळ्यांत संवाद सुरू झाला. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, स्वामी रामानंद तीर्थ, म. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी आठ महापुरुषांचे पुतळे विधानभवन परिसरात उभारण्यात आले आहेत. पण हे पुतळे कमी-जास्त उंचीचे का उभारण्यात आले हे आमच्या सर्वसामान्य बुद्धीसाठी अजूनही कोडेच आहे. अर्थात पुतळे उभारताना त्या-त्या वेळचा राजकीय दबाव यासाठी कारणीभूत असू शकतो हे आम्ही आताच्या घडामोडींवरून सांगू शकतो.पण या पुतळ्यांच्या संवादात मात्र या कमी-जास्त उंचीचा, उचनीचतेचा लवलेशही नव्हता. संवादाचा विषय अनायसे ताजाच होता. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवरून नागपूरच्या अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांत प्रचंड खडाजंगी झाली. या वादाने इकडे मुंबईचे पुतळे अस्वस्थ झाले.१६ फुटाचा (यात २१ फुटाची चौथºयाची उंची वेगळी) म.फुलेंचा पुतळा ७.२ फुटाच्या (१०.६ फुटाचा चौथरा वेगळा) शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला म्हणाला, शिवबा... अरबी समुद्रात उभारण्यात येणाºया तुझ्या पुतळ्याच्या उंचीवरून हा काय वाद चालवला आहे, या लोकांनी? उंची मोजायचीच तर ती कर्तृत्वाची मोजा ना! हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारा तू... प्रतापगडाजवळ अफजलखानचा वध करायला निघालास तेव्हा त्या धिप्पाड खानाच्या उंचीचा तू विचार केला होतास का? पुण्याच्या लालकिल्ल्यात दीड लाखाची सेना घेऊन डेरा टाकून बसलेल्या शाहिस्तेखानावर निधड्या छातीने वार करून त्याची बोटे छाटली तेव्हा तुझी छाती ५६ इंची होती की आणखी किती, याचे मोजमाप झाले होते का?अरे... आज तुझ्या या ९ फुटी पुतळ्यापुढे बोलताना माझ्या १६ फुटी पुतळ्याला खाली मान घालावी लागते याचा मला सार्थ अभिमान आहे. तुझ्या कर्तृत्वाला माझा हा सलाम आहे. पण आपली ही लेकरं म्हणतात, शिवबाचा पुतळा सर्वात लहान का केला. राजकारण आहे हे दुसरे काही नाही.शिवबाच्या पुतळ्याच्या चेहºयावर खिन्नतेचे भाव होते. एवढा वेळ शांत असलेल्या शिवबाने आता मौन सोडले.शिवबा : आतापर्यंत झाले ते झाले... पण, अरबी समुद्रात उभारण्यात येणाºया पुतळ्याबद्दलच माझा आक्षेप आहे. समुद्री जैवविविधतेला हानी पोहचणार असेल, पर्यावरणाचे नुकसान होत असेल तर कशाला उभारायचा पुतळा? अडीच हजार कोटी रुपये खर्च करणार आहेत म्हणे या माझ्या पुतळ्यावर! शिवाय ३०० कोटी रु. जीएसटी वेगळीच. म्हणजे आमचे पुतळे उभारून सरकार आपली तिजोरीही भरु पाहात आहे. एवढा पैसा मला त्या काळात मिळाला असता तर माझ्या रयतेच्या कल्याणासाठी मी तो खर्च केला असता? एक म्हणतो उंची कमी केली. दुसरा म्हणतो, नाही... उंचावलेल्या तलवारीच्या टोकापासून पायापर्यंत मोजा. . असं वाटते...तीच तलवार उगारून धडा शिकवावा यांना.शिवबाचा संताप सर्वच पुतळ्यांनी ग्राह्य ठरविला. इतर पुतळ्यांच्याही आपआपल्या व्यथा होत्या, त्यांनाही बरंच काही बोलायचे होतं पण मध्येच सुरक्षा रक्षक आले आणि संवाद थांबला.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज