शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

आमची उंची तुम्ही ठरवणार तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 03:23 IST

गोंधळी सारे नागपुरात गोंधळाला गेले... मुंबईचे विधानभवन कसे शांत शांत झाले.

-दिलीप तिखिलेगोंधळी सारे नागपुरात गोंधळाला गेले... मुंबईचे विधानभवन कसे शांत शांत झाले. बऱ्याच दिवसांनंतर या संकुलाला अशी शांतता लाभली होती. या नीरव (मोदी नव्हे) शांततेत मग संकुलातील महापुरुषांच्या पुतळ्यांत संवाद सुरू झाला. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, स्वामी रामानंद तीर्थ, म. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी आठ महापुरुषांचे पुतळे विधानभवन परिसरात उभारण्यात आले आहेत. पण हे पुतळे कमी-जास्त उंचीचे का उभारण्यात आले हे आमच्या सर्वसामान्य बुद्धीसाठी अजूनही कोडेच आहे. अर्थात पुतळे उभारताना त्या-त्या वेळचा राजकीय दबाव यासाठी कारणीभूत असू शकतो हे आम्ही आताच्या घडामोडींवरून सांगू शकतो.पण या पुतळ्यांच्या संवादात मात्र या कमी-जास्त उंचीचा, उचनीचतेचा लवलेशही नव्हता. संवादाचा विषय अनायसे ताजाच होता. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवरून नागपूरच्या अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांत प्रचंड खडाजंगी झाली. या वादाने इकडे मुंबईचे पुतळे अस्वस्थ झाले.१६ फुटाचा (यात २१ फुटाची चौथºयाची उंची वेगळी) म.फुलेंचा पुतळा ७.२ फुटाच्या (१०.६ फुटाचा चौथरा वेगळा) शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला म्हणाला, शिवबा... अरबी समुद्रात उभारण्यात येणाºया तुझ्या पुतळ्याच्या उंचीवरून हा काय वाद चालवला आहे, या लोकांनी? उंची मोजायचीच तर ती कर्तृत्वाची मोजा ना! हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारा तू... प्रतापगडाजवळ अफजलखानचा वध करायला निघालास तेव्हा त्या धिप्पाड खानाच्या उंचीचा तू विचार केला होतास का? पुण्याच्या लालकिल्ल्यात दीड लाखाची सेना घेऊन डेरा टाकून बसलेल्या शाहिस्तेखानावर निधड्या छातीने वार करून त्याची बोटे छाटली तेव्हा तुझी छाती ५६ इंची होती की आणखी किती, याचे मोजमाप झाले होते का?अरे... आज तुझ्या या ९ फुटी पुतळ्यापुढे बोलताना माझ्या १६ फुटी पुतळ्याला खाली मान घालावी लागते याचा मला सार्थ अभिमान आहे. तुझ्या कर्तृत्वाला माझा हा सलाम आहे. पण आपली ही लेकरं म्हणतात, शिवबाचा पुतळा सर्वात लहान का केला. राजकारण आहे हे दुसरे काही नाही.शिवबाच्या पुतळ्याच्या चेहºयावर खिन्नतेचे भाव होते. एवढा वेळ शांत असलेल्या शिवबाने आता मौन सोडले.शिवबा : आतापर्यंत झाले ते झाले... पण, अरबी समुद्रात उभारण्यात येणाºया पुतळ्याबद्दलच माझा आक्षेप आहे. समुद्री जैवविविधतेला हानी पोहचणार असेल, पर्यावरणाचे नुकसान होत असेल तर कशाला उभारायचा पुतळा? अडीच हजार कोटी रुपये खर्च करणार आहेत म्हणे या माझ्या पुतळ्यावर! शिवाय ३०० कोटी रु. जीएसटी वेगळीच. म्हणजे आमचे पुतळे उभारून सरकार आपली तिजोरीही भरु पाहात आहे. एवढा पैसा मला त्या काळात मिळाला असता तर माझ्या रयतेच्या कल्याणासाठी मी तो खर्च केला असता? एक म्हणतो उंची कमी केली. दुसरा म्हणतो, नाही... उंचावलेल्या तलवारीच्या टोकापासून पायापर्यंत मोजा. . असं वाटते...तीच तलवार उगारून धडा शिकवावा यांना.शिवबाचा संताप सर्वच पुतळ्यांनी ग्राह्य ठरविला. इतर पुतळ्यांच्याही आपआपल्या व्यथा होत्या, त्यांनाही बरंच काही बोलायचे होतं पण मध्येच सुरक्षा रक्षक आले आणि संवाद थांबला.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज